Mahendra Bhombe

Mahendra Bhombe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahendra Bhombe, Business consultant, Praveg Tent City Narmada, Dyke-3, Sardar Sarovar Dam Site, Kevadia,, Rajpipla.

08/06/2025
" तिसरे महायुद्ध होईल ? "नमस्कार मित्रांनो ! आपण तिसऱ्या महायुद्धाबद्दल निरनिराळ्या भविष्यवाण्या हल्ली अधूनमधून वाचत असत...
19/10/2024

" तिसरे महायुद्ध होईल ? "

नमस्कार मित्रांनो ! आपण तिसऱ्या महायुद्धाबद्दल निरनिराळ्या भविष्यवाण्या हल्ली अधूनमधून वाचत असतो नि आपलेही विश्लेषण वापरून काही कयास बांधत असतो. कधी नव्हे तो जगातील काही 'राष्ट्र नायकां'चा माथेफिरूपणा (विविध कारणांमुळे) आज वाढलेला आहे. यांस जोड आहे ती आण्विक शस्त्रांची. गेल्या दोनशे वर्षांत एवढी चिंताजनक जागतिक अस्वस्थता जाणवली नव्हती. असलीच तर ती 'प्रांतीय' होती. आपण दोन महायुद्धे पाहिली ज्यात शेवट झाला तो हिरोशिमा - नागासाकीवरील आण्विक हल्ल्याने. तिथेच जगाने भयानक संहार प्रथमतः अनुभवला. नंतर हायड्रोजन अस्रांचा बोलबाला झाला. रासायनिक शस्त्रास्त्रे काही अंशी वापरात येऊ लागली. कोविड (कोरोना) हा एक रासायनिक दहशतवादाचा केलेला प्रयत्न होता का, हे आजही नीटपणे कळलेले नाही. "इलेक्ट्रो मॅग्नेटिक" अवजारांचा दृश्य - अदृश्य वापर करीत एखाद्या देशाची संपूर्ण दळणवळण व्यवस्था ही खिळखिळी करता येऊ शकते. यामुळे त्या देशाची अर्थव्यवस्था ही गंभीरपणे क्षतीग्रस्त होऊ शकते. म्हणजे शत्रूशी आमनेसामने लढाई न करता त्यांस जेरीस आणता येऊ शकते. बरीच वर्षे 'जगाचा पोलीस' असणाऱ्या अमेरिकेने 'आर्थिक निर्बंध' लादत अनेक उपद्व्यापी देशांना स्वतःच्या तर्कानुसार शिक्षा केली होती. अर्थात 'निरंकुश नेतृत्व' उपभोगणाऱ्या अमेरिकेला बरीच वर्षे हे करता आले परंतु झपाट्याने बदललेल्या आजच्या जागतिक रचनेत हे शस्त्र फारसे प्रभावी ठरत नाहीय.
नेतृत्वाच्या आणि विचारसरणीच्या संदर्भात आज जगाची सहा गटांमध्ये विभागणी झाल्याचे दिसते. पुन्हा प्रत्येक गटात अंतर्विरोध आहेतच. हे गट असे सांगता येतील - १. अमेरिका व युरोपीय दोस्त राष्ट्रे ( यांच्यातील प्रेमभाव कमी झाला आहे.) २. चीन व त्यांस अंकित असलेले उ. कोरिया सारखे काही देश (रशिया या गटाशी सध्या मतलबी सलगी करतोय.) ३. सौदी अरेबिया व काही सुन्नी मुस्लीम देश (सौदीची अमेरिकेसोबत असलेली मैत्री आता क्षीण झाली आहे.) ४. इराण व शिया पंथीय प्रभाव असलेले काही मुस्लीम देश (इराण व चीन हे अमेरिका या समान शत्रूमुळे जवळ आलेत) ५. दक्षिण अमेरिका खंडातील कम्युनिस्ट व सोशालिस्ट विचारसरणीचे लॅटिन देश (या बहुतेक देशांमध्ये भ्रष्टाचार आणि राजकीय अनिश्चितता सध्या बरीच आहे.) ६. भारत व अन्य शांतताप्रिय राहू इच्छिणारे देश (स्वीडन, नार्वे, स्विझर्लंड इ. देश आज रशियाच्या युक्रेनवरील चढाईने भांबावले आहेत.) या सर्व सहा गटांमध्ये त्या त्या खंडीय भागातील छोटे देश आपापल्या गरजेनुसार व वकुबानुसार सामील होत रहातात.
तिसऱ्या महायुद्धाची शक्यता तपासण्याआधी आपण पाहूयात की जगातील अस्वस्थता, अनिश्चितता आणि अराजकता ही आज एवढी का वाढलेली आहे. पहिले कारण अर्थातच "भूराजकीय महत्त्वाकांक्षे" (Geopolitical)चे आहे. याबाबतीत चीन व रशिया ही ढळढळीत उदाहरणे आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण "आर्थिक नाकर्तेपणा"चे. अर्थव्यवस्थेतील घसरण थांबवता न आल्याने काही राष्ट्रनायक हे टोकाचा राष्ट्रवाद वापरत बाहेर कुरघोड्या करु लागतात जेणेकरून भाबड्या जनतेला "बाहेर" एंगेज करता यावे. उ. कोरिया, इराण, इजिप्त, इराक इ. देशांसोबत इस्राएलचेही नाव इथे घ्यावे लागेल. अर्थात चीनमध्येही आर्थिक अनागोंदी वाढते आहे आणि रशियाचा अर्थशास्त्रीय ढाचाच कमकुवत आहे. सौदी अरेबिया सारखे धर्मांध देश 'धार्मिक' अहमहमिकेने अन्य धार्मिक देशांची जेव्हा पाठराखण करतात तेव्हा धार्मिक दुफळी ही वाढत जाते व ती प्रांतीय युद्धाकडे घेऊन जाते. प्रांतीय युद्ध हे मग जागतिक व्हायला वेळ लागत नाही. अमेरिका बऱ्याच वेळा प्रांतीय युद्धे न थांबवता भांडणाऱ्या देशांना शस्त्रपुरवठा करीत आले आहे. यातून एक नेहमीच ठसठसणारी जखम तयार होते जी मोठ्या युद्धाचे कारण बनू शकते. सौदी - इराण, युक्रेन - रशिया, भारत - पाकिस्तान, तैवान - चीन, द.कोरिया - उ.कोरिया, इस्राएल - इराण इ. अनेक उदाहरणे अमेरिकेच्या "शस्त्रास्त्र व्यापारा"ची देता येतील. अनेकदा अमेरिकेने आपली नवी शस्त्रास्त्रे या युद्धांमध्ये जोखून घेतली आहेत. हां, काही अंशी लोकशाहीचं संवर्धन व कम्युनिझमचा विरोध करण्यासाठीसुद्धा अमेरिकेने सामरिक कारवाया केल्या आहेत.
स्वतःची खनिजसंपत्ती अपूरी पडत असल्याने काही मोठे आक्रमक देश इतरांच्या साठ्यावर डल्ला मारण्यासाठी "साम - दाम - दंड - भेद" वापरू लागतात. याबाबतीत चीन आणि रशिया आघाडीवर आहेत. युक्रेनचा खनिजसाठा पुतीनना हवा आहे. दक्षिण चिनी सागरावर याच कारणासाठी चीनला वर्चस्व हवे आहे जे जपान, द.कोरिया, फिलीपाईन्स, मलेशिया इ. अन्य देशांना मान्य नाही. असेच मोठे साठे आफ्रिकेत असल्याने चीन आपले व्युहात्मक नेटवर्क तिथे वाढवतोय जे अनेक छोट्या आफ्रिकन देशांना असुरक्षित बनवते आहे. काही लॅटिन अमेरिकन देशांमध्ये स्थानिक जनता मोठे उठाव बहुराष्ट्रीय कंपन्यांविरूद्ध करते आहे कारण या कंपन्या राजकारण्यांना लालूच दाखवत येथील खनिजे ओरबाडत आहेत. नायजेरिया या आफ्रिकन देशात याच कारणाने युद्धसदृश्य परिस्थिती नेहमी असते. स्वतःचे नैसर्गिक गॅस साठे मुबलक सापडल्याने अमेरिका हल्ली सौदी अरेबियावर अवलंबून रहात नाही. यामुळे सौदीचा प्रांतीय धाक आता खूप कमी झाला आहे. अशा परिस्थितीत आपले इस्लामिक जगातील वर्चस्व वाढविण्यासाठी इराण काही उलथापालथ करु शकतो. इस्राएलच्या नेत्यान्याहूंचा आक्रमकपणा हा इराणच्या फायद्याचा ठरू शकतो. निष्कर्ष असा की "जेरूसलेम" हे पवित्र शहर तिसऱ्या महायुद्धाचे केंद्र ठरू शकते.
तिसऱ्या महायुद्धासाठी कोण कोण आसुसलेले आहेत ? झालेच तर ते कुठे होईल ? तिसरे महायुद्ध हे आण्विक असेल का ? या गदारोळाचा फायदा घेत 'दरिद्री अर्थव्यवस्था' असलेला पाकिस्तान आततायीपणाने आपल्या विरुद्ध काही विचित्र कागाळी करेल का ? अमेरिकेचे दडपण आणि आर्थिक मदत नाकारून ते चीनसोबत दक्षिण आशियात कोणती गडबड करू शकेल ? तिसऱ्या महायुद्धाच्या सावटाखाली असलेल्या व भेदरलेल्या जगात भारताने काय करायला हवे ? - या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे शोधणे सोपे नाही. परंतु काही "प्रॅक्टिकल" शक्यता आपण पडताळू शकतो. बहुतेक सर्व महाशक्तींना हे युद्ध स्वतःच्या भूमीवर नको असेल, हे निश्चित. यासाठी दोन्हीकडून 'बळीचा बकरा' शोधला जाऊ शकतो. हा बकरा मग तैवान किंवा प्यांगयांग (उ. कोरिया) किंवा जेरुसलेम (इस्राएल) अथवा सेऊल (द. कोरिया) किंवा काराकास (वेनेझुएला) अथवा क्विव (युक्रेन) असू शकेल. म्हणजे 'महाशक्ती' राष्ट्रे आपापली आयुधे या शहरांमध्ये वापरु शकतात. यांत अगदी टोकाचा वापर हा अण्वस्त्रांचा होऊ शकतो. परंतु महाशक्तींना खरचटण्यापेक्षा जास्त क्षती पोचणार नाही. सर्व महाशक्तींना एकमेकांची 'संहारकता' माहीत असल्याने तिसरे महायुद्ध हे प्रातिनिधिक स्वरूपाचेच बहुदा असेल. हां, पाकिस्तान किंवा उ. कोरियासारखे माथेफिरू देश या महायुद्धाला महाशक्तींच्या जमिनीवरही लादू शकतात. या संपूर्ण शक्यतेमध्ये रासायनिक अस्त्रे किंवा विषाणूंचा संसर्ग वापरलेले भयंकर युद्धही लादले जाऊ शकते ज्याचा परिणाम काही पिढ्यांना झेलावा लागेल. ग्लोबल वार्मिंगमुळे व मतलबी भराव टाकल्याने बऱ्याच ठिकाणी समुद्राची पातळी वर येते आहे. (दादरची चौपाटी अशीच गायब झाली.) समुद्र किनाऱ्यावरील शहरे यामुळे मोठ्या संकटात सापडू शकतात. या वस्तुस्थितीचा अमानुष वापर करीत काही आततायी देशांचे मूर्ख नेते उत्तर ध्रुवानजिकच्या बर्फालाच वितळवण्याचा भयानक प्रयत्न करु शकतात.
या सर्व गदारोळात भारताने सर्वांशी "सावध मैत्री" ठेवण्याचाच प्रयत्न करायला हवा. अमेरिका जरी आमचा लोकशाहीप्रधान मित्र असला तरी चीनला रोखण्यासाठी रशियासोबतची मैत्री ही सांभाळावी लागेलच. आमच्या शेजारी असलेल्या छोट्या देशांना आम्ही अधिक 'आश्वस्त' करायला हवे जेणेकरून हे देश आमची पहिली नैसर्गिक तटबंदी म्हणून उपयोगी पडतील. आमची या घडीला मोठी शक्ती ही आमचं अर्थकारण आहे जे सर्वसमावेशक व सातत्यपूर्ण असलं पाहिजे. खाडी देश, आफ्रिकन देश, दक्षिणपूर्व आशियाई देश, उत्तर अमेरिका व कॅनडा, इंग्लंड इ. देशांमध्ये भारतीय लोक आज मोठी आर्थिक व व्यावसायिक भूमिका बजावताहेत. या लोकांच्या पराक्रमाला भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुधारलेल्या व आश्वासक कामगिरीचा मोठा Perceptional आधार मिळतो आहे. हा आधार कमकुवत होऊ नये म्हणून आम्ही देशांतर्गत "सामाजिक अभिसरण" हे सांभाळले पाहिजे. चीन किंवा पाकिस्तान आमच्याविरूद्ध आज गंभीर कागाळ्या करत नाहीत कारण आमची जगभरातील "अर्थशास्त्रीय प्रतिमा" ही आज मोठी व प्रभावशाली आहे. या प्रतिमेला "सामाजिक तडे" जाता कामा नये. बहुतेक इस्लामी देश आज पाकिस्तान ऐवजी भारताशी मैत्री सांभाळू व वाढवू इच्छितात हे आमच्या "अंतर्गत सामाजिक एकते"चं फलित आहे. फक्त आर्थिक कामगिरीवर ही मैत्री अवलंबून नाही. अन्यथा आर्थिक आघाडीवर असणाऱ्या चीनबद्दलचं संशयी वातावरण हे जगभरात तयार झालंच नसतं. चीनने स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. भारताची 'वैश्विक प्रतिमा' हा चीनसाठी मोठा नैतिक धाक आहे. चीनच्याच वर्चस्ववादाच्या दिशेने रशियाचाही प्रवास आता चालला आहे. पूर्वीचा 'पर्शिया' (अरीया) असलेल्या इराणसोबत आमची चांगली मैत्री आहे. थोडक्यात असे की वर नमूद केलेल्या सहाही गटांमधील म्होरक्यांसोबत आमचे संबंध सुदृढ असायला हवेत. तिसऱ्या संभाव्य महायुद्धाचे आमच्यावर होणारे भूराजकीय, आर्थिक व सामाजिक परिणाम कमीतकमी होतील, अशी व्यूहरचना आम्ही आखायला हवी. कुटुंब कितीही सुदृढ किंवा पराक्रमी असले तरी त्यातला एकोपा हा क्षतीग्रस्त होऊ लागला तर बाहेरील शत्रूंना ती एक आयती संधी मिळते. आजच्या जागतिक अनिश्चिततेत आम्ही "अंतर्गत एकोपा व बाह्य नेटवर्किंग" मजबूत करायला हवे. बाकी जे घडणार आहे ते घडणार आहेच !

------ डॉ. गिरीश जाखोटिया.

ईमेल -
[email protected]

Copyright ©️ jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author's name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.

We use an integrated approach for business consultations, combining global realities and Indian priorities. We observe moral accountability and use original ideas, while offering solutions to our clients. Our training programmes are based on latest research, pragmatic and practical business inputs a...

" नवउद्योजकांनी पाळावयाची दहा महत्त्वाची पथ्ये "नमस्कार मित्रांनो ! उद्योजक बनायची पहिलीच वेळ (नि म्हणून पहिलाच अनुभव) अ...
29/09/2024

" नवउद्योजकांनी पाळावयाची दहा महत्त्वाची पथ्ये "

नमस्कार मित्रांनो ! उद्योजक बनायची पहिलीच वेळ (नि म्हणून पहिलाच अनुभव) असेल तर काही महत्त्वाची पथ्ये ही पाळायलाच हवीत. अशा दहा पथ्यांबद्दल इथे चर्चा करूयात. अर्थात ही यादी आणखी मोठी करता येऊ शकेल. सुयोग्य उद्योग निवडण्यासाठी एक वर्षभर विस्तृत माहिती घ्या. हे पहिले पथ्य अत्यंत महत्त्वाचे. भावनेच्या भरात जाऊन किंवा एखाद्याने सुचवले म्हणून लगेच कोणत्याही उद्योगात उतरायचे नसते. हा अभ्यास दोन अंगांनी करा. उद्योगातील धोका, स्पर्धा, भांडवलाची व कौशल्याची गरज, पुरवठादार, ग्राहकांचा प्रकार व सरकारी धोरणे यांचा समावेश पहिल्या अभ्यासात होतो. दुसऱ्या अभ्यासात आपले व्यक्तीमत्व (बलस्थाने व दुर्बलता), कौटुंबिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी, आपली आवड किंवा मानसिकता यांच्याशी पहिल्या अभ्यासातील घटकांची सांगड घाला. उद्योगासाठी 'लवचिक कार्यपद्धती'ची व 'व्यावहारिक चातुर्या'ची मानसिकता अत्यंत आवश्यक असते. आपल्याकडे असे चातुर्य नसेल तर असा चतुर व विश्वासू भागिदार हा घेता येतो. "Method of deletion"ने अडचणीचे वा न आवडणारे उद्योग वगळत जाऊन दोन - तीन पर्यायांवर पोहोचा. आता या पर्यायांबद्दलची चर्चा आपले कुटुंबीय, संभाव्य भागीदार, त्या त्या उद्योगातील अनुभवी उद्योजक व बँकरशी करा. अनुभवी बँकर तुम्हाला अनेक धोक्यांची व संधींची जाणीव करुन देऊ शकतो. शेवटी एक सुयोग्य उद्योग निवडा.
दुसरे पथ्य हे या उद्योजकीय वाटचालीतील दुसरे महत्त्वाचे पाऊल ठरते. निवडलेला पसंतीचा उद्योग करणारी एखादी चांगली कंपनी गाठा व तिथे दोन वर्षे डोळसपणे नोकरी करा. विक्री, उत्पादन, आर्थिक तपशील म्हणजे प्रॉडक्टचे कॉस्टिंग व प्राईसिंग, प्रतिस्पर्धी, तंत्रज्ञानातील गुंतवणूक, पुरवठादार इ. गोष्टी बारकाईने जाणून घ्या. "सहकाऱ्यांची टीम" कशी उभी करतात ते समजावून घ्या. कोणत्याही उद्योगात "टीम" ही अत्यंत महत्त्वाची असते. नोकरी संपवून त्या प्रॉडक्टचे "कमिशनवर आधारित विक्रेते" म्हणजे डिलर किंवा स्टॉकिस्ट व्हा. यामुळे भांडवली गुंतवणूक न करता हा उद्योग (विशेषतः बाजार व पुरवठादार) खोलात जाऊन समजून घेता येईल. सोबतीने उपयोगी पडणाऱ्या तमाम लोकांचे "नेटवर्क" बनवता येईल. नेटवर्कशिवाय कोणताही उद्योग करता येत नाही. आता तिसरे पथ्य पाळा. डायरेक्ट "मॅन्युफॅक्चरिंग"मध्ये न उतरता एखादे वर्ष फक्त "ट्रेडिंग" करा. यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आपले "बिझनेस मॉडेल" काय असावे. बिझनेस मॉडेल म्हणजे 'उद्योग करण्याची पद्धत'. उदाहरणार्थ, तुम्ही स्वतः वस्तूचे उत्पादन न करता छोट्या उत्पादकांकडून ते करवून घेऊ शकता. तुम्ही त्यांना कच्चा माल व मशिनरी पुरवा. यामुळे प्रॉडक्शन व कामगार व्यवस्थापनाचे टेंशन तुम्ही टाळू शकाल. तुम्हाला ब्रँडिंग व विक्रीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येईल.
चौथे पथ्य हे भागिदार निवडण्याचे. हल्ली एकटा उद्योजक सर्व गोष्टी सांभाळू शकत नाही. भागिदार निवडताना त्याच्या स्वभावाला सर्वाधिक महत्त्व द्या. तुम्ही त्याला विशिष्ट कौशल्यासाठी निवडताय की त्याच्या भांडवलासाठी, हे नीटपणे ठरवा. नियंत्रण व भूमिका या दोन्ही बाबतीत लिखित करार करा. भावनेच्या भरात गोष्टी तोंडी ठेवू नका. त्याचे भांडवल स्विकारताना निरर्थक किंवा जाचक अटी मान्य करू नका. शक्य असल्यास तुमच्या कर्मचाऱ्यांपैकी उत्तम गुणवत्ता, स्वभाव व कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या एखाद्याला तुम्ही भागिदार बनवू शकता. हां, भागिदार बनताच त्याच्या अपेक्षा अव्वाच्यासव्वा वाढणार नाहीत, याची खातरजमा करा. पहिल्या पिढीतील भागिदार आपापसांत उत्तम वागतात. पुढच्या पिढीत परस्परसंबंधांबाबत प्रश्न उभे राहू शकतात. म्हणून अगदी सुरूवातीलाच भागिदार निवडताना त्याचे "सक्सेशन प्लॅन" तपासा. पाचवे पथ्य हे दूरगामी संकल्प (साधारणपणे तीन ते पाच वर्षांचे) बनविण्याबाबतचे असावे. यामुळे आपली उद्योजकीय वाटचाल ठरविता येईल जी कर्ज घेताना बँकरला दाखविता येईल. यामुळे बँकरचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढेल व बँकिंगच्या व्यवहारात सवलती मिळतील. दूरगामी संकल्पामध्ये प्रत्येक ध्येयासाठी किंवा स्ट्रॅटेजीसाठी दोन टार्गेट ठरवा - थोडे महत्वाकांक्षी व मध्यम. महत्वाकांक्षी म्हणजे "Desirable" आणि मध्यम म्हणजे "Compulsory". प्रत्येक मुख्य स्ट्रॅटेजीसाठी एक पर्यायी स्ट्रॅटेजीही ठरवा. एखादी स्ट्रॅटेजी अपयशी ठरत असल्यास सहीसलामत बाहेर पडण्याची योजनाही आखून ठेवा.
सहावे पथ्य हे भांडवल उभारणीबाबतचे. सुरूवातीलाच मोठे कर्जाऊ भांडवल घेऊ नका. पन्नास वर्षांच्या "लीज"वर भाड्याने जमीन घेऊन कारखाना उभा करा. लीजमध्ये भविष्यात ती जमीन विशिष्ट किंमतीला विकत घेण्याच्या पर्यायाची तजवीज करून ठेवा. हां, जमीन खूप स्वस्तात मिळत असेल तर ती विकत घेण्याचा प्रयत्न करा. एकदम मोठी मॅनुफॅक्चरिंग कॅपॅसिटी उभी करू नका. काही महत्त्वाचे प्रॉडक्ट्स तुम्ही स्वतः बनवा, काही बाहेरून बनवून घ्या. यामुळे गुंतवणूक व कर्जाचा बोजा कमी ठेवता येईल. पहिली पाच वर्षे नफ्याचा अधिकांश भाग उद्योगात गुंतवा. यामुळे बॅलन्सशीटला बळकटी येईल. नंतरही "करपश्चात नफ्या"चा अर्धा हिस्सा उद्योगात गुंतवत रहा. पहिली पाच वर्षे स्वतःचा कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. सातवे पथ्य हे खूपच महत्त्वाचे. सुरूवातीपासूनच आर्थिक, व्यवस्थापकीय व तांत्रिक नियंत्रणाची अद्ययावत पद्धती वापरण्यास सुरुवात करा. यामुळे उद्योजकीय शिस्त ही राहिलच पण सोबतीला "धोक्याचे इशारे"ही (Early Warning Signals) मिळत जातील. अनिश्चितता व धोक्यांचे व्यवस्थापन अचूक असायला हवे. याच सिस्टीममधून बाजाराची माहिती मिळायला हवी. कामगार, पुरवठादार, बँकर व ग्राहक यांच्याबाबतचे निर्णय व त्यांची अंमलबजावणी वेळेत व्हायला हवी. या 'सिस्टीम'मुळे करभरणा, ऑडिट, सरकारला द्यावयाचे अहवाल इ.ची पूर्तता ही नीटपणे करता येईल. प्रत्येक उद्योजकीय व्यवहाराची नोंद ही सिस्टीममध्ये रोज व्हावी व संपूर्ण पारदर्शकता पाळली जावी, हे पथ्य महत्त्वाचे. यामुळे उद्योजकाचे मन व मेंदू हे थाऱ्यावर राहतात. सिस्टीम बलवान असेल तर कोणताही उद्योजकीय मालक हा आपल्या कर्मचाऱ्यांना कामाचे मोठे स्वातंत्र्य देऊ शकतो. थोडक्यात असे की "सिस्टिमिक शिस्त" ही पहिल्या दिवसापासून पाळायला हवी.
आठव्या पथ्यानुसार सचोटी न पाळणारे पुरवठादार, ग्राहक, बँकर्स, ऑडिटर्स, भागिदार, वित्त सल्लागार, विक्री एजंट्स टाळा. बऱ्याचदा शॉर्टकट्सने मिळणारे फायदे हे आकर्षक वाटतात जे नंतर अडचणी व संकटे निर्माण करतात. आपला "बिझनेस ब्रँड" हा सचोटीने मोठा होत जातो जो बहुसंख्य ग्राहकांना, पुरवठादारांना, बँकर्सना व सरकारी अधिकाऱ्यांना आवडतो. "सरकारी व कायदेशीर पूर्तता करणारे अहवाल , ऑडिट, सिस्टीम मेंटेनन्स, अन्य कम्प्लाएंसेस" इ. गोष्टी उत्तम सेवापुरवठादारांकडून करवून घेतल्यास उद्योजकाची व त्याच्या टीमची ऊर्जा वाचेल. यामुळे उद्योगाकडे पूर्ण लक्ष देता येईल. नवव्या पथ्यानुसार तुमच्या "प्रॉडक्ट्स मिक्स"मध्ये तीन प्रकार बाळगा - ३०% मध्यम दर्जाचे, २०% उच्च दर्जाचे व ५०% सामान्य दर्जाचे. यामुळे सर्व प्रकारचे ग्राहक तुम्ही मिळवू शकाल, विक्री वाढेल, बाजारात तुम्ही सर्वत्र दिसू शकाल. विशिष्ट प्रकारच्या ग्राहकांवरच अवलंबून राहू नये, हा मोठा धडा कोरोनाच्या अवघड कालखंडाने आम्हाला शिकवलाय. शक्यतो सरकारी सवलतींवर आधारलेले प्रॉडक्ट्स टाळा, कारण सरकारी धोरणे ही बदलत असतात. सरकारी यंत्रणेवर गरजेपेक्षा अधिक अवलंबून रहायला नको. आपल्या प्रॉडक्ट्सचे ग्राहक भारताबाहेरही कसे निर्माण होतील, यावर भर दिला पाहिजे. स्थानिक व विदेशी बाजारांचे मिश्रण असण्याने विक्रीतील अनेक धोके टाळता येतात किंवा कमी करता येतात.
लेखाच्या शेवटी आपण दहावे पथ्य पाहूयात. तुमची 'उद्योजकीय वाटचाल' ही सुरूवातीला किमान वीस वर्षे उत्तम चालू ठेवण्यासाठी सत्कार - सोहळे, वेळेचा अपव्यय करणारे कार्यक्रम टाळा. ब्रँडिंगचा व नवे ग्राहक मिळवून देणारा प्रत्येक उपक्रम राबवा. यासाठी वेळ, ऊर्जा व साधने लागतात जी निरूत्पादक गोष्टींवर खर्चू नका. सुरूवातीला रोज किमान दहा तास काम करा, एक तास व्यायाम करा, कुटुंबासोबत व करमणूकीसाठी दोन तास घालवा, नव्या वाटचालीसाठी वाचन व लोकसंग्रह करण्याकरीता एक तास राखा, सामाजिक उपक्रम व संबंधांसाठी सरासरी एक तास, अनपेक्षितपणे येणाऱ्या घटनांसाठी एक तास आणि उत्तम निद्रेसाठी आठ तास रोज उपलब्ध असले पाहिजेत. तुमची टीम जसजशी मोठी व सक्षम होत जाईल, तसतसा फावला वेळ तुम्हाला अधिकचा मिळत जाईल. तुमच्या वरीष्ठ व उत्तम कर्मचाऱ्यांना "७० - ३०" या गुणोत्तरानुसार वेतन व कमिशन (किंवा बोनस) द्या, म्हणजे त्यांची कार्यक्षमता ही टिकून राहील. कामगारांच्या बाबतीत हेच गुणोत्तर "८५ - १५" असे ठेवा. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अंधश्रद्धा, अवडंबर, जातपात, अविश्वास, आळस व अहंकार या गोष्टींचा उद्योगात अजिबात शिरकाव होऊ देऊ नका. नम्रतेने, साधेपणाने व आपल्या लक्षावरच फक्त भर देत राहिलात तर शत्रूही कमी निर्माण होतील, स्पर्धक गाफील राहतील आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय आपली उद्योजकीय घोडदौड ही अव्याहतपणे चालू राहील ! नवउद्योजकांनो हा लेख आवडल्यास पुढील ईमेल पत्त्यावर जरूर कळवा -

[email protected]

----- डॉ. गिरीश जाखोटिया.

Copyright ©️ jakhotiya.com
Right to change/reproduce withheld, IPC copyright Act 1957. The article can be forwarded with author's name for public awareness.
वरील लेख भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार फेरफार अथवा नक्कल निषेधित. लेखकाच्या नावानिशी हा लेख विविध समूहांमध्ये पाठविता येईल.

We use an integrated approach for business consultations, combining global realities and Indian priorities. We observe moral accountability and use original ideas, while offering solutions to our clients. Our training programmes are based on latest research, pragmatic and practical business inputs a...

DIXON less one year return 141% Per Year bank Return 7%Power of SIP in Equity Stay update state invested
14/09/2024

DIXON less one year return 141% Per Year

bank Return 7%

Power of SIP in Equity

Stay update state invested

05/07/2024
Excellent feature introduced by GSTIN!Send messages and communicate with your suppliers if a tax invoice is not reflecte...
04/07/2024

Excellent feature introduced by GSTIN!

Send messages and communicate with your suppliers if a tax invoice is not reflected in GSTR-2B due to the non-uploading of the tax invoice in GSTR-1. For more details, refer to the video below:

 on June 27, 2024, the inaugural session of the 61st NCMAC was held at Ekta City, Statue of Unity, Narmada,  .We were ho...
28/06/2024



on June 27, 2024, the inaugural session of the 61st NCMAC was held at Ekta City, Statue of Unity, Narmada, .

We were honored to have CMA D.C. Bajaj, Former President of the Institute, as the Chief Guest of the convention. CMA Bajaj ji delivered an impactful presentation on India's economic growth with a vision for 2047.

His concise and effective presentation highlighted the significant contributions of CMAs to the nation's economic development.

Thank you, Shri Bajaj sir , for your inspiring presentation and congratulations on being the Chief Guest of the 61st NCMAC 2024.

I would also like to thank President CMA Ashwin bhai Dalwadi ji for Special issue of Outlook Business published on the occasion

Here are some pictures from the inaugural session.

10/06/2024

Best Wishes to All !🌟

As you face your exams today, remember your hard work and dedication have prepared you well.

Stay confident and calm, and trust in your knowledge and abilities.

This is your moment to shine.

Good luck and excel!





Icwai Pimpri Chapter

Hello AllWe are live on YouTube for the session on cooperative society audit.
01/06/2024

Hello All

We are live on YouTube for the session on cooperative society audit.

22/05/2024

Actually, being what you are is the simplest.

What is difficult is to stop being what you are not.

Stay Blessed Always!

keep smiling! 🥰

   Appellate Tribunals may be functional by year end, early 2025: The work on setting up the long-awaited Goods and Serv...
16/05/2024



Appellate Tribunals may be functional by year end, early 2025:

The work on setting up
the long-awaited Goods and Services Tax (GST) Appellate Tribunal seems to be picking up steam now and it is expected to be set up over the next few months. “The objective is to ensure that the GST

is operationalised at the earliest. It is likely to be done by the end of the year or early 2025, at the latest,” said a person close to the development, adding that the initial aim of setting them up by the middle of this year may get slightly delayed.

had on May 6 administered the oath of integrity and secrecy to Justice (Retd) Sanjaya Kumar Mishra as the President of the GST Appellate Tribunal.

The government is also in the process of appointing judicial and technical members for the appellate tribunal.

In February this year, the finance ministry had sought applications for a total of 96 posts in the GST Appellate Tribunals.

In all, there are 63 vacancies for the post of judicial members and 32 for technical members (Centre) and 1 for a technical member (state)

GST litigation & Legal Management insights Thanks to
09/05/2024

GST litigation & Legal Management insights

Thanks to

Address

Praveg Tent City Narmada, Dyke-3, Sardar Sarovar Dam Site, Kevadia,
Rajpipla
393151

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahendra Bhombe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share