05/10/2023
*💞🫶सर्व मुलांनो मुलींनो व /त्यांच्या पालकांनो, ऑक्टोबर महिना निघाला आहे आता लग्नाच्या तयारीला लागा, लग्न करायचं आहे ना नक्की कि नुसती जाहिरात कश्यासाठी????*💐🤝👨❤️👨🙏
*लग्न करायचं आहे ना नक्की मग कुठेतरी थांबायला शिका रे!! सर्वसाधारणपणे १७/१८ व्या वर्षी मुलगी वयात येते. या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही चांगल्या दिसतात. मुळातच सुंदर असल्या, तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात. विविध लग्नसमारंभात/कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात आणि बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात . विचारणा होते,*
*पण*.
*स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले तरी मुलीच्या बापाच्या डोक्यात वारं शिरतं. तो अचानक भाव खायला लागतो, "मुलीला अजून शिकायचे आहे, करीयर करायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे" असे सांगून अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात.*
*मग काय, मुलगीपण अभ्यासाला लागते. चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते,*
*पण*
*नुसत्या डिग्रीने काय होते, अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल, असे म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते. चेहऱ्यावरील गोडवा कमी होत जातो. (पुर्वीच्या पिढीत म्हणजे दहा पंधरा वर्षापुर्वीपर्यंत पंचविशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या)*
*मग*,
*मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.*
*बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा?*
*सरकारी नोकरीच हवी, किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा, किंवा खुप खुप पगार असावा, तसेच त्याच्याकडे गाडी-फ्लॅट हवा, दिसायला चांगला हवा, वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको, एकुलता एक शक्यतो नसावा, (सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां !) आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत, धंदेवाईक नको, शेतकरी नको, फक्त पुणे, मुंबई, बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा किंवा US/UK त असावा.*
*काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात, याला मर्यादाच नाही. बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८ वर येवुन पोहोचते. पोरगी नोकरी करायला लागली असेल तरी, किंवा नोकरी लागली नाही तरी, निसर्गनियमानुसार चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. तरीसुद्धा अजुनही तडजोड करायची तयारी नसते. जिथे नोकरी करते, त्याच गावातील स्थळ हवे.आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा, या नादात वये वाढत जातात. मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात. सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो.*
*बरे २८/३0 त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते. अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावर किंवा दोनतीन वर्षा नंतर मुल आणायचे असे यांचे महान विचार. तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.*
*मग*
*मग काय? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे. त्यांना स्वतःचेच सुधरत नाही, तर त्या काय पोरींचे बाळंतपण व पुढचे सोपस्कार काय करतील? पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.*
*नंतर मग*,
*नंतर काय ? ४/६ महीन्याचे बाळ आईच्या/सासुच्या हाती देऊन चालल्या नोकरीवर. त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही. खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. पण यांना कोण समजवणार??.*
*म्हणुन कीं मुली आणि मुलांनो*
*सर्व मुलींनो, मुलांनो आणि त्यांच्या पालकांनोआपल्या अपेक्षा कमी करा. काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका हो!! आणि कुणि फोन करून चौकशी केली तर एकमेंकाना घोळवत ठेवण्यापेक्षा जे कारण असेल ते स्षष्ट सांगत चला. संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतचं.*
*आपण ज्या गावी स्थळ पाहतो त्यागावातील काही लोक खोडासाळ असतात. अशी विघ्न आणणारी माणसे चुकीची माहिती देऊन दोन्हीकडील माणसांना लग्नकार्य मोडण्यासाठी प्रयत्न करीत असतात, त्यांना मुलां/ मुलींचे चांगले झालेले पाहावत नाही म्हणून चुगली करीत असतात. त्यांचे म्हणण्यानुसार दोन्हीही बाजूनच्या माणसांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घेऊन लग्नकार्य पूर्ण करून घ्यावे. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नये. काही चुकीचे वाटल्यास स्वतः निर्णय घ्यावा.*
*सोन्याचा साठा करुन मिळविलेल्या श्रीमंतीपेक्ष्या, सोन्याहून मूल्यवान मनुष्यांचा साठा ज्याच्याकडे आहे. तोच खरा श्रीमंत....🙏*
*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही व संविधान जिवंत ठेऊन वाचवा...!!!*
*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे ...!!!*
*🌺समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासुन नेहमीच दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*
*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏
🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹