काय म्हणतंय लातूर ?

काय म्हणतंय लातूर ? Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from काय म्हणतंय लातूर ?, Business Center, Latur.

काय म्हणतंय लातूर? हे वाक्य या महानगरपालिकेच्या निवडणुकीत फार गाजलं. भाजपाने लातूरकरांना काय म्हणतंय लातूर? असा सवाल केला आणि त्याचं खणखणीत उत्तर लातूरकरांनी आज १६ जानेवारीला कॉंग्रेसच म्हणतंय लातूर असं बहुमताच्या स्वरुपात दिलं !! नमस्कार !

“काय म्हणतंय लातूर?” हे वाक्य या महानगरपालिकेच्या निवडणुकीत फार गाजलं. प्रचाराच्या पहिल्या दिवशी भाजपाने लातूरकरांना “काय म्हणतंय लातूर?” असा सवाल केला आणि

त्याचं खणखणीत उत्तर लातूरकरांनी आज १६ जानेवारीला “कॉंग्रेसच म्हणतंय लातूर” असं बहुमताच्या स्वरुपात दिलं !!

आम्ही याच नावानं फेसबुक पेज सुरू करून आजपासून तुमच्या सेवेत लातूरचे अपडेट देण्यासाठी रुजू होत आहोत!!


लातूरच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीच निष्पक्ष, निर्भीड, समर्पक विश्लेषण, चिंतन व समालोचन या फेसबुक पेजच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

तरी आपण सर्वांनी या पेजला लाईक, फॉलो व शेअर करावे. पत्रकारितेच्या या नव्या अध्यायाचे आपण स्वागत कराल या अपेक्षेसह...

धन्यवाद!

लातूर पॅटर्न चे जनक माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दुःखद निधन !लातूर: एक शिक्षक, लेखक, विचारवंत आणि...
02/03/2026

लातूर पॅटर्न चे जनक माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांचे दुःखद निधन !
लातूर: एक शिक्षक, लेखक, विचारवंत आणि प्रखर वक्ते म्हणून ओळख असलेले डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. लातूर पॅटर्नचे जनक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात घडवलेला परिवर्तनाचा प्रवाह आजही प्रेरणादायी आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या भक्कम पायाभरणीत मोलाची भूमिका बजावली.
इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि विशेषतः African-American (निग्रो) साहित्याचे भाष्यकार म्हणून त्यांची शैक्षणिक ओळख राष्ट्रीय पातळीवर होती. दलित व पुरोगामी साहित्य चळवळीतील त्यांचा सखोल अभ्यास आणि वैचारिक सहभाग उल्लेखनीय राहिला आहे. कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, नगराध्यक्ष आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्यांमधून त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात प्रभावी नेतृत्व केले.
डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या वैचारिक लेखनाची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. ‘अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती’ (१९७८) हा अमेरिकन नीग्रो साहित्याचे विवेचन करणारा पहिला ग्रंथ, ‘आजचे शिक्षण : स्वप्न आणि वास्तव’, ‘चिंतन एका कुलगुरूचे’, ‘चिंतनयात्रा’, ‘दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी’, ‘परिवर्तन : संकल्पना, वेध आणि वास्तव’, ‘प्राथमिक शिक्षण : यशापयश आणि भवितव्य’, ‘बदलते शिक्षण : स्वरूप आणि समस्या’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातिअंताचा लढा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारक शैक्षणिक विचार आणि कार्य’, ‘महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण’, ‘माझे मूळ : माझे कूळ’, ‘लोकशाही आणि शिक्षण’, ‘विमर्श’, ‘विचारमुद्रा’, ‘शरद पवार : व्यक्तित्व, कर्तृत्त्व आणि नेतृत्व’, ‘शिक्षण : समाज परिवर्तन व राष्ट्रीय विकास’, ‘संपादन : कर्तृत्त्वाचा सह्याद्री’, ‘साहित्यचिंतन’, ‘स्वातंत्र्य : एक चिंतन’, ‘हाक आणि आक्रोश’ इत्यादी ग्रंथांमधून त्यांनी शिक्षण, समाजकारण, साहित्य आणि परिवर्तन यांवर सखोल विचार मांडले.
अशा या महान विचारवंताच्या निधनाने लातूर तसेच संपूर्ण मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक पटलावर शोककळा पसरली आहे. 'काय म्हणतंय लातूर' फेसबुक पेजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

10/02/2026

ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक?
नागपूर: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलून प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाच्या २३ जानेवारी २०२६ रोजीच्या परिपत्रकात प्रकाशित करण्यात आला. मात्र हा निर्णय ग्रामीण भागातील लोकशाहीसाठी घातक असल्याचा दावा करत निर्णय रद्द करण्याची मागणी करणाची याचिका न्यायालयात दाखल केली गेली.

बुलढाणा जिल्ह्यातील विविध गावांतील विद्यमान सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींनी दाखल केली. याचिकेवर न्या.अनिल किलोर आणि न्या.राज वाकोडे यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. राज्य शासनाने २३ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत संपत आहे किंवा संपणार आहे, त्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
१२ हजार ग्रामपंचायतींवर परिणाम
संविधानाच्या अनुच्छेद २४३-ई नुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुका ठरावीक कालमर्यादेत घेणे बंधनकारक आहे. निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलणे हे संविधानविरोधी आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १५१ फक्त अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत - जसे की नैसर्गिक आपत्ती, युद्ध, आणीबाणी किंवा गंभीर प्रशासकीय अडचणी - लागू करता येते. सध्या राज्यात अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात नाही. वैधरीत्या निवडून आलेल्या ग्रामपंचायतींच्या जागी प्रशासक नेमल्यास लोकशाही व्यवस्थेवर गदा येईल आणि ग्रामस्वराज्याची संकल्पनाच कमकुवत होईल. याचिकेत असेही नमूद करण्यात आले की, सदर परिपत्रकामुळे राज्यातील तब्बल १२,२३७ ग्रामपंचायतींवर परिणाम होणार असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडणुका पुढे ढकलल्यास ग्रामीण भागात लोकप्रतिनिधीविना कारभार होईल.

न्यायालय काय म्हणाले?
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सदर परिपत्रकात नमूद केलेली कारणे प्राथमिकदृष्ट्या चुकीची असल्याचे निरीक्षण नोंदवत, पुढील सुनावणीपर्यंत या परिपत्रकावर कोणतीही अंमलबजावणी करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या प्रकरणात पुढील सुनावणीदरम्यान, निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय संविधानाच्या चौकटीत बसतो का? वैध ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक नेमता येतात का,
आणि राज्य शासन व राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांची मर्यादा काय? या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.

धन्यवाद लोकमत ! सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन !!पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा !!!
10/02/2026

धन्यवाद लोकमत !
सर्व विजयी उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन !!
पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा !!!

लातूर विभागातून ९६ हजार ५४२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणारलातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मं...
09/02/2026

लातूर विभागातून ९६ हजार ५४२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी, बारावीच्या परीक्षेची अंतिम तयारी सुरू आहे. यावर्षी लातूर विभागातून ९६ हजार ५४२ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. मंगळवार (दि. १० फेब्रुवारी) पासून परीक्षेला प्रारंभ होणार आहे.
विभागीय शिक्षण मंडळाकडून लातूर जिल्ह्यात बारावीसाठी १०१ परीक्षा केंद्र नियुक्त करण्यात आले आहे. या ठिकाणी ३६ हजार ५१२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच नांदेड जिल्ह्यात ११२ केंद्रावर ४३ हजार २६९, धाराशिव जिल्ह्यात ४३ केंद्रांवर १६ हजार ७६१ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले. मंडळाकडून भरारी पथके, बैठे पथके नियुक्त करण्यात आले आहेत. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होणार असल्याचे विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी सांगितले.

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार असून, जिल्हा परिषदेच्या 'मिनी मंत्रालयाचे' ...
09/02/2026

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आज, सोमवारी जाहीर होणार असून, जिल्हा परिषदेच्या 'मिनी मंत्रालयाचे' कारभारी कोण असतील, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीस प्रारंभ झाला असून, दुपारी १ वाजेपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. एकूण १४२ टेबलांवर मतमोजणी होणर आहे.

06/02/2026

महापौर पदासाठी जयश्री सोनकांबळे तर उपमहापौरपदी अॅड. स्नेहल उटगे यांचे नाव जाहीर !

आपल्या सुमधुर स्वरांनी करोडो संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, स्वर कोकिळा, भारतरत्न  स्व. लता म...
06/02/2026

आपल्या सुमधुर स्वरांनी करोडो संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, स्वर कोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकर जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

१० फेब्रुवारीपासून बारावी, २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षाविद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी बोर्डाने कसली कंबर...
05/02/2026

१० फेब्रुवारीपासून बारावी, २० फेब्रुवारीपासून दहावीची परीक्षा
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी बोर्डाने कसली कंबर
लातूर : यंदा बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. परीक्षेच्या या काळात विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी बोर्डाने कंबर कसली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. परीक्षेचा सराव, विषयांची भीती आणि संभाव्य निकालाचा ताण यांमुळे अनेक विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात. विद्यार्थ्यांच्या मनातील ही भीती दूर करून त्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. आता विद्यार्थी केवळ एका कॉलवर आपल्या शंकांचे निरसन करू शकणार आहेत.
परीक्षेच्या काळात किमान सहा ते सात तास झोप घेणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार करा. वेळेचे नियोजन करून प्रत्येक विषयाचा अभ्यास व सराव करावा. पाणी भरपूर प्यावे; त्यामुळे एकाग्रता वाढते. परीक्षेच्या काळात सोशल मीडियाचा वापर टाळावा.

05/02/2026

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर वर्चस्वासाठी प्रतिष्ठा पणाला
लातूर : बालेकिल्ला अभेद्य ठेवत जिल्हा परिषदेचा गड जिंकण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीकडून निकराची लढाई सुरू आहे. एकमेकांवर जोरदार हल्ला चढवित धारदार टिकेच्या तोफा डागल्या जात आहेत. वर्चस्वासाठीच्या लढाईत सहाही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर आपली पकड कायम आहे, हे सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांकडून दररोज नवनवीन रणनीतीचा अवलंब करून डाव टाकले जात आहेत. सुरुवातीस प्रचाराच्या दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. मात्र, दोन दिवसांपासून राजकीय मंडळींकडून एकमेकांवर जोरदार टीका सुरु आहे. विकासाचे बोला, तुम्ही काय केले, हे आधी सांगा असे आव्हान दिले जात आहे.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ! बँक खात्यात 4500 जमा होणार !!लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेतील लाभार...
05/02/2026

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी !
बँक खात्यात 4500 जमा होणार !!
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा ४५०० रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मदत दिली जाते, या योजनेचा थेट राजकीय फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाल्याचं चित्र दिसून आलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्यानं अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. काही पैसे जमा न झाल्याने महिलांनी थेट संबंधितांकडे जात आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला होता, नाराज झालेल्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले नव्हते. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या.

या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम व अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा स्थितीत लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थकले होते, त्यांना आता एकत्रित ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्यांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता दिला जाणार आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेले आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?
निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत. हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काय म्हणतंय लातूर ? posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share