In Time Exports Advisory

In Time Exports Advisory ITEA offered range of services to Business Community with Experience of 23 years. Advisory On ,
* E

या लेखातील मुद्दे गांभीर्याने घेऊन योग्य पाऊल उचलले जावे...
30/04/2023

या लेखातील मुद्दे गांभीर्याने घेऊन योग्य पाऊल उचलले जावे...

*प्रदूषण आणि दिशाभूल करणाऱ्या आंब्याच्या बागा.*

प्रा. भूषण भोईर.

*नुकताच एक मराठी पेज वरती जामनगर येथील रिफायनरी क्षेत्रात तब्बल दीड लाख आंब्याची आमराई रिफायनरी ने फुलवली आहे, तिथे आंब्याचे भरघोस उत्पन्न कंपनी घेत असून जामनगर येथील रिफायनरी मधून कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा आमराई वर जराही परिणाम होत नाही किंबहुना रिफायनरी अजिबात प्रदूषण करणाऱ्या नसतात असे भासविण्याचा प्रयत्न लेखातून होतो आहे अशी शंका आली. सदर लेखात येथील रिफायनरी ने अगदी विपरीत परिस्थितीत शेती करून दाखवली आहे जिथे प्यायला पाणी नाही तिथे एवढ्या मोठ्या आमराई साठी पाणी कुठून आणायचं म्हणून कंपनी ने समुद्राचे पाणी निक्षरिकरण करून (desalination) आमराई वाढवली आहे. आणि प्रदूषण करी कंपनी आणि तिथेच शेती ह्या दोन टोकाच्या गोष्टी सहज शक्य आहेत असे भासाविण्याचा प्रयत्न केला आहे.*
*त्या मागचं सत्य काय आहे हे आता समजून घेऊ. हे खरं आहे की सदर रिफायनरीच्या अगदी जवळ तब्बल दीड लाख आंब्याची झाडे कंपनी न लावली आहेत पण त्यावर प्रदूषणाचा काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी खोटं ठरेल. कारण ही आमराई रिफायनरी च्याचीमणी पासून सात किमी उत्तरे जवळ बनवण्यात आली आहे. इथेच फार मोठी गोम आहे. कारण कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाचा प्रभाव चिमणीच्या अगदी जवळ म्हणजे पाच ते सात किमी अंतरावर होतच नाही*
*कारण चिमणी मधून निघणारे घातक वायू जे तुलनेने खूपच हलके असतात ते कधीच चिमणीच्या खाली वसलेल्या क्षेत्रावर पडत नाहीत ते उंचावर फेकले जातात. आणि उंचावरून वाहणारी हवा त्यांना दूर घेऊन जाते आणि रिफायनरी क्षेत्रात कुठेच प्रदूषणाचा परिणाम दिसत नाही परंतु रिफायनरी क्षेत्रा पासून वीस ते पन्नास किमी अंतरावर त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो.*
*आत्ता आणखी एक महत्वाची गोष्ट कंपनीने केली आहे ती म्हणजे चिमणी पासून आमराई ही तब्बल सात किमी उत्तरेला आहे. (ही बाब ज्या लेखाचा मी उल्लेख करत आहे त्यात खोटी लिहिली असून सदर बागायत रिफायनरीच्या पश्चीम दिशेला आहे असे लिहिलं आहे.) समुद्राजवळ हवा रात्री जमिनी कडून समुद्रा कडे आणि सकाळी समुद्राकडून जमिनी कडे वाहते. म्हणजेच पूर्व पश्चीम असा हवेचा प्रवास आहे. त्या मुळे चिमणी पासून उत्तरेला असलेल्या आमराई कडे चीमणीतून निघालेला धूर पोहोचतच नाही तो आमराई च्यामागील बाजूस पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करतो.*
तसेच, ऋतू बदल झाल्यावर देखील उन्हाळी मान्सून वारे पश्चिम निरुत्ये कडून पूर्व ईशान्य दिशेला वाहतात तर हिवाळी मान्सून (परतीचा पाऊस) हा ईशान्य कडून पाच्चीम नैऋत्य दिशेला प्रवास करतो. त्या मुळे रिफायनरी मधून निघणारा धूर कधीच ह्या आमराई मधे जातच नाही कारण तो नेहमी आमराईच्याविरुद्ध दिशेला जातो आणि अश्या रीतीने ही आमराई रिफायनरी क्षेत्रात असून देखील तिच्यावर प्रदूषणाचा अजिबात परिणाम होत नाही.
*सदर बाब ठाम पणाने मंडण्या साठी ह्या लेखा सोबत सदर आमराई आणि चिमणीची दिशा दर्शवणारा गुगल फोटो जोडत आहे. ज्यात रिफायनरी च्याचीमनी मधून निघालेले धुराचे लोट देखील उपग्रहांने टिपले असून रिफायनरी मधून उपग्रहवारून देखील प्रदूषण दिसते आहे. तसेच धुराचे लोट आमराईच्या विरुद्ध दिशेला जाताना दिसत आहेत. तसेच मान्सून वारे कश्या प्रकारे वाहतात ते दर्शवणारा फोटो देखील शेयर करत आहे.*
आता आणखीन एक बाब इथे नमूद करावी असं मला वाटतं ती म्हणजे सदर *लेखात आमराई साठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून वापरले जाते असं सांगितलं आहे आणि समुद्राचे पाणी निक्षारिकरण करणे कित्ती सोप्पे आणि फायदेशीर असल्याचे गळी उतरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु असे करत असताना जेवढे समुद्राचे पाणी निक्षारी करन केलं जातं त्याच्या दीडपटीने अतिशय क्षार युक्त(hyper saline brine) पाणी तयार होत ज्या सोबत घातक असे क्लोरीन आणि कॉपर युक्त विषारी द्रव्ये देखील तयार होतात जी थेट समुद्रात सोडावी लागतात ज्या मुळे समुद्रातील जीवसृष्टीचा विनाश होतो.*
*आता वर उल्लेख केल्या प्रमाणे जर १.५ लाख आंब्याच्या झाडांना निक्षरी करन केलेलं पाणी दररोज दिलं जात असेल तर त्याचा हिशोब मांडल्यास एकट्या आंब्याच्या झाडाला दिवसाला १५० लिटर इतक पाणी लागत. त्या हिशोबाने १.५ लाख आंब्याच्या झाडांना दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी द्यावं लागेल. आणि हे पाणी जर नीक्षारी करन केलेलं आहे असं पकडलं तर त्याच्या दीड पटीने अतिशय क्षार युक्त आणि विषारी द्रव्ये तयार झालेलं पाणी जे जवळपास २२.५ दशलक्ष लिटर घातक असे अतिक्षार युक्त पाणी दररोज कुठे टाकले जात असावे हा संशोधनाचा विषय असायला हवा.*
तर सांगायचं तात्पर्य हेच की अश्या दिशाभूल करणाऱ्या आमराई पासून आणि अश्या प्रकल्पा पासून आपण सावधच राहिलेलं बरं.
राहिली गोष्ट सदर मराठी पेज ने छापून आणलेल्या लेखाचा दाखला देऊन जर कोणी कोकणात रिफायनरीच समर्थन करीत असेल तर इथे आणखीन एक अति महत्वाची बाब मांडावी असं वाटतं. ती म्हणजे *कोकणात सह्याद्रीच्या पश्चिम दिशेला जिथून मान्सून येतो त्या बाजूस रिफायनरी ऊभी केली तर तिचा खूप वाईट परिणाम संपूर्ण सह्याद्री वरती होईल रिफायनरी तून निघालेले धुराचे लोट दररोज सकाळी पश्चिम दिशे कडून पूर्वेस वाहणाऱ्या हवे मुळे पूर्वे जवळ असणाऱ्या डोंगराळ भागात जातील. (जामनगर येथे भूभाग डोंगराळ नाही त्या मुळे धुराचे लोट डोंगराळ भागात अडले जात नाहीत. ) त्या मुळे पूर्व नियोजित नाणार येथे किव्वा बारसू सोलगाव येथे जर रिफायनरी उभी राहिली तर त्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात असलेल्या डोंगराळ भागातील जंगल आणि गावं रिफायनरी मधून आलेल्या प्रदूषणाला बळी पडणार हे निश्चित. तसेच मान्सून वेळी, पश्चीम नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्या मुळे रिफायनरी मधून निघालेले धुराचे लोट कित्तेक किलोमिटर उत्तर पूर्व दिशेला असलेल्या गावांमध्ये आणि समुद्राच्या पूर्वेला उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वतावर जातील ज्या मुळे त्यावर उभ्या असलेल्या वनराजाला आणि त्यात राहत असलेल्या माणसा सहित कित्तेक जीवांना त्याची भयंकर किंमत मोजावी लागेल. त्याच सोबत जेव्हा मान्सून येईल तेव्हा ढगांच्या सोबत वाफे मधे रिफायनरी मधून निघालेल्या विषारी वायू चे लोट यांचे संयुग होऊन पावसा सोबत खाली येतील आणि मग कोकणातील सर्व जमीन आणि नद्या देखील त्याची किंमत मोजतील आणि विषाक्त होऊन माणसाला त्याच्या करणीचे फळ देतील.
तरी उध्वस्त झालेल्या उत्तर कोकणातील एक भूमिपुत्र आणि पर्यावरण अभ्यासक म्हणून सदर माहिती मांडणे माझे कर्तव्य होते जे मी पूर्ण केले आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.

धन्यवाद.
प्रा. भूषण भोईर,
M. Sc. Zoology

Great Initiative ✨️✨️👍🏻
14/03/2023

Great Initiative ✨️✨️👍🏻

असा उपक्रम प्रत्येक गावोगावी राबविला पाहिजे. 🙏🏻🙏🏻
कौतुकास्पद उपक्रम...👌👌

Saturday Club Global Trust GOREGAON chapter meeting on 16Feb 2023. Great Sharing of Ideas, Business, References!!Those w...
19/02/2023

Saturday Club Global Trust GOREGAON chapter meeting on 16Feb 2023. Great Sharing of Ideas, Business, References!!
Those who missed, Book your diary date 2nd March 2023. ✨️🇮🇳

19/02/2023

व्यावसायिक संधीसाठी भारतात आजचा काळ हा सुवर्णकाळ
सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोथरूड चॅप्टर यांच्या वतीने आयोजित 'व्यवसायाची वज्रमूठ' चर्चासत्रात मराठी उद्योजकांचे मत

पुणे : मराठी माणसांची व्यावसायिकता काही टप्प्यांवर अडकली आहे. यश मिळवायचे असेल तर संघटित होणे गरजेचे आहे. एका नेतृत्वाने दुसरे नेतृत्व तयार करायला पाहिजे. एकत्र येणे आव्हानात्मक असले तरी एकजूट हाच यशाचा कानमंत्र आहे. भारताचा आताचा काळ सुवर्णकाळ आहे, यामध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. नोकरी व्यवसायासाठी बाहेरच्या देशांमध्ये जाण्याची गरज देखील पडणार नाही. त्यामुळे उद्योग व्यवसायासाठी तरुणांनी पुढे या, असा सूर मराठी उद्योजकांच्या 'व्यवसायाची वज्रमूठ' या चर्चासत्रात उमटला

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोथरूड विभाग यांच्या वतीने शास्त्री रस्त्यावरील संकल्प बँक्वेट येथे 'व्यवसायाची वज्रमूठ' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उपसरचिटणीस सुहास फडणीस, पुणे विभाग प्रमुख गणेश चव्हाण, कोथरूड चॅप्टर चे अध्यक्ष अजय पाटणकर, सचिव मकरंद आंबेटकर, खजिनदार आनंद कुलकर्णी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ऑर्बिटल इलेक्ट्रोमेकचे प्रवीण बीचे, निखिल तांबे, मंजिरी बीचे, सागर बावधनकर यांनी कोथरूड चॅप्टर वतीने श्री अभय जोशी यांनी संयोजन केलेल्या चर्चासत्रात सहभाग घेतला. कमी कालावधीत २०० कोटींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

प्रवीण बीचे म्हणाले, ऐकण्याची सवय नसल्याने मराठी माणसाची प्रगती होत नाही. अनेकदा अहंकार ही मुख्य अडचण ठरते. अहंकार कमी झाला तर प्रगती देखील होईल. एकमेकांसोबत पुढे जाऊ, एकटा माणूस पुढे जाऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

निखिल तांबे म्हणाले, नोकरी असो किंवा स्वतःचा व्यवसाय कामाचा आनंद घेता आला पाहिजे. कामाचा आनंद घेतला तर यश आणि पैसा आपोआप मिळेल. सगळ्यांनी श्रीमंत होणे गरजेचे आहे, फक्त मी श्रीमंत होईल ही भावना नको.

फोटो ओळ - सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोथरूड विभाग यांच्या वतीने शास्त्री रस्त्यावरील संकल्प बँक्वेट येथे 'व्यवसायाची वज्रमूठ' या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यशस्वी मराठी उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.

Entrepreneurs, join us. Let's grow together ✨️✨️💰💰
13/02/2023

Entrepreneurs, join us. Let's grow together ✨️✨️💰💰

Goregaon Chapter Business Meeting


या तेजस्विनी ला मानाचा मुजरा 🙏✨️
11/02/2023

या तेजस्विनी ला मानाचा मुजरा 🙏✨️

मुजरा
छायाचित्रात दिसणारी मुलगी म्हणजे श्रेया संतोष खरात. राहणार पाली गावची. घर जवळपास तोरण्याच्या सिमेवर. तिच्या घरापासून पाली दरवाजाने राजगडावर पोहचायचे म्हटले तर खुप लांबचा प्रवास. मी सुवेळा माची ते संजिवनी माची हा ट्रेक करताना मला एका कातळ कड्यावरून निदर्शनास आली. ती संजीवनी माचीला वळसा घालून तोरणा मार्गाने वर चढत होती. जेमतेम सात ते साडेसात वर्षांचा जीव. डोक्यावर पाण्याच्या, सरबताच्या व ताकाच्या दहा ब्रिसलरी बाटल्या घेऊन चढत होती. थोडावेळ हे दृश्य पाहून सुन्न झालो व कॅमेरा मध्ये छायाचित्र घेतले. कड्यावरून तीला गाठायचेच हा निर्धार केला. किल्ले राजगडाच्या दक्षिणेकडील सुवेळा माची ते संजिवनी माची दरम्यानची संपूर्ण तटबंदी तुडवत तूडवत प्रदक्षिणा पूर्ण करत व इतिहासाच्या पाऊलखुणा कॅमेरातुन छायाचित्राच्या माध्यमातून टिपत टिपत मी शेवटी या चिमूरडीला गाठले. तोपर्यंत ती बरीच वर चढून आली होती. तिच्या जवळ पोहताच तीने आवाज दिला दादा सरबत,पाणी, ताक घ्या की... मी तिच्या डोईवरच गाठोड खाली घेत विचारलं बाळा कुठची राहणार. पाली गावच नाव सांगितलं. शाळेत जातेस का? २ री मध्ये जातेय सांगितले व शिक्षणासाठी वह्या पुस्तके घेण्यासाठी रविवारी पाणी, सरबत विकते निरूत्तर झालो व ह्रदयात कुठेतरी खोल जखम झाल्यासारखे वाटले. नाव विचारले तर श्रेया म्हणुन सांगितले. खरच हा प्रसंग जाणून घेताना डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. आज हजारो पर्यटक गडकिल्ल्यांवर भटकंती करायला जातात खरे परंतु पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन जाणं शक्य होत नाही. श्रेयाच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या या गाठोड्यात मी मोजल्या तर चक्क दहा भरलेल्या बाटल्या होत्या. मी सरबत मुद्दामहून जास्त पीलो, पाण्याच्या बाटल्या घेतली. व पुढील एक वर्षांच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च येईल तेवढी रक्कम तिच्या हातात टेकवत तिचे गाठोड बांधत तिच्या डोईवर ठेवले. आठवण म्हणून एक सेल्फि घेत त्या चिमुरडीच्या जिद्दिला मुजरा केला.
गडकोट फक्त भटकंतीच नाही तर जगवायला पण शिकवतात हा श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श विचार अनुभवयाला मिळाला.
जय जिजाऊ जय शिवराय..
लेखक व छायाचित्र - रमेश खरमाळे
माजी सैनिक खोडद
Dm for credit 👍🏻🚩👌🏻

01/02/2023
12/07/2022

Your
TRUSTWORTHY Foreign Trade Advisor !

#
intimeexportsadvisory

17/06/2022

Yes, IEC updation is mandatory on annual basis. But, don't get trapped in fake SMS links.

20/11/2021

Exporters, Don't miss your MEIS Incentives.
Call now
9892258066

28/09/2021

Get your pending MEIS INCENTIVE now.
Contact immediately..

Address

Goregaon West
Mumbai
400104

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 2pm

Telephone

+919967913555

Alerts

Be the first to know and let us send you an email when In Time Exports Advisory posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to In Time Exports Advisory:

Share