Sanmati Bal Niketan

Sanmati Bal Niketan events organization

06/08/2025

मुलांचा पहिला फोन 📱

हल्लीच्या डिजिटल युगात मोबाईल म्हणजे एक अवयवच जणू असे झाले आहे.
तंत्रज्ञानाची ही क्रांती एक व्यसन होऊ पाहतीये !

तरीही आमच्या संस्थेतील बारावी पर्यंतची मुलं नो मोबाईल झोन मधे असतात.
पण मोबाईलशी संबंधित त्यांची जी काही कामं असतील, उदाहरणार्थ त्यांच्या शाळा/कॉलेज मधील काही महत्वाचे फॉर्म भरणे असो त्यासंबंधित OTP असो अशा कामांसाठी संस्थेचे फोन वापरले जातात.
संस्थेची कॉम्पुटर लॅब सुद्धा आहे तिथूनही स्टाफच्या मदतीने मुलांची ही कामे केली जातात.
मुलांच्या कळत्या वयात मोबाईल त्यांच्या हातात जावा.
जेणेकरून चूक काय बरोबर काय हे त्यांना कळावं.
हा उद्देश त्यामागे असतो.
त्यामुळे संस्थेतील मुलांना बारावी पास झाल्यानंतरच आपण मोबाईल देतो.

त्या नियमानुसार ह्या वर्षी आमचा पवन बारावी पास झालाय.
त्याला आज आम्ही सरप्राईज दिलं.
ताईने जेव्हा त्याला ऑफिस मध्ये बोलवून मोबाईलचा बॉक्स त्याच्या हातावर ठेवला त्यावेळी पवनच्या चेहऱ्या वरचा आनंद पाहून आपण त्याच्या भावना समजू शकतो.

काही गोष्टी शब्दात मांडणं अवघड असतं.
पण व्हिडीओ सगळं काही सांगून जातोय.

आजकाल मोबाईल मुळे मुलं भरकटतात.
अभ्यासा कडे दुर्लक्ष करून पर्यायाने त्यांच्या एकंदर प्रगतीवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो.

त्यामुळे लाडकोड एका बाजूला.
आणि शिस्त म्हणजे शिस्त त्यात हयगय नाही हा ताईचा शिरस्ता असल्यामुळे मोबाईल बारावी नंतरच हा नियम ठरलेला आहे.
आजकालच्या तरुणाईला फार विचारपूर्वक सांभाळावं लागतं.
शेवटी पिढी घडवणे ही सोपी गोष्ट नाही.

अधिक माहिती साठी संपर्क
+919370726424

















saptasindhu.maai #कारगिल_विजय_दिवसआपल्या देशात 1999 पासून 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो....याच...
26/07/2025

saptasindhu.maai
#कारगिल_विजय_दिवस

आपल्या देशात 1999 पासून 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो....

याच दिवशी भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला हरवून कारगिलच्या पहाडच्या उंच शिखरावर आपल्या तिरंगा ध्वज मोठ्या अभिमानाने फडकवला होता....
हा दिवस प्रत्येक भारतीय जवान त्यांचे कुटुंबीय आणि यां देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा होता....

त्या काळचे भारतीय लष्कर उपसरसेनापती "सय्यद अताहस नयन" यांच्या शब्दात सांगायचं झालं तर कारगिलच्या विजयाचं श्रेय भारतीय जवान त्यांचे कुटुंबीय भारतीय राजनैतीक निर्णय क्षमता आणि देशातील सामूहिक एकात्मता या सर्व गोष्टीना जातं......
या युद्धात भारतीय सैन्याने आपले जवळपास पाचशे सैनिक गमावले...
या युद्धाची सुरुवात जरी पाकिस्तानने केली असली तरी शेवट मात्र भारतीय सैन्याने केला...

3 मे 1999 पासून सुरु झालेल्या या युद्धाला 26 जुलै 1999 ला भारतीय विजयाने पूर्णविराम मिळाला.....
भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना दिलेलं हे प्रतिउत्तर म्हणजेच आपल्या भारतदेशाच्याच्या नकाशावर कोरलेली विजयाची यशोगाथाच जणू....

देशासाठी लढणारा प्रत्येक जवान हा कोणत्याही जात धर्माचा नसून आपण फक्त आणि फक्त भारतीय आहोत आणि आपल्यासाठी राष्ट्र प्रथम हा विचार डोक्यात ठेऊनच लढत होता...
अशा या वीर जवानांना आजच्या दिवशी कोटी कोटी अभिवादन 🙏🏻🙏🏻

िंद.... ारत....! 🇮🇳

#सप्तसिंधू
#सन्मती_बाल_निकेतन
#माई_परिवार.

आपणांस जन्मदिनाच्या शुभेच्छा
22/07/2025

आपणांस जन्मदिनाच्या शुभेच्छा

या उपक्रमाचं हे सलग तिसरं वर्ष.शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांची पण मुलांना ओळख व्हावी, रुची वाढावी...
01/06/2025

या उपक्रमाचं हे सलग तिसरं वर्ष.

शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयांची पण मुलांना ओळख व्हावी, रुची वाढावी यासाठी हा सगळा घाट.

आता सलग दहा दिवस वेगवेगळे विषय आणि त्याविषयी माहिती देणारे वेगवेगळी तज्ञ माणसे, त्यांचे सेशन्स, त्यावरची चर्चा यातच दिवस जाणार.

शिवाय सोबत ट्रेकिंग, संस्था व्हिजिट, मुव्ही हे ही आहेच.

ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या.

रोज सकाळी ११ ते १ या वेळात आमच्या मांजरीच्या संस्थेत मजा येणार आहे.. धमाल होणार आहे.

बघते आहेस ना मम्मा.!..

#संमती_बाल_निकेतन

#सप्तसिंधु

#माई_परिवार.

मुक्ताई
26/04/2025

मुक्ताई

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 💙🧡 #💙
14/04/2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती 💙🧡

#💙

धुळवड २०२५
14/03/2025

धुळवड २०२५

 #होळी
13/03/2025

#होळी

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanmati Bal Niketan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share