Tej astrology & Maha vastu consultant

Tej astrology & Maha vastu consultant सर्व लोक सुखी होत …।
सर्व लोक सुखी ?

17/12/2025

**बांगड्या आणि कानातले हरवल्या की चोरीला गेल्या...*

मागच्या आठवड्यात एक जातक माझ्या कडे सकाळी 11 वाजून 30 मिंटने आले. त्यांचा प्रश्न असा होता की माझे कानातले आणि बांगड्या सापडत नाही आहेत. मागील गणपतीच्या वेळी कानातले मी काढून ठवेले पण बांगडया कडे काही माझा लक्ष नाही गेला . पण 2 दिवसा पूर्वी मी बांगड्या आणि कानातले पहाण्यासाठी मी माझे कबाट खोलले तर त्या वस्तु त्या ठिकाणी नव्हत्या , आम्ही समपूर्ण घर पहिले पण आम्हाला काही सापडले नाही.

वरील प्रश्न कृष्ण मूर्ती पद्धती मध्ये प्रश्न कुंडली वरून पहातत्....

मी त्यांना 1 ते 249 कॉइन चा बॉक्स पुढे केला त्या मधील एक नंबर तुम्ही मला काढून घ्या असे सांगितले. नंबर आला 241

त्या वरून मी प्रश्न कुंडली बनवली . प्रथम जी वस्तू हरवली आहे ती दागिना आहे तो सुरक्षित आहे की त्याची विल्हेवाट लावली आहे का हे पाहणे गरजेचे आहे.
ते पहात असे ध्यानात आले दागिने हे जातकाला परत मिळणे नाही. त्याची विल्हेवाट लावली आहे.

म्हणजे वस्तू चोरीला गेलेली आहे .
आता पहायचे आहे की
चोर कोण....
चोर 7 व्या भवांतून पाहतात त्या वेळी असे वर्णन आले की ती व्यक्ती 50 ते 60 वर्षा च्या आतील आहे , विश्वासू आहे , दिसायला सावळी आहे , घरात नेहमी येणारी आहे. ती व्यक्ती नोकर आहे. व्यक्ती सावळी आहे.

अशी व्यक्ती त्याच्या घरात राहत आहे, मागील 30 ते 35 वर्ष ती त्याच्या सोबत रहाते, विश्वासनिय आहे.
त्यांना मी सांगितलं की त्यांना वरील वस्तु परत मिळणार नाही आहे चोरी होऊन भरपूर कालावधी झाला आहे.
पुढील कारवाई तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करावी.

तेज उवाच्य....!

तुमाला माहीत आहे का?घरात काळी मांजर पाळणे हे शुभ आहे. आपल्या प्राचीन ग्रंथात असे म्हटले आहे की काळी मांजर पाळावी. परंतु ...
26/11/2025

तुमाला माहीत आहे का?
घरात काळी मांजर पाळणे हे शुभ आहे.

आपल्या प्राचीन ग्रंथात असे म्हटले आहे की काळी मांजर पाळावी.

परंतु आपल्या भारतात अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धाचे वातावरण असल्या मुळे, तसेच हिंदी मराठी चित्रपटात काही अपशकुन दाखवते वेळी काळ्या मांजरीला दाखवले गेले त्यामुळे आपल्याला असे वाटते की मांजर हा प्राणी वाईट आहे.त्या मुळे वाईट शक्ती घरात येतात . असे मुळीच नाही आहे .
भारतीय प्राचीन ग्रँथा नुसार तुम्ही काळी मांजर घरात पाळू शकता.
तेज उवाच्य....!

16/10/2025

जे वास्तू मानत नाही त्याच्या कडून जेंव्हा +ve अभिप्राय मिळतो तेंव्हा खरोखर आपण जे मार्गदर्शन केलं ते फळास आले असे वाटते.....

6 महिन्या पूर्वी एक घराची वास्तू केली नैऋत्य चा दरवाजा पाहून मी सत्य पाहिले सांगितले की तुम्हाला माझ्या मार्गदर्शना मुळे फक्त 25 ते 45 % फायदा मिळेल. त्याचा परिणाम मिळणायचा कालावधी अनिश्चित असेल. त्याला 6 महिने ही लागतील अथवा 6 वर्ष .... त्या घरातील स्त्री वास्तू शास्त्र च्या पूर्ण विरोधात म्हणजे विज्ञानवादी होती अश्या वस्तु हलवून परिणाम मिळवता येतात ह्यावर पूर्ण आक्षेपच...!
जो जातक होता तो आजारपण कसे दूर होईल, हीच त्याची इच्छा होती.
पत्रिकेचा अभ्यास करून वास्तू मध्ये बदल करून किती + ve परिणाम गाठता येतील ह्याचा अभ्यास करून मी त्यांना बदल सुचवले. मुख्य त्या मध्ये फार वाद होते डोकी दोघनचेही गरम .... त्या साठी मी पहिला उपाय सुचवला तो त्यांनी पहीला केला . ईशान्य मध्ये बर्नर . ह्या व्यक्ती ला भरपूर डेकोरेशन ची आवड त्या मुळे अनेक मूर्ती, तसबीर, त्याने घरात लावल्या होत्या त्या मधील काही वास्तू उपाय होते. पण त्या योग्य देवते च्या जागेवर नसल्या मुले गोंधळ उडाला होता . त्याची पुनर्रर्रचना करून दिली ... सूर्याची 7 घोडे असले ली फ्रेम दक्षिण दिशे कडून पूर्व दिशेला ठेवली, असे भरपूर काही वस्तू ज्या वास्तू नुसार unorganise होत्या त्या योग्य झोन मध्ये ठेवल्या. आणि काही दिवसा पूर्वी विज्ञान वादी असलेल्या त्या स्त्री ने मला उत्तर दिले खोरखारच हे शास्त्र काम करते . आमच्यातील वाद भरपूर प्रमाणात कमी झाले आहेत. घरात एक शांतता, + ve नेस आला आहे. ह्या च्या आजारपणात पण सुधार आहे ज्या मुळे आम्ही सुखावले आहोत.

तेज उवाच्य....!

12/10/2025

नमस्कार जातक परिवारी , आज काल असे जातक मा‍झ्या कडे येत आहेत जे स्वत:चे भविष्य बदलण्या साठी येत आहेत. मला हा त्रास होतो आहे , त्या मधून मला पूर्णतः बाहेर काढा ..! किंवा मा‍झ्या हा प्रॉब्लेम आहे मला उपाय दया , असे ज्योतिष पहाता येत नाही. ज्योतिष शास्त्र एका धी घटना जातकाच्या आयुष्यात का घडते आहे त्या घटनेचा कालावधी किती आहे. ह्याचा अभ्यास करून तुम्हाला हे भोग किती दिवस भोगावे लागणार याची माहीत देऊ शकतो. प्रतेक प्रश्नाचे उत्तर हा उपाय नसतो . काही प्रश्नांची उत्तरे ही तुमच्या आयुष्यातील दशा महादशा वर अवलंबू असते त्या घटना तुम्ही उपाय करा अथवा करू नका त्या त्या कालावधी मध्येच घडणार. कोणताही ज्योतिषी उपाय सांगून घटना वेळे च्या आधी घडू शकणार नाही हे आपण लक्षात ठेवा. जे ज्योतिषी सांगतात की मी तुमचे सगळे प्रॉब्लेम निर्मूलन करून देईन तो केवळ तुमची फसवणूक करत आहे हे ध्यानात घ्या..! ज्या व्यक्ती ने ज्योतिष शास्त्र लिहिले ते पराशर मुनी संगतात ज्योतिष समजणे एवढे सोपे नाही... !
जे मीडियावर येऊन सांगता की हा उपाय करा तुमच्या घरी लक्ष्मी नांदेल हे सगळे थोतांड आहे.
ज्योतिष एक मार्गदर्शन आहे त्याचा तेवढाच विचार करावा तुमचे भविष्य बदलण्याची ताकद ज्योतिषा मध्ये नाही .

18/08/2025
05/07/2025

हे तुम्हाला माहित आहे का?

४५ देवता जश्या वास्तू पुरुषा ला पालथा घालून त्यावर आसनस्थ होतात. त्या देवतांची आपण वास्तू मंडल मांडून पूजा अर्चना करतो. एवढेच आपल्याला सध्या माहीत असेल जे पुरोहित करतात.

वास्तू शांत करण्या आधी1दिवस बळी कर्म करावे लागते अथवा आपले पुरोहित अथवा आपल्या चालीरीती प्रमाणे ते करावे.

तुमच्या घरच्या बहाय बाजूस असलेल्या काही देवतांना रक्त ,मांस असे बळी लागतात.

नैऋत्य दिशेला पुतना देव असते त्याला उडीद, शिजवलेला पक्का भात, रक्त ,हाड अर्पण करतात.

वायव्य कोनात पापराक्षसी ला मासे, मांस, मद्य, व आसवं अर्पण करतात.

वास्तू मंडलाच्या बाहेर घरच्या बाहेर पूर्व दिशेला स्कनद असून त्याला रक्त व मद्य अर्पण करावे.
पश्चिमेस जमभक असून त्यास मास व रक्त अर्पण करावे. उत्तरेस पिलीपिच्छाक असून त्यास रक्ताचा बली द्यावा.

ईशान्य कोनात असलेल्या भीमरुपास कबुतर, मद्य, चरबी, रक्त, मांस व खिचडी चा बळी द्यावा .

आग्नेय कोनात त्रिपुरांतक रूप धारण केलेल्या
आग्नेयास्त्रधरिला खिचडी बळी द्यावा.

नैऋत्य कोणातील अग्निजिह्व ला सैंधव व दुधाचा बली द्यावा
मांस व रक्ताचा बळी अर्पण करून त्या दिक्पालास नमस्कार करावा.
वायव्य कोणी असलेल्या करलिकाल ला शिजवलेले मांस, रक्त, सैंधव मीठ व दुधाचा बळी द्यावा .

वरील देवता तुमच्या घरच्या बाहेर असतात. वास्तू मंडलाच्या बाहेर त्यांना हे बली द्यावे.

घरच्या कुंपण आहलाल बाहेरील देवता

पूर्व दिशेला हेतुक असून त्याला खीर व रक्ताचा बळी द्यावा.
आग्नेय दिशेला आगणिवेताल असून त्याला रक्त व मास बळी द्यावा . पश्चिमेस कालाख्य असून मांस व भातचा बली द्यावा . उत्तरेस एकपाद असून त्याला खिचडीचा बली द्यावा.
आग्नेय व पूर्व दिशेला वितानक असून सुगंधित माला अर्पण करावी.
नैऋत्य व पश्चिम दिशेच्या ज्वालास दही ,अक्षता ,मोदक अर्पण करावे.

दिक्पालाना बळी अर्पण केल्या नंतर क्षेत्रपाल याना बळी अर्पण करावा .

नैऋत्य दिशेला भुतांना विशेष रित्या सायंकाळी बळी अर्पण करावा.

वास्तू शास्त्र..... बली कर्म

09/05/2025

व्यवसाय कोणता करावा .... चर, द्विस्वभाव, स्थिर,

जातंक हो काही कळलं का?

नाही ना....
हे कोण सांगतच नाही...
पुढे पाहू....

व्यवसाय कोणता करावा ? असा प्रश्न नेहमी विचारला जातो.

एक उदाहरण घेऊ कॅटरिंग आणि हॉटेल व्यवसाय

तुम्ही फूड चा व्यवसाय करा असा सल्ला सामान्य ज्योतिषी, अंक शास्त्र वाले देतात जातक मोठया आशेने व्यवसाय सुरू करतो
पण तो चालत नाही. ग्रह दशा उत्तम पण ग्राहक नाही... काय चुकले कोणी सांगेल का?

व्यवसाय कॅटरिंग चा असो अथवा हॉटेल जेऊ तर घालायचे आहे ....

कॅटरिंग आणि हॉटेल चा व्यवसाय जरी फूड चा असला तरी त्यांचा कोर निराळा आहे ते अनुभवी ज्योतिशीच सांगू शकतो

हॉटेल व्यवसायात अनेक ग्राहक यावे लागतात , मालकाचा हात सतत गल्यात असतो .... 100 ग्राहक जेव्हा येतील तेव्हा कुठे 10000 चा व्यवसाय होईल म्हणजे 100 बिल बनतील .... एवढी transaction होण्या साठी जातकाच्या कुंडली मध्ये नुसती ग्रह दशा चांगली असून फायदा नाही कोर माहिती असणे गरजेचे आहे.

दुसरा उदाहरण
कॅटरिंग चा व्यसाय चे घेऊ
एक व्यक्ती येतो आणि सांगतो की 100 माणसांचे जेवण हवे आहे . 10000 देऊन जातो .
इथे एकच transaction झाले आहे .

दोघेही फूड व्यवसाय मध्येच आहेत. काय कोर असेल

चर, स्थिर, द्विस्वभाव राशी

व्यवसाय करण्या साठी प्रवृत्त करणारा ग्रह चर राशीत असेल तर हॉटेल व्यवसाय अनेक ग्राहकांवर आधारित व्यवसाय,
स्थिर राशीत असेल घाऊक व्यवसाय म्हणजे कॅटरिंग एक ग्राहक ,
द्विस्वभाव असेल तर मध्यम ग्राहक असलेला व्यवसाय असा व्यक्ती एका पेक्ष्या जास्त व्यवसाय करतो, अथवा नोकरी करून व्यवसाय करतो.

नुसता हॉटेल व्यवसाय , कॅटरिंग व्यवसाय सुरू करून फायदा नाही आपलं व्यवसायतील कोर पॉईंट कोणता आहे हे माहीत असणे गरजेचे आहे.

सध्या यु ट्यूब ,इन्स्टाग्रामवर, अशा प्रसार माध्यमातून ग्राहक वाढण्यासाठी उपाय सुचवले जातात ते खरोखर उपयोगी पडतील का ?
तुमचा कोरच चुकला असेल तर ...
हे कोण सांगणार....

अर्धवटराव तुमचं नुकसानच करणार...

उपाय तेव्हचं काम करतील जेव्हा तुमचा व्यवसाय तुमच्या ग्रह दशा आणि व्यवसायचा कोर यांच्या शी एकरूप असतील....!

तेज उवाच्य....!

9320196969

श्री तेजस संभाजी साळसकर

# कृष्ण मूर्ती पद्धतीने ज्योतिष मार्गदर्शन..!

28/10/2024

**वास्तू शास्त्र वर बोलू काही*

नमस्कार दिवाळी ची सुरवात झाली खरी पण दिवाळी हा सण पाहता वास्तू शास्त्रशीच निगडित आहे. आपण आपले घर साफ सफाईला घेतो अडगळ कमी करतो. नको असलेल्या वस्तू काढून टाकून रंग रंगोटी करून नवीन वस्तू घरात स्थापन करतो, दिवे लावतो, गोड पदार्थ बनवतो खातो आणि वाटतो ही... दिवा आणि गोड पदार्थ हे मंगळ ग्रह शी संबंधित आहे .
तुमचा मंगळ ग्रह ठीक तर तुमचे करियर ,आर्थिक बाजू मजबूत करतो .

पण वास्तू मध्ये हा कोणत्या दिशेशी संबंधित येतो तर आग्नेय आणि दक्षिण आपण आज आग्नेय दिशे बद्दल असलेल्या वास्तू देवता बद्दल जाऊन घेऊ
ह्या दिशेला सविता आणि सावित्र ह्या देवता येतात .

सविता ही देवता वास्तू मध्ये संतुलन मध्ये असेल तर प्रत्येक कामात जी सुरवात करण्या साठी लागणारी ऊर्जा हवी असते ती प्रदान करते.
जिथे ही ऊर्जा असंतुलित असते तिथे त्या व्यक्ती ना नेहमी एक अडथळा अथवा त्याचे वाक्य असे असते की ...
"मी माझ्या ह्या कामाची सुरुवात कुठून करू मला समजत नाही आहे....मला गती मिळत नाही आहे.

ही देवता धन प्रदान करणारी देवता आहे.

त्या बरोबर ह्या दिशेला सावित्र ही ऊर्जा पण येते ही असुर ऊर्जा आहे.तर ही ऊर्जा संसाधन {resources} प्रदान करणारी देवता आहे. ही असुर देवता ऐश्वर्य प्रदान करते. ही देवता जर असंतुलित असेल तर जीवनात पुढे जाण्या साठी लागणारी ऊर्जा आपणास मिळणार नाही.

म्हणजे ह्या दोन देवता एक धन प्रदान करते तर दुसरी देवता ऐश्वर्य देते .

म्हणून आग्नेय दिशा संतुलित असणे फार महत्वाचे आहे.

ह्या दिशेला काय असावे तर अग्नी, लाल रंग, दिवे, तूप इत्यादी
तर काय नसावे पाणी, निळा रंग इत्यादी.

तेज उवाच्य...

Tej Astro Vastu Science

Tejas Sambhaji Salaskar

Mob: 9320196969

25/09/2024

lSRD वरून भविष्य कथन ...

2 दिवसा पूर्वी ची गोष्ट आहे सध्या पितृ पक्ष सूर असल्या मुळे जातकांची संख्या कमी असल्या मूळे जातक केंव्हा येतील त्याची वेळ निश्चित करायची होती.

येणाऱ्या जातकाने मंगळवारी 6:30 ते 7 च्या कालावधीत संध्याकाली येईन म्हणून सांगितलं होतं.

माझ्या मनात जातक उद्या केव्हा येईल ह्या प्रश्नांची तीव्रता आली त्या वेळची LSRD
L मंगळ S रोहिणी R वृषभ
D चंद्र
23 /09/2024/ वेळ संध्याकाळी 8 वाजता. मुंबई

जातक 24 तारखेला संध्याकाळी 6: 30 ते 7 च्या आत येणार आहेत हा निश्चित कालावधी आहे .
संध्याकाळी 6 वाजून 5 मी मिन लग्न सुरू होत आहे त्या मुळे मिन लग्नात घटना घडेल पण LSRD मध्ये गुरू नाही पण त्या दिवशी गुरू चंद्र युती होती चंद्र LSRD मध्ये आहे. म्हणून गुरू ही LSRD मध्ये घ्यावा लागेल.

निश्चित झाले की गुरू लग्न सूर असतानाच जातक येईल पण 6:30 ते 7 च्या ह्या कालावधी मध्ये केव्हा

6 :30 ला मीन लग्न उत्तर भाद्रपद शनीचे नक्षत्र सूर आहे पण lsrd मध्ये शनी नाही तर शनी वक्री देखील आहे. घटना घडणार देखील नाही, जातक येणार नाही.….तरी
नियमांची बांदा बांद करून असे ठरवले की जातक ह्या कालावधी मध्ये येणारच आहेत तर शनी ला आपण शिथिल करू .

Lsrd मध्ये प्रथम मंगल आहे म्हणजे घटना मंगळवारी घडणार हे निश्चित केले.
गुरू चे लग्न सुरू असेल त्या वेळीं पण कोणत्या मिनट ला जातक मला भेटायला माझ्या घरी येतील ......
मंगळ आणि गुरू यांचा वापर आपण केला राहिले चंद्र शुक्र चंद्र
6 30 ते 7 च्या दरम्यान जातक येणार पण कोणत्या मिनिट ला त्या साठी उप नक्षत्र पाहू लागलो 18 31 ला शुक्र चे उप नक्षत्र आहे पण त्या अगोदर चंद्र आहे तो बलवान कार्येश आहे मी पुढे जात रवी चे उप नक्षत्र पण रवी lsrd मध्ये नाही. पुढे चंद्राचे उप नक्षत्र 18: 40 सुरू होते पण आपल्या कडे आजून एक ग्रह बाकी आहे तो म्हणजे शुक्र
म्हणजे घटना मीन लग्नात शनी च्या नक्षत्रात चंद्राच्या उपनक्षत्रात व शुक्राच्या उप उप नक्षत्रात
म्हणजे सामान्य भाषेत 18 : 42 मी घटना घडेल .
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जातकांची वाट पहात होतो. डोळे बरोबर मोबाईल च्या वेळ वर होते.... तोच बेल वाजते
जातक 6 वाजून 42 मी. ला माझ्या घरात आले.

एवढे शुष्म भविष्य कथन फक्त kp पद्धती मधूनच काढता येऊ शकते.

तेज उवाच्य.....

Address

1206, 12th Floor Shree Sai CHS, , RB Chandorkar Marg, Agripada Mumbai 11
Mumbai
400011

Opening Hours

Monday 10:30am - 8pm
Tuesday 10:30am - 8pm
Wednesday 10:30am - 8pm
Thursday 10:30am - 8pm
Friday 10:30am - 8pm
Saturday 10:28am - 8pm
Sunday 10:30am - 8pm

Telephone

9320196969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tej astrology & Maha vastu consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tej astrology & Maha vastu consultant:

Share