Paraiso88

Paraiso88 We Focus on Industry & Agriculture entrepreneurship,new trends,opportunity,
business network,busines

25/06/2024
11/04/2023

शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करून व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती.
शेतकऱ्यांचा 'आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा,तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारीविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून मांडली.
समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी जोतिबांनी लिहिलेले ग्रंथ आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे.
महात्मा जोतीबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून,महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचवली.
छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.
सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥'
हे या सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
यामुळे जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनतेने त्यांना मुंबईतील एका सभेत इ.स. १८८८ मध्ये 'महात्मा' ही उपाधी दिली.
त्यामुळे जोतिबा फुले हे 'महात्मा फुले' या नावाने ओळखले जाऊ लागले.
याच समाजसुधारकास जयंती दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम..

FB Page- https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा..

11/04/2023

सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते, मनुवादी-विषमतावादी व्यवस्थेविरुद्ध बंड करून समतेसाठी आणि सत्यासाठी आजीवन चळवळ करणारे, बहुजन आणि स्त्रीयांच्या शिक्षणासाठी देह झिजवणारे प्रथम शिक्षक, आद्यगुरु, राष्ट्राचे खरे मार्गदर्शक, राष्ट्रपिता, क्रांतीबा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला, विचारांना व स्मृतींना विनम्र अभिवादन!

FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

जोशाबा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि  अॅग्रीकल्चरला द्वितीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छाFB Page - https://www.facebook.com...
16/05/2022

जोशाबा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज आणि अॅग्रीकल्चरला द्वितीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा
FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारेदया, क्षमा, शांतीची शिकवण देणारेविश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक श...
16/05/2022

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छा!!!
FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार", महामानव, बोधीसत्व, परमपुज्य, क्रांतीसुर्य, विश्वरत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिन...
06/12/2021

"भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार", महामानव, बोधीसत्व, परमपुज्य, क्रांतीसुर्य, विश्वरत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त विनम्र अभिवादन

महापरिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे. याचा शब्दशः अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण' असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही.
FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा26 नोव्हेंबर 1949 मध्ये, म्हणजेच या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.  डॉ...
26/11/2021

भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

26 नोव्हेंबर 1949 मध्ये, म्हणजेच या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. डॉ भीमराव आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान तयार करून राष्ट्राला समर्पित केले. आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच "संविधान दिन" साजरा केला. डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी "संविधान दिन" साजरा केला जातो. सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. मात्र त्याची खर्‍या अर्थाने अंमलबजावणी मात्र 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली.

FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: ही भारतीय आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरसर्व भारतीयांना ७५ व्यास्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छ...
15/08/2021

मी प्रथम भारतीय आणि अंतिमत: ही भारतीय आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

सर्व भारतीयांना ७५ व्या
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

साहित्य सम्राट, लोकशाहीर, विचारवंत, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने विन्रम अभिवादन FB Pag...
01/08/2021

साहित्य सम्राट, लोकशाहीर, विचारवंत, समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीच्या निमित्ताने विन्रम अभिवादन

FB Page - https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

" वर्षावास प्रारंभ व आषाढ पौर्णिमेचे महत्व" -- सुरेंद्र घरडेतथागत बुध्दांच्या जीवनात प्रत्येक पावन पौर्णिमेला काही-ना का...
23/07/2021

" वर्षावास प्रारंभ व आषाढ पौर्णिमेचे महत्व" -- सुरेंद्र घरडे

तथागत बुध्दांच्या जीवनात प्रत्येक पावन पौर्णिमेला काही-ना काही महत्वपुर्ण घटना घडली. १२ ही पौर्णिमेचे महत्व अतिशय महत्वपुर्ण आहेत. म्हणुनच जगातील प्रत्येक बौध्द व्यक्ती/ उपासक या पौर्णिमेचे महत्व समज़ुन त्या दिवशी उपोसथ व पंचशील ग्रहन करतो.
आज आषाढ पौर्णिमा :- तथागतांच्या जीवनातील अतिशय महत्वपुर्ण पौर्णिमा ही आहे. आजच्याच दिवशी शाक्यमुनी तथागत बुध्दांच्या जीवनात आषाढी पौर्णिमेस अशा काही पाच महत्त्वाच्या घटना घडल्या की, ज्यांच्या चर्चेशिवाय बुध्द चरित्राला परिपूर्णता येणे शक्य नाही.
१ ) राणी महामायेचे स्वप्न - आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अद्भुत होते. या स्वप्नात राणीने पाहिले की, चारही दिशेने दूत येतात, राणीचा शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या हिमवन्त प्रदेशातील एका शालवनाजवळील ‘अनोतवदह’ नावाच्या सरोवरावर नेतात. सुंदर, सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवतात. थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तेथे येतात. त्यांनी राणीस हळूच झोपेतून उठवून सुगंधी लेपने सर्वांगास सजवून राणीस स्नान घालतात. स्नानानंतर सुंदर सुसज्जीत वस्त्र देतात. त्यानंतर राणीस सुगंधी फुलांनी, सुवासिक अत्तरांनी असे काही सजवतात की, राणी एका सुंदर वनकन्येसारखी दिसू लागते. काही वेळाने सहा दंताचा शुभ्र गजराज तेथे येतो. त्याने आपल्या सोंडेत श्वेत कमलपुष्पांची माळ धारण केलेली असते. राणीच्या शय्येभोवती तो तीन प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो. नेमके याचं वेळी राणी स्वप्नातून जागी होते. दुस-या दिवशी सकाळी महामायेने हे स्वप्न शुध्दोधन राज्यास सांगितले. तेव्हा तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शम्म, ध्वज, लक्खण, मंत्री, कोण्डज, भोज, सुयाम, आणि सुदत्त या आठ स्वप्न शास्त्रांना दरबारात बोलावून घेतले. व राणीच्या स्वप्नाचा अर्थ त्यांना विचारण्यात आला. सर्वात वृद्ध शास्त्री होता त्याने राजास या स्वप्नाचा अर्थ सांगितला. तो म्हणाला “राजन आपण स्वप्ना संबंधी कसलही चिंता करु नये. निश्चत असावे. हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम अतिशय शुभ व मंगलमय आहे. आपल्या घरी लवकरच राजपुत्र जन्मास येणार आहे. या स्वप्नांच्या व्दारे राणी महामायेस या आषाढ पौर्णिमेच्या शुभ घडीस गर्भधारणा झालेली आहे.” म्हणूनच या आषाढ पौर्णिमेस ‘गर्भमंगल दिन’ म्हणतात. संपुर्ण जगात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
२ ) सिध्दार्थ गौतमाचा गृहत्याग - कपिलवस्तूच्या शेजारी रामग्रामचे कोलीय यांचे राज्य होते. या दोन राज्यांमधून रोहिणी नावाची नदी वाहत असे. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेती करीता वापरीत. नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे? व किती घ्यावे? याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात यांचा वाद होत असे. हा वाद कायमचा मिटवावयाचा असेल तर तो युद्धानेच मिटवावा असा निर्णय शाक्य संघाने आमसभेत घेतला. याच सभेत सिध्दार्थ गौतमाने असे घोषित केले की, “संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे.” “युद्धाने हा प्रश्न न सोडवता दोन्ही बाजूकडील दोन- दोन प्रतिनिधी निवडून द्यावेत. आणि त्यांनी एक पाचवा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा.” असे स्पष्ट मत सिद्धार्थाने मांडले. गौतमाचे हे मत म्हणजे शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान होते. जो कुणी संघाच्या निर्णया विरुध्द वागतो किंवा संघाचा आदेश मोडतो, त्यास संघ शिक्षा केल्या शिवाय सोडत नसे. म्हणूनच सिध्दार्थ गौतमाने स्वखुशीने देश त्याग पर्याय स्विकारण्यास तैयार झाले. सत्य व न्याय यापासून परावृत्त होणे यापेक्षा देशत्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला. म्हणूनच सिध्दार्थ गौतमाने दृ:ख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी घराबाहेर पडुन अन्नत्याग करुन अतिशय खडतर तपश्र्यर्यसारखा मार्ग स्वीकारला तो दिवस आषाढ पौर्णिमा होता.
३ ) पंचमवर्गीय भिक्खूंची दीक्षा-
भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मज्ञान कोणास सांगावे किंवा सांगू नये ? असा प्रश्न तथागतास पडला. संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुस-यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की, आत्मकल्याणा पुरताच तो सीमित ठेवावा असा विचार ते करु लागले. यास बुध्दांचा ‘विषादयोग’ असे म्हणतात. शेवटी तथागताने विचार केला. सर्व जगास शांती प्राप्त व्हावी, दुःखातून सर्वांची मुक्त्ता व्हावी हे तर आवश्यक आहे. तेव्हा या महान धम्माचा उपदेश इतरांच्या कल्याना करिता सांगण्याचा निश्चय तथागतांनी केला. सर्वप्रथम हा धम्म कोणास द्यावा असा विचार केला असतां त्यांना सर्वप्रथम आलारकालाम यांची आठवण झाली. तथागतांच्या मते तो विद्वान, शहाणा, बुद्धिमान व शुध्दचरणी होता. परंतु आलारकालाम मृत्यू पावल्याचे त्यांना समजले. त्यानंतर उद्दक रामपुत्ताला धम्मोपदेश देण्याचा विचार त्यांनी केला. परंतु तोही आठ दिवसांपूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तथागतांना पंचवर्गीय भिक्खूं कौण्डिण्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्रिक या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन प्रव्रज्जीत केले. यास ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ या नावाने संबोधतात. तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता.
४ ) भिक्खुं संघाची स्थापना:- बौध्द- धम्माचा प्रचार - प्रसार करण्याच्या उद्देशाने व हा मानव कल्यानाचा धम्म लोकांना कळावा या उद्गेशाने या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भिक्खुं संघाची स्थापना केली म्हणून या दिवसाला अतिशय महत्त्वाचे मानतात.
५ ) वर्षावास - पावसाळयात नदी नाल्यास पुर असतो. जंगलातून चालतांना हिंसक पशुंचा सामना करावा लागतो. पावसामुळे सर्वत्र हिरवळ असल्यामुळे चालतांना बारीक जंतु मरु शकतात. म्हणूनच पावसाळयात भिक्खुंनी एका ठिकाणी राहुन सामान्य जनतेला धम्म समजावून सांगावा. यालाच वर्षावास असे म्हणतात. भिक्खूनी बौद्ध धम्माची शिकवण देतां देतां चारिका करुन चरितार्थ चालवावा असा दंडक होता. दोन भिक्खूंनी एकत्र न फिरता वेग- वेगळ्या दिशेने धम्माचा प्रचार- प्रसार करावा. विहारात मुक्काम करुन धम्माचे तत्वज्ञान लोकानां समजावून सांगावे. याचं पावसाळ्यातील मुक्कामास ‘वर्षावास’ असे म्हणतात. वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते. आषाढ पौर्णिमा ही अतिशय महत्वपुर्ण आहे. त्याचे स्मरण करावे. उपोसथ करुन या काळात धम्म ग्रहण करावे. पंचशील , अष्टशील, दहा पारमीता चे पालन करुन मुक्त हस्ते दान द्यावे व स्वःताचे व इतरांचे कल्यान करावे.

FB Page- https://www.facebook.com/joshabaChamber
Facebook Live पाहण्यासाठी पेजला अवश्य Like/Follow करा.

Address

Plot E5, Opposite Best Bus Depot, Near Taxi Stand, Bhawani Chowk, Sector 11, Nerul East
Navi Mumbai
400706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paraiso88 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Paraiso88:

Share