22/12/2025
वास्तुमधील नकारात्मक शक्ती म्हणजे दरखेपेस एखादा अशुभ आत्मा/भुतबाधा असेलच असे नाही...
👉🏻 एखादी वास्तु निगेटिव्ह आहे किंवा तिथे तीव्र नकारात्मकता आहे याचा अर्थ तिथे नेहमीच आत्मा, भुतबाधा असते असं अजिबात नाही. निसर्ग हा असंख्य शुभाशुभ स्पंदनांनी व्यक्त होत असतो. अशी कित्येक स्पंदने अस्तित्वात असतात की जी मानवी प्रकट मनाला असह्य होतात. त्या विशिष्ट परिघात गेल्यावर डोकं जड होणे, नैराश्य येणे, सतत चुकीचे विचार येणे, अचानक तब्येत बिघडणे असे विचित्र अनुभव येतात त्यामागे फक्त स्पंदने किंवा कंपने असू शकतात. ही स्पंदने कधीकधी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकतात. अनेकांना हा एखाद्या आत्म्याचे प्रताप वाटतात पण तसंच नसतं. ही स्पंदने काही वेळा स्वयंभू असतात. विशेषतः जिथे बराचकाळ माणसांचं येणं जाणं नसतं अशा निर्जन स्थळी ती असू शकतात. जिथे प्रकाश (light) नसतो तिथे अशी स्पंदने असू शकतात. कधीकधी एखाद्या वास्तुत वेदनामय किंवा अनैसर्गिक मृत्यू घडलेले असतात तिथे तो विशिष्ट आत्मा पुढच्या प्रवासाला निघून जातो पण तिथे Residual vibrations राहून जातात. त्याचं रिडिंग अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं.
काही ठिकाणी पंचमहाभूतांची जडत्वकारक कंपने असतात, काही ठिकाणी तत्वातिरेक होतो. म्हणजे एक किंवा दोन तत्वांचं अनैसर्गिक कॉम्बिनेशन होऊन तो भूभाग निगेटिव्ह होतो. असे अनुभव ओपन प्लॉटमधे, शेतीवाडीत येतात. जिथे पंचमहाभूते, प्रकाश आणि स्वच्छता यांचा समतोल असतो तिथे ही स्पंदने रहात नाहीत. आपली वास्तू नेहमी आटोपशीर ठेवून त्यातील अनावश्यक वस्तू काढून नष्ट कराव्यात ते यासाठीच. अन्यथा त्या निर्जीव वस्तू तुमचं ऊर्जाशोषण सुरु करतात.
अशा दुषित स्पंदनांच्या वास्तुचे शास्त्रोक्त पद्धतीने शुध्दीकरण करावे लागते. विशिष्ट अभिमंत्रित यंत्रांची स्थापना करुन शिवाय तिथे त्या जागेवर काही वैदिक संस्कार, धार्मिक विधी करायला लागतात. त्या शुध्दीकरणानंतर हळूहळू ती स्पंदने विरत जातात... नष्ट होतात. दरखेपेस एखाद्या बाधेचा आणि आत्म्याचाच त्रास असेल असं नाही. आपले घर, बंगला, प्लॉट, इंडस्ट्री, शेतीसाठी यांची वास्तुव्हिजिट, परिक्षण आणि तत्सम शंकानिरसनासाठी [email protected] वर ईमेल पाठवा. ज्या समस्यांना गुरुआज्ञा येईल त्यांनाच रिप्लाय दिला जातो याची नोंद घ्यावी.
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)