Madhuri's Astrology and Consultancy

Madhuri's Astrology and Consultancy श्रद्धाअंधश्रद्धा ह्या मधील अस्पष्ट सीमारेषा ओळखून भविष्याचा घेतलेलाअचूक वेध व १००%अनुभवी उपायउपासना.

26/02/2026

#माहिती ग्रहणकाळात होलिका दहन
आणि धुळवड कधी साजरी करावी.

हिंदू धर्मशास्त्रानुसार, येत्या 2 तारखेला होळी (Holi 2026) असणार आहे. तर, 3 तारखेला धुळवड म्हणजेच धूलिवंदन असणार आहे. मात्र, यंदा 3 तारखेला चंद्रग्रहण देखील लागणार आहे. त्यामुळे धुलिंवदनाच्या दिवशी होळी साजरी करावी का? चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात देखील असणार आहे. त्यामुळे भारतात होळी, तसेच, धुळवड नेमकी कधी साजरी करायची या संदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे

त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होणार आहे. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. वृद्ध, अशक्त, आजारी, गर्भवती यांना सकाळी 11 पर्यंत अन्नपदार्थ खाता येतील. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल.

चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात देखील असणार आहे.. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, धुलिवंदनच्या दिवशी होईल. हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:17 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7:53 वाजता संपेल, जे कुंभ राशीत होईल. यावेळी ग्रहांची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. त्यामुळे 3 मार्च 2026 रोजी जरी चंद्रग्रहण असले तरी तुम्ही धुळवड खेळू शकता असे पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात.

MADHURI’ ASTROLOGY.

24/02/2026

*पंचमुखी हनुमान कवच*
हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली स्तोत्र आहे. त्यामुळे पंचमुखी हनुमान कवच घरात म्हणणे अत्यंत शुभ समजले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा, इडा-पिडा दूर होते आणि घराभोवती एक संरक्षक कवच निर्माण होते. कुटुंबातील सदस्यांचे संकटांपासून रक्षण करण्यासाठी याचे पठण लाभदायक आहे.

या स्तोत्राचे पठण आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. विशेषतः सकाळी सूर्योदयाच्या वेळी पठण करणे सर्वोत्तम मानले जाते (सकारात्मक ऊर्जेसाठी). आणि संध्याकाळी: दिवे लागणीच्या वेळी म्हणजे सूर्यास्तानंतर स्तोत्रपठण केल्याने दिवसभराचा ताण कमी होतो आणि घराचे रक्षण होते.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, संध्याकाळी हात-पाय धुवून, स्वच्छ होऊनच पाठाला बसावे.
*अध्यात्मिक दृष्टिकोनातून, कोणतेही स्तोत्र किंवा कवच रिकाम्या पोटी म्हणणे जास्त फलदायी मानले जाते, कारण त्या वेळी आपले मन आणि शरीर अधिक एकाग्र असते. मात्र, जर तुम्हाला आरोग्याच्या समस्या असतील किंवा सकाळी शक्य नसेल, तर तुम्ही काही खाल्ल्यानंतरही याचे पठण करू शकता. केवळ 'शुचिर्भूत' (स्वच्छ) असणे महत्त्वाचे आहे.

पठण करताना लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी :
* पठण करताना जमिनीवर लोकरीचे किंवा कुशाचे आसन टाकून त्यावर बसावे. थेट जमिनीवर बसू नये.
* शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. हनुमानाची मूर्ती किंवा फोटो समोर असेल तर उत्तम.
* पठण करण्यापूर्वी अंघोळ केलेली असावी किंवा किमान हात-पाय आणि तोंड धुवून शुद्ध व्हावे.
* जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कारणासाठी (किंवा संकट निवारणार्थ) हे कवच म्हणत असाल, तर संकल्प करून स्तोत्र रोज एकाच वेळी म्हणण्याचा प्रयत्न करा. तसेच हे पठण केल्यास 'ब्रह्मचर्य' पाळावे आणि मांसाहार न घेता आणि सात्विक आहार घ्यावा.

*|| पंचमुखी हनुमान कवचं ||*

श्री गरूड उवाच्||
अथ ध्यानं प्रवक्ष्यामि|
श्रुणु सर्वांगसुंदर| यत्कृतं देवदेवेन ध्यानं हनुमत्:
प्रियम्||१||
पंचकक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्| बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिध्दिदम्||२||
पूर्वतु वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम्| दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम्||३||
अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंहं महाद्भुतम्| अत्युग्रतेजोवपुष्पंभीषणम भयनाशनम्||४||
पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम्| सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम्||५||
उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं
दिप्तं नभोपमम्| पातालसिंहवेतालज्वररोगादिकृन्तनम्|
ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम्| येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यमं महासुरम्||७||
जघानशरणं तस्यात्सर्वशत्रुहरं परम्| ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम्||८||
खड्गं त्रिशुलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम्| मुष्टिं कौमोदकीं वृक्षं धारयन्तं कमण्डलुं||९||
भिन्दिपालं ज्ञानमुद्रा दशभिर्मुनिपुंगवम्| एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम्||१०||
प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरण्भुषितम्| दिव्यमाल्याम्बरधरं
दिव्यगन्धानु लेपनम सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतोमुखम्||११||
पंचास्यमच्युतमनेकविचित्रवर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यम्|
पीताम्बरादिमुकुटै रूप शोभितांगं पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि||१२||
मर्कतेशं महोत्राहं सर्वशत्रुहरं परम्| शत्रुं संहर मां रक्ष श्री मन्नपदमुध्दर||१३||
ओम हरिमर्कट मर्केत मंत्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले|
यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं यदि मुंच्यति मुंच्यति वामलता||१४||
इदं कवचं पठित्वा तु
महाकवचं पठेन्नरः।
एकवारं जपेत् स्तोत्रम् सर्वशत्रुनिवारणम् ॥ 15॥
द्विवारं तु पठेन्नित्यं पुत्रपौत्रप्रवर्धनम् ।
त्रिवारं च पठेन्नित्यं सर्वसम्पत्करं शुभम् ॥ 16॥
चतुर्वारं पठेन्नित्यं सर्वरोगनिवारणम् ।
पञ्चवारं पठेन्नित्यं सर्वलोकवशङ्करम् ॥ 17 ॥
षड्वारं च पठेन्नित्यं सर्वदेववशङ्करम् ।
सप्तवारं पठेन्नित्यं सर्वसौभाग्यदायकम् ॥ 18 ॥
अष्टवारं पठेन्नित्यमिष्टकामार्थ
सिद्धिदम् ।
नववारं पठेन्नित्यं राजभोगमवाप्नुयात् ॥ 19 ॥
दशवारं पठेन्नित्यं त्रैलोक्यज्ञानदर्शनम् ।
रुद्रावृत्तिं पठेन्नित्यं सर्वसिद्धिर्भवेद्धृवम् ॥ 20 ॥
कवचस्मरणेनैव महाबलमवाप्नुयात् ॥ 21 ॥
इति सुदर्शनसंहितायां श्रीरामचन्द्रसीताप्रोक्तं श्री पञ्चमुखहनुमत्कवचम् ।
|| श्री पंचमुखी हनुमान कवच समाप्तं ||

MADHURI’S ASTROLOGY.

23/02/2026

*होलाष्टक २०२६*

यंदा होलाष्टक 24 फेब्रुवारी ते 3 मार्च 2026 या कालावधीत असेल.
होळीच्या आधीचे आठ दिवस म्हणजे 'होलाष्टक' (होळी + अष्टक). या काळात ग्रहांची स्थिती काहीशी उग्र असते, ज्यामुळे मानवी मनावर आणि निर्णयांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शास्त्रानुसार, या काळात कोणतेही नवीन किंवा मांगलिक कार्य करणे टाळावे.

होलाष्टक का पाळले जाते? (धार्मिक कारण)
पौराणिक कथेनुसार, याच काळात हिरण्यकश्यपूने आपला पुत्र प्रल्हाद याला विष्णू भक्ती सोडण्यासाठी प्रचंड त्रास दिला होता. या ८ दिवसांत प्रल्हादाला विविध प्रकारे मारण्याचा प्रयत्न झाला, पण त्याची भक्ती ढळली नाही. शेवटी आठव्या दिवशी होलिका दहन झाले. प्रल्हादाला दिलेल्या या त्रासामुळे हा काळ अशुभ मानला जातो. जरी हे दिवस शुभ कार्यासाठी वर्ज्य असले, तरी आध्यात्मिक साधनेसाठी हे दिवस अत्यंत फलदायी मानले जातात.

१) या काळात जास्तीत जास्त इष्ट देवाचे नामस्मरण करावे. विशेषतः 'ओम नमो भगवते वासुदेवाय' किंवा 'महामृत्युंजय मंत्राचा' जप करणे शुभ मानले जाते.

२) गरिबांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने ग्रहांचे दोष दूर होतात आणि पुण्य मिळते.

३) भक्त प्रल्हादाप्रमाणे संकटातही आपली श्रद्धा डळमळीत होऊ न देणे हा या काळाचा खरा संदेश आहे.

४) होळीच्या आधी घराची स्वच्छता करावी, जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल.

*होलाष्टक काळात 'या' गोष्टी टाळा.*

१) होलाष्टकात ग्रहांचे स्वरूप उग्र असल्याने नवीन सुरुवात करणे टाळावे.

२) या ८ दिवसांत विवाह साखरपुडा किंवा मुंज यांसारखी मंगल कार्ये केली जात नाहीत.

३) नवीन घरात प्रवेश करणे किंवा नवीन वास्तूचे काम सुरू करणे या काळात वर्ज्य आहे.

४) नवीन गाडी, घर किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे या काळात टाळलेले चांगले.

५) नवीन व्यवसाय किंवा नोकरीची सुरुवात या काळात करू नये, असे मानले जाते.

*होलाष्टक ज्योतिषशास्त्रीय महत्त्व*

ज्योतिषशास्त्रानुसार, होलाष्टकाच्या काळात चंद्र, सूर्य, शनि, मंगळ, गुरु, शुक्र, बुध आणि राहु हे आठ ग्रह उग्र होतात. त्यामुळे या काळात घेतलेले मोठे निर्णय अनेकदा चुकू शकतात किंवा कार्यात अडथळे येऊ शकतात. म्हणून मनाला शांत ठेवून केवळ भक्तीवर लक्ष केंद्रित करावे.

MADHURI’S ASTROLOGY.

22/02/2026

#माहिती
मंत्राचे *वैज्ञानिक* विश्लेषण :

*ऐक्य मंत्र*
ऐक्य मंत्राच्या पठणाने ओक्सिटोसिन नावाचे हार्मोन तयार होते. घरात समाजात मिळून मिसळून एकोप्याने राहण्याची भावना वाढीस लागते.

*नवार्णव मंत्र*
मानवाच्या शरीरातील सर्व चक्रांना जागृत करते. नऊ अक्षरांचा या मध्ये समावेश आहे.मुलींनी बांगड्या घातल्याने त्यांच्या मनगटातील धमन्या व शिरा active होतात.

*राम रक्षा स्तोत्र*
या स्तोत्रातील 'र ' च्या उच्चाराने पित्ताशय, पित्त आणि आतड्यांचे काम balance होते.

*गायत्री मंत्र*
गायत्री मंत्राच्या पठणाने इपोनोप्रिन्स (Epinopnrins) नावाचे हार्मोन तयार होते. रोग प्रतिकारक शक्तीची वाढ होते.

*काल भैरावाष्टक स्तोत्र*
कालभैरावाष्टक स्तोत्राच्या पठणाने विशिष्ट प्रकारचे vibrations तयार होते त्यामुळे आपले ३ इंच पर्यंत संरक्षण होते. मुलांनी गंध टिळा लावल्याने भृकुटीमध्या वरील आज्ञाचक्र active होतात.

*प्रज्ञा विवर्धन स्तोत्र*
याच्या पठणाने पिनियल gland ला धक्का बसून मेमरी चार्जेस ची निर्मिती होते. स्मृतीभ्रंश चे आजार होत नाहीत.

*सरस्वती मंत्र,सुर्य मंत्र*,
*व गणपती अथर्व शीर्ष*
मेंदू मध्ये cortex नावाचा भाग असतो त्यात Cortizone नावाचे हार्मोन तयार होते. त्यामुळे बुद्धीमत्तेत वाढ होते सदबुद्धी वाढते.

*विद्याप्राप्तीकारक स्तोत्र*
या स्तोत्राच्या पठणाने DHA नावाचे हार्मोन तयार होते. बुद्धीचा योग्य वापर या हार्मोन मुळे होतो.

*दत्त महाराजांचा मंत्र*
"द्रां " हा दत्त महाराजांचा बीजमंत्र आहे. त्याच्या उच्चारणाने (सेल टिश्यू फॉरमेशन ) cell tissue formation चे काम प्रॉपर होते (जखम भरून येण्याचे काम ).

*शाबरी मंत्र*
Dopamine हार्मोन ची निर्मिती होते. विशेष महत्वाचे म्हणजे या हार्मोन चा balance राखला जातो.जर हार्मोन्स वाढले तर व्यसन गुन्हेगारी व कमी झाले तर नैराश्य.
{Post is forwarded.... Thankful to the original writer.}

MADHURI'S ASTROLOGY.

21/02/2026

#माहिती: #गुणमेलन:

लग्न जमवतांना मुलांमुलींसाठी कोणत्या राशीचा जोडीदार योग्य आहे हे पाहण्यासाठी फक्त राशी न पाहता संपूर्ण कुंडली, गुण, नाडी, भकूट, ग्रहस्थिती इत्यादींचाही विचार करणे आवश्यक असते. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या
राशीच्या पुरुषांना कोणत्या राशीची जोडीदार योग्य मानली जाते हे जाणून घ्या.

मेष
स्वभाव: रागीट, हट्टी, ठाम
योग्य रास: तुला
मेष राशीच्या पुरुषांसाठी तुला राशीची मुलगी संतुलन आणि शांतता आणणारी ठरते.

वृषभ
स्वभाव: शांत, स्थिर, संयमी
योग्य रास: वृश्चिक
वृषभ राशीच्या पुरुषांसाठी वृश्चिक राशीची स्त्री भाग्यवर्धक आणि सहकार्य करणारी असते.

मिथुन
स्वभाव: चंचल, बुद्धिमान
योग्य राशी: वृषभ, तुला, सिंह
या राशींच्या मुली मिथुन राशीच्या पुरुषांचे मन शांत ठेवतात आणि योग्य मार्गावर ठेवतात.

कर्क
स्वभाव: गोड बोलणारे, भावनिक
योग्य राशी: सिंह, मेष, धनु
या राशींच्या मुली कर्क राशीच्या पुरुषांसाठी सौभाग्य आणि उत्तम साथ देणाऱ्या ठरतात.

सिंह
स्वभाव: आत्मविश्वासी, पण रागीट
योग्य राशी: कर्क, मेष, वृश्चिक, धनु, मीन
या राशींच्या मुली सिंह राशीच्या पुरुषांच्या जीवनात संतुलन आणि सुख-शांती आणतात.

कन्या
स्वभाव: व्यवहारकुशल, विश्लेषणात्मक
योग्य रास: वृषभ
वृषभ राशीच्या मुलींसोबत कन्या राशीच्या पुरुषांचे भावनिक नाते अधिक दृढ होते.

तुला
स्वभाव: संतुलित, स्थिर विचारांचे
योग्य राशी: मेष, मिथुन, कन्या, मकर
विशेषतः मेष राशीची मुलगी तुला राशीच्या पुरुषांसाठी भाग्यवर्धक ठरते.

वृश्चिक
स्वभाव: भावनिक, अंतर्मुख
योग्य राशी: वृषभ, धनु, मीन
वृषभ राशीची मुलगी वृश्चिक राशीच्या पुरुषांचा आत्मविश्वास वाढवते आणि शुभ फल देते.

धनु
स्वभाव: उत्साही, चंचल
योग्य राशी: सिंह, मेष
या राशी धनु राशीच्या पुरुषांसाठी उत्तम जीवनसाथी ठरतात.

मकर
स्वभाव: कर्तव्यदक्ष, कधी कठोर
योग्य राशी: कर्क, तुला, वृषभ
या राशींच्या मुली मकर राशीच्या पुरुषांना भावनिक आधार देऊन भाग्योदय घडवतात.

कुंभ
स्वभाव: स्वतंत्र विचारांचे, प्रामाणिक
योग्य राशी: सिंह, वृषभ
या राशींच्या स्त्रिया कुंभ राशीच्या पुरुषांच्या प्रगतीस हातभार लावतात.

मीन
स्वभाव: संवेदनशील, कल्पक
योग्य राशी: मेष, वृश्चिक
या राशींसोबत मीन राशीच्या पुरुषांचे वैवाहिक जीवन अधिक सौख्यदायक आणि भाग्यवान ठरते.

MADHURI’S ASTROLOGY.

पूर्व जन्मांच्या स्मृति============अस म्हणतात कि ज्यांचा जन्म मृत्यु नंतर बऱ्याच वेळानंतर झाला आहे त्याला त्याला आपल्या ...
16/02/2026

पूर्व जन्मांच्या स्मृति
============
अस म्हणतात कि ज्यांचा जन्म मृत्यु नंतर बऱ्याच वेळानंतर झाला आहे त्याला त्याला आपल्या पुर्वजन्माच्या आठवणी नसतात.
तसेच जे आपले पूर्ण आयुष्य जगुन म्रुत्यूमुखी पडतात त्याना देखील पुर्वजन्माच्या आठवणी नसतात.

पण ज्यांचा मृत्यू एखाद्या दुर्घटनेत ,पाण्यात बुडुन अथवा अग्नीत भाजून अशा विविध कारणाने झाला असेल तर त्या व्यक्तीच्या पुर्वजन्मातील आठवणी जागृत असतात.
मात्र अस म्हणतात की ह्या स्मृती फक्त तीन वर्ष ते सात किंवा आठ वर्षांपर्यन्तच असतात व नंतर त्या स्मृती पुसल्या जातात.

MADHURI'S ASTROLOGY
CONTACT : 98903 20832

शनीच्या राशीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण : १७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष अमावस्येला वर्षातील पहि...
16/02/2026

शनीच्या राशीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण :

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. खगोलशास्त्रीयदृष्ट्या ही महत्त्वाची घटना असून यंदाचे हे ग्रहण वलयाकार (Annular) स्वरूपाचे असेल. ‘रिंग ऑफ फायर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकारात सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही, तर त्याभोवती अग्नीच्या वलयासारखा तेजोवलय दिसतो.

ग्रहणाची वेळ :

दुपारी ३:२६ वाजता आंशिक टप्प्याची सुरुवात, सायंकाळी ५:१२ वाजता वलयाकार टप्प्याची सुरुवात, ५:४२ वाजता ग्रहणाचा चरमबिंदू आणि सायंकाळी ७:५७ वाजता समाप्ती होईल.
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिकेतील काही भाग, अटलांटिक महासागर परिसर तसेच झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, झांबिया, मोझांबिक, मॉरिशस, टांझानिया आणि अंटार्क्टिका या प्रदेशांत ते दृश्यमान असेल.

सुतक काळ लागू होणार का?

धार्मिक परंपरेनुसार सूर्यग्रहण सुरू होण्याच्या सुमारे १२ तास आधी सुतक काळ सुरू होतो. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवणे, शुभकार्य टाळणे अशा प्रथा पाळल्या जातात. मात्र हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे पारंपरिक नियमांनुसार सुतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे नियमित धार्मिक व दैनंदिन कामकाजावर बंधन राहणार नाही.

खगोलशास्त्रीयदृष्ट्या ही एक नैसर्गिक आणि नियमित घडणारी घटना असली तरी सांस्कृतिक व धार्मिक परंपरांमुळे तिच्याकडे विशेष लक्ष दिले जाते. १७ फेब्रुवारी २०२६ रोजीचे हे वलयाकार सूर्यग्रहण त्यामुळे वैज्ञानिक आणि ज्योतिषीय अशा दोन्ही स्तरांवर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

MADHURI’S ASTROLOGY.

ईश्वर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातशांती, आनंद आणि अखंड प्रेमाची प्रकाशरेषा कायम ठेवो…त्याच्याच कृपेने आपल्यातील विश्वास आ...
14/02/2026

ईश्वर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात
शांती, आनंद आणि अखंड प्रेमाची प्रकाशरेषा कायम ठेवो…त्याच्याच कृपेने आपल्यातील विश्वास आणि श्रद्धा सकारात्मकतेच्या दिव्य शक्तीने सदैव फुलत राहो… 🙏✨”

।। ॐ वास्तु देवाय नमः ।।वास्तु पुरुष हा भूमी, भवन व बांधकामाचा संरक्षक देव असून तो ऊर्जा-संतुलनाचे प्रतीक आहे.घर, प्लॉट,...
02/02/2026

।। ॐ वास्तु देवाय नमः ।।

वास्तु पुरुष हा भूमी, भवन व बांधकामाचा संरक्षक देव असून तो ऊर्जा-संतुलनाचे प्रतीक आहे.
घर, प्लॉट, दुकान, कार्यालय किंवा कोणतेही बांधकाम असो “वास्तु पुरुष” तेथे विद्यमान असतो.

वास्तुशास्त्रानुसार तो भूमीवर अधोमुख अवस्थेत झोपलेला असून त्याचे डोके ईशान्य दिशेकडे असते. म्हणूनच कोणत्याही दिशेत केलेले बांधकाम त्याच्या एखाद्या अवयवावर परिणाम करते.

वास्तुचे नियम :
1. मुख्य दरवाजाची दिशा
2. स्वयंपाकघराची योग्य जागा
3. शयनकक्षाचे स्थान
4. स्नानगृह व जिन्याची दिशा
5. पूजा स्थानाचे निर्धारण

वास्तु दोषांचे परिणाम :
वास्तु पुरुषाच्या कोणत्याही अवयवाला त्रास झाल्यास घरात. मानसिक अशांती, आरोग्य समस्या, आर्थिक अडथळे, आपसी तणाव,
कार्यात अपयश अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

मत्स्य पुराणानुसार, भगवान शिवांच्या स्वेदातून उत्पन्न झालेल्या प्राण्याला देवतांनी भूमीवर स्थिर केले आणि तोच वास्तु पुरुष म्हणून ओळखला गेला. ब्रह्मदेवांनी वरदान दिले की वास्तु पुरुषाची पूजा केल्यास बांधकाम कार्य यशस्वी होते.

वास्तु दोष झाल्यास मानसिक अशांती, आरोग्य समस्या, आर्थिक अडथळे व आपसी तणाव निर्माण होऊ शकतो. वास्तु पुरुष प्रसन्न असल्यास घरात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी व स्थैर्य नांदते.

योग्य वास्तु, योग्य दिशा व संतुलन हेच वास्तु पुरुषाला प्रसन्न ठेवण्याचे मूलमंत्र आहे. 🙏

MADHURI’S ASTROLOGY.

31/01/2026

चंद्र आणि गुरू यांचा खगोलीय संयोग : ३१ जानेवारी २०२६

३१ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी आकाशात एक उल्लेखनीय खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. सूर्यास्तानंतर काही वेळात नैऋत्य दिशेकडे पाहिल्यास चंद्र आणि त्याच्या अगदी जवळ तेजस्वी गुरू (ज्युपिटर) ग्रह स्पष्टपणे दिसतील.

हा चंद्र-गुरू संयोग उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येईल ह्यासाठी कोणत्याही विशेष दुर्बिणीची आवश्यकता नाही. तथापि, दुर्बीण (binoculars) वापरल्यास चंद्राचा सौम्य प्रकाश आणि गुरूचे स्थिर, तेजस्वी तेज अधिक स्पष्टपणे अनुभवता येईल.

खगोलप्रेमी आणि सामान्य निरीक्षकांसाठीही हा एक सुंदर आणि लक्षवेधी अनुभव असेल.

MADHURI’S ASTROLOGY.

 #माहिती उद्या गुरुवार २२/०१/२०२६ रोजी माघी गणेश जयंती निमित्त माघी गणेश जयंती ची पूजा कशी करावी ? प्रथम सकाळी लवकर उठून...
21/01/2026

#माहिती
उद्या गुरुवार २२/०१/२०२६ रोजी माघी गणेश जयंती निमित्त माघी गणेश जयंती ची पूजा कशी करावी ?

प्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे. ह्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करणे शुभ मानले जाते.

गणपतीला मनापासून आवाहन करून एका पाटावर लाल वस्त्र अंथरावे वर तांदळाची रास घालावी. व त्यावर गणपतीची स्थापना करावी. जर मूर्ती धातूची असेल तर तिला दूध पंचामृत आणि पाण्याने स्नान घालावे. व मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवावी. जर मूर्ती मातीची असेल तर फक्त फुलांनी पाणी शिंपडावे. गणपती ला कापसाचे वस्त्र आणि जानवे अर्पण करा. कपाळावर हळदी कुंकू आणि चंदन लावून लाल फुले अर्पण करावी.

त्यानंतर अगरबत्तीने ओवाळून साजूक तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर २१ मोदकांचा नैवेद्य दाखवावा. ह्या दिवशी तिळाच्या लाडूचा किंवा तीळाच्या मोदकांचा नैवेद्य दाखवणे अत्यंत लाभदायक मानले जाते.

त्यानंतर
॥ ॐ गं गणपतेय नमः ॥
हा मंत्रजप म्हणत २१ दुर्वांची जुडी अर्पण करून गणपतीची आरती करावी. आणि शक्य असेल तर
* ॥ॐ गं गणपतेय नमः॥ (१०८ वेळा)
• अथर्वशीर्ष स्तोत्र पठण
( २१ वेळा )
* पंचमुखी गणेश स्तोत्र
( ५ वेळा पठण करावे )

माघी गणेश जयंतीच्या सोहळा दुपारीच साजरा केला जातो त्यामुळे शक्य असल्यास ही पूजा व आरती दुपारी १२ च्या आधीच करावी.

MADHURI’S ASTROLOGY.

बाप्पाच्या प्रभावी उपासना : गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी गणेश जयंती आहे, या दिवशी गणेश उपासना फलदायक ठरते. या उप...
19/01/2026

बाप्पाच्या प्रभावी उपासना :

गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी गणेश जयंती आहे,

या दिवशी गणेश उपासना फलदायक ठरते. या उपासनेसाठी मानसपूर्ती पंचमुखी गणेश स्तोत्राची
२१ आवर्तन करावी. यावेळी मंगलमूर्तीच्या चरणावर संकल्प करून मनातली इच्छा सांगून नमस्कार करावा. गणपती बाप्पाला मनोभावे विनंती करावी की माझ्या जीवनामध्ये मंगलमय वातावरण येऊन येणाऱ्या सर्व संकटावर मात करण्यासाठी आम्हाला ताकद दे, प्रतिकारशक्ती दे....

पंचमुखी गणपती स्तोत्राची २१ आवर्तने झाल्यानंतर गणपतीला २१ लाल फुले किंवा २१ दूर्वा वाहव्यात आणि दुसऱ्या दिवशी निर्माल्यात न सोडता आपल्या तिजोरी मध्ये ठेवाव्यात.

ज्यावेळेस आपण एखादी महत्त्वाची काम करायला जातो, किंवा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी जातो तेव्हा वाहिलेले दुर्वातील एखादी दुर्वा किंवा एखादे फूल आपल्या आपल्या जवळ ठेवावे.याच्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद आपल्याबरोबर असतो व कार्यात अपयश येत नाही. महत्वाचे म्हणजे आपल्याला बाप्पाचा आशीर्वाद आहे अस जेव्हा जेव्हा वाटेल त्या त्या वेळेस तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळते.

हा दिवस फक्त वर्षातून एकदा येतो त्यादिवशी आपण आपल्या घरामधील बाप्पाची अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना करून ही उपासना केल्यास जीवनामध्ये सुख समृद्धी व यश मिळते.

मनोकामना पुर्ण करणारे अलौकिक पंचमुखी गणेश स्तोत्र :

शंकराचार्य द्वारा निर्मित श्री *गणेश पंचरत्न स्तोत्र*

मुदा करात्त मोदकं सदा विमुक्ति साधकम् ।
कलाधरावतंसकं विलासिलोक रक्षकम् ।
अनायकैक नायकं विनाशितेभ दैत्यकम् ।
नताशुभाशु नाशकं नमामि तं विनायकम् ॥ १ ॥

नतेतराति भीकरं नवोदितार्क भास्वरम् ।
नमत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्ढरम् ।
सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरम् ।
महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् ॥ २ ॥

समस्त लोक शंकरं निरस्त दैत्य कुंजरम् ।
दरेतरोदरं वरं वरेभ वक्त्रमक्षरम् ।
कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करम् ।
मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् ॥ ३ ॥

अकिंचनार्ति मार्जनं चिरंतनोक्ति भाजनम् ।
पुरारि पूर्व नंदनं सुरारि गर्व चर्वणम् ।
प्रपंच नाश भीषणं धनंजयादि भूषणम् ।
कपोल दानवारणं भजे पुराण वारणम् ॥ ४ ॥

नितांत कांति दंत कांति मंत कांति कात्मजम् ।
अचिंत्य रूपमंत हीन मंतराय कृंतनम् ।
हृदंतरे निरंतरं वसंतमेव योगिनाम् ।
तमेकदंतमेव तं विचिंतयामि संततम् ॥ ५ ॥

महागणेश पंचरत्नमादरेण यो‌உन्वहम् ।
प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरम् ।
अरोगतामदोषतां सुसाहितीं सुपुत्रताम् ।
समाहितायु रष्टभूति मभ्युपैति सो‌உचिरात् ॥

इति श्री शंकराचार्य विरचितं श्री महागणेश पञ्चरत्नं स्तोत्र संपूर्णम्.

||शुभम भवतू||

MADHURI’S ASTROLOGY.

Address

Mumbai Pune Bypass Road
Poona

Opening Hours

Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm
Sunday 11am - 5pm

Telephone

+919890320832

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhuri's Astrology and Consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Madhuri's Astrology and Consultancy:

Share