ऊद्योगशाळा: Harshavardhan Ranade's school of entrepreneurship

  • Home
  • India
  • Pune
  • ऊद्योगशाळा: Harshavardhan Ranade's school of entrepreneurship

ऊद्योगशाळा: Harshavardhan Ranade's school of entrepreneurship It's a 1000 days mentoring concept for budding entrepreneurs by Harshavardhan Ranade, involving classroom training, hand holding & bonding of togetherness.

We are 100% result oriented finishing school for smart entrepreneurship.

16/09/2024

#हर्षोद्योग_सूत्रं : उद्योगातली जनरेशन गॅप
16.09.2024

तुम्हीही ही चूक करत नाही आहात ना?
आजची माझी प्रश्नार्थक पोस्ट थोडी वेगळी आहे. अर्थात स्टार्ट अप आणि उद्योजकतेच्या संबंधीतच आहे.
पण तरुणाई साठी नाही तर थोड्याश्या वयानी मोठया माझ्या मित्रगणांना addressed आहे.
आजच्या स्टार्ट अपच्या युगामध्ये , कोणत्याही वयात, सगळ्यांनाच स्वतःचं असं काहीतरी उभ करावं, छोटा का होईना उद्योग असावा असं वाटतं आणि त्यात चुकीचं काहीच नाही.
पण बरेचदा मला माझ्या व्यवसायामुळे होणाऱ्या तरुणाईबरोबरच्या संवादातून हल्ली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे.
गेल्या चार-पाच वर्षांमध्ये झालेल्या सुधारणांचा परिणाम आहे की हल्ली जवळपास सगळेच त्यांच्या मनातल्या मनात उद्योग उभा करायचा विचार करतात,
आणखीन यात वयानी मोठया माझ्या काही मित्रगणांच्या एक नकळत होणारी चूक घडते आहे, काही वेळा नक्कीच... ती म्हणजे उद्योग तर करायचाय मला, पण माझी अपेक्षा अशी असते तो उद्योग उभा करायला मला माझा मुलगा, भाऊ , मित्र अशा कोणीतरी जवळच्यानी मदत करावी. आणि त्या आपल्यापेक्षा वयाने तरुण असलेल्या मुलाने/मुलीने तुमच्या मनातील उद्योग उभा करावा अशी अपेक्षा त्या तरुण मुलाचे वडील, काका किंवा वयाने मोठे असलेले पण तो धंदा कंट्रोल करू पाहणारे (म्हणजे रोजचा निर्णय घेण्याची ज्यांची इच्छा असते ) असा वरीष्ठ व्यक्ती त्या तरुणांच्या जोरावर resource वर , तो व्यवसाय धंदा किंवा उद्योग त्या तरुणाई बरोबर चालू करतो. तरुण व्यक्तीने तो उद्योग पहावा तरच व्यवस्थापन करावं हे अपेक्षित असते.
बरेचदा किंवा मी असं म्हणेन की कधीच त्या तरुण व्यक्तीला जो त्या उद्योगाच व्यवस्थापन पाहतोय त्याला विचार स्वातंत्र्य कृती स्वातंत्र्य दिलं जात नाही आणि मग असं होतं की जो उद्योग ज्या पद्धतीने उत्तम व्हायला पाहिजे तो तसा न होता त्या पार्ट टाइम वरिष्ठ माणसाच्या ' मूड आणि फॅन्सी 'म्हणजे वैयक्तिक त्यांच्या आवडीनिवडी आणि विचार यावर अवलंबून असतो.
आणि मग होतं असं की जो तरुण उद्योजक किंवा मॅनेजर त्या उद्योगाच 24 तास नियोजन करत असतो, त्याचा विचार उद्योग व्यवस्थापनासाठी किंवा व्यवसायाचे निर्णय घेताना घेतला जात नाही.
तसेच या तरुण व्यक्तीला नक्की काय हवे आहे? त्याला नक्की हाच उद्योग ज्या पद्धतीने करायला सांगितलं जातोय त्याच पद्धतीने केला तर आवडतय का ? त्यात त्याचे शंभर टक्के तो तरुण देतोय का? याचा विचार वरिष्ठ भागीदाराकडून /बॉसकडून किंवा आजच्या भाषेत काही अंशी बोलायचं झालं तर उद्योगातल्या "इन्वेस्टर " कडून केलाच जात नाही. उलटपक्षी आपले निर्णय त्या तरुण व्यक्ती वर लादले जाण्याची शक्यता 100 टक्के निर्माण होते. आणि मग निर्माण होते तो त्या उद्योगातली जनरेशन गॅप! परस्पर निर्णय घेतले जातात. संवाद संपून विसंवाद सुरू होतो.
आपल्यात दरी निर्माण होते आहे अशी वरीष्ठ व्यक्तीची भावना व्हायला लागते..... आणि पूर्वी तरुणाई कदाचीत याबद्दल न बोलता आदरयुक्त भीतीमूळे गप्प बसायची, घुसमटून! पण आता ते न होता त्या स्टार्टअप उद्योगात अंतर्गत विरोध सुरू होतो... आणि ती तरुणाई सरळसरळ पाठ फिरवून त्या त्याच्याच उद्योगातून बाहेर पडते... उलट बोलतच नाही पण घुसमट पण सहन करत नाही. दुसऱ्या संधीच्या मागे जातो.
वयानी मोठा असलेला निर्णय घेणारा व्यक्ती मग असलेला आधार संपल्यावर कदाचीत सिंहावलोकन करतो पण तोवर त्या उद्योगाचे खूप नुकसान होतं..... जाणारा वेगळी वाट करून खूप पुढे गेलेला असतो.
म्हणूनच उद्योगात सुदृढ अंतर्गत संवाद हवा.
शुभं भवतु!

हर्षवर्धन रानडे ©
biznovators.in
Please note : माझ्या अनेक न भेटू शकणाऱ्या उद्योजकांनी आणि प्रशिक्षण घेणाऱ्या उद्योगमैत्रांनी खूप आग्रह केल्याने , मी माझ्या आगामी प्रकाशीत होणाऱ्या पुस्तकांत अशी काही प्रकरणे किंवा केस स्टडीज, विचार सादर करणार आहे. अपेक्षा आहे की तुम्हाला त्याचा उपयोग होईल. लिखाणाचे सर्व IPR rights-हक्क माझे आहेत ह्याची कृपया नोंद घ्यावी.
लोभ असावा ही विनंती...
हर्षवर्धन रानडे

17/06/2024

मैत्र जीवांचे!
काही माणसं आयुष्यात योगायोगाने भेटतात वयात अंतर खूप असतं वयात अंतर खूप असतं तरीही घट्ट मैत्री होऊन जाते. आपल्या तरुण वयात बरोबर कोणी नसता नाही अशी ग्रेट माणसं आपल्याला कधीच एकटं असल्याचं वाटू देत नाहीत.
खूप कौतुक असतं आपलं त्यांना! माझ्या स्वतःच्या आयुष्यात अशी माझ्यातल्या माणसाला जागा ठेवणारी माणसं नक्कीच आली. मग कधी त्यांची आजारपण कधी माझं आजारपण , त्यातच झालेला करोनाचा लॉक डाऊन, या सगळ्यात नंतर वाढलेला कामाचा व्याप! आणि मग अशाच एका मोकळ्या क्षणी त्यांनी काढलेली आपली आठवण एकदा भेटशील का म्हणून आलेला निरोप... असा निरोप आला ना की खरंच जीव तुटतो धावत पळत जाऊन त्यांना भेटावसं वाटतं पण ते प्रत्येक वेळी शक्य नसतं.
माझ्या आयुष्यात मला त्यांच्या जवळचे मानलं असे खूप आहेत पण खरंच ज्यांच्या भेटीसाठी जीव कासावीस झाला आणि मी पळत त्यांच्या भेटीला त्यांचा निरोप आलेल्या गेलो अशा दोघांबद्दल आज लिहितोय...
एक माझे निवृत्त झालेले भागीदार पण बाबाचे जवळचे मित्र अरविंद काका सरदार! यांच्याबरोबर मी दहा अकरा वर्ष २००० साल उजाडेस्तवर व्यवसाय केला ते. काही दिवसांपूर्वी अनेक वर्षांनी मी त्यांना भेटलो..... खरं तर रोज संध्याकाळी आम्ही गप्पा मारायचो, मी 20 वर्षाचा असेल आणि ते जवळजवळ 56 पण त्या दहा वर्षात रविवार सोडून एकही संध्याकाळ अशी नाही गेली की आम्ही भेटून असंख्य गोष्टीबद्दल बोललो खरं तर असायचं दिवसभरात काय झालं ते रिपोर्टिंग बद्दलच बोलणं पण ते दहा मिनिटातच व्हायचं, बाकीचा वेळ अनेक विषयांवर बोलयचो...अगदी राजकारणापासून समाजवादापासून रसायनांच्या निर्मितीबद्दलही, तो संध्याकाळचा सहा ते सात हा वेळ हा त्यांनी फक्त माझ्यासाठी राखून ठेवलेला असायचा त्याच्यानंतर बरेचदा मी आणि अरविंद काका रूपाली मध्ये कॉफी प्यायला जायचो..... आताही रूपालीत जातो तेव्हा कॉफी घेताना ते नेहमी आठवतात.
काही वेळा त्यांच्या बरोबर मी त्यांच्या गच्चीत पण त्यांच बागकाम पाहत बसायचो... वेळ मात्र ठरलेली तीच सहा ते सात नंतर ते त्यांच्या घरी आणि मी माझ्या घरी... आता कदाचित खूप क्वचित अशी भेट होईल... कारण ते आता खूप थकलेत....
असेच दुसरे एक स्नेही मला 2000 सालानंतर मिळाले आत्ता या दोघांबद्दल लिहितोय याला कारण तेच आहे एक जेव्हा माझ्या आयुष्यातून निवृत्त झाले त्याच वेळेला हे दुसरे तसेच परफेक्शनिस्ट मैत्र माझ्या परिचयाचे झाले खरंतर आम्ही तिघं कधीही एकत्र भेटलेलो नाही. पण तो ज्ञानाचा दुवा एकमेकांवर असलेल्या प्रेमाचा हितचिंतकाचा आदर्श अगदी तसाच आहे .
खरंतर या पोस्ट मागचं कारण तेच आहे, हे माझे दुसरे मित्र म्हणजे श्रीरंग गोखले मला ते भारतीय युवा शक्ती ट्रस्ट byst या संस्थेचा शिवाजीनगर मेंटर्स चॅप्टरचा चेअरपर्सन म्हणून मी जेव्हा काम पाहत होतो, तेव्हा भेटले. फिलिप्स सारख्या MNC कंपनीमध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये मोठ्या पदावर त्यांनी काम केलं होतं आणि byst या संस्थेच्या उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते तिथे यायचे हळूहळू आमची घट्ट मैत्री जमली . अनेक ठिकाणी मी त्यांना आणि त्यांनी मला वेगवेगळी व्याख्यान द्यायला वेगवेगळ्या चर्चासत्रांना बोलवलं . आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन एकदा परमपूज्य बाबासाहेब पुरंदरे यांना सुद्धा आमच्या उद्योजकांना मेंटर्स ना भेटायला बोलावलं होतं 2012 नंतर मी माझा या संस्थेतलं काम कमी केलं आणि माझ्या जागेवर श्रीरंग गोखले काम पाहू लागले. त्यांनी नंतरही पुढे खूप काम तिथे केलं. आम्ही दोघेही हे काम विनामूल्यच करायचो.
शेकडो उद्योजक आम्ही या संस्थेत घडवू शकलो. मी जरी तिथलं काम थांबवलं तरी सुद्धा श्रीरंग गोखले मला कायम भेटत राहिले. त्यांच्या सॅटर्डे क्लब मध्ये सुद्धा त्यांनी माझा दोन दिवसाचा सेमिनार खूप धडपड करून 60, 65 लोकांसाठी आयोजित केला होता. माझ्या गणपती वरच्या श्रद्धेपासून माझ्या उद्योजकतेतल्या कामाचं त्यांना प्रचंड कौतुक आहे त्यांनी त्याच्यावर लेख पण प्रसिद्ध केलेत.
माझ्या आजच्या या पोस्टचा श्रेय शंभर टक्के श्रीरंगना
जात.
काल मला त्यांचा फोन आला असंच जवळजवळ चार एक वर्षांनी, आता माझ्या आणि त्यांच्या वाटा खूप वेगवेगळ्या झाल्यात भेटीही कमी झालं मध्ये म्हटल्याप्रमाणे त्यांचा आजारपण त्या आजारातून ते यशस्वीरित्या बाहेर पडल्यावरही मी एकदा भेटलो होतो पण खूप इमोशनल व्हायला लागलं म्हणून मग नंतर खरं तर भेटायला जायचं टाळलं, कॉन्ट्रॅक्टर रानडे आमच्या कुटुंबाशी त्यांचं दूरचं नातं आहे त्यामुळे त्या संदर्भात कधी काही माहिती मिळाली की ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवत.
पण आमची भेट काही झाली नव्हती. काल त्यांचा फोन आला आणि मग विचार केला की उगीच भेट टाळण्यापेक्षा जाऊन भेटायलाच हवं कामाच्या व्यापात आणि होणाऱ्या व्यावसायिक वाढीमध्ये मला परत कधी जाऊन भेटायला मिळेल आणि परत एवढ्या गप्पा मारायला वेळ मिळेल का हा प्रश्नच होता, म्हणून आज सगळी कामं बाजूला ठेवली आणि श्रीरंग गोखल्यांबरोबर चहा प्यायला गेलो. खूप गप्पा मारल्या. मधली दहा-बारा वर्ष जणू काही हवेत विरून गेल्यासारखे झाली.
मी नेहमी प्रत्येक गोष्टीत काहीतरी दुवा असतो आणि तो तुम्हाला जिवंत ठेवतो तुमच्यातलं माणूस पण जपतो या को रिलेशन थेअरीवर विश्वास ठेवतो म्हणून आज त्यांना भेटल्यानंतर श्रीरंग दादा आणि अरविंद काका या दोघांबद्दल थोडेसे लिहावं आणि त्यांचा माझ्यावर भरोसा एक एक फोटो पोस्ट करावा आणि आयुष्यभराची मेमरी आठवण या आभासी जगात निर्माण करावी असं ठरवलं.
या सगळ्या घटनेचा साक्षीदार म्हणून माझं तरुण उद्योजक विद्यार्थी समीर कुलकर्णीला पण मी माझ्याबरोबर घेऊन गेलो होतो कदाचित अजून काही वर्षांनी समीर पण असा माझा आणि त्याचा फोटो पोस्ट करेल......
असं बोलता बोलता बरेच लिहिलं पण ज्यांच्याबद्दल आपल्याला खरंच वाटतं ते जोवर आपल्या बरोबर आहेत तोवरच त्यांना तुम्ही किती माझ्यासाठी महत्त्वाचे होतात हे सांगणं गरजेचं आहे. मी माझं वर्तुळ असं पूर्ण करतो.
आज जेव्हा ते दोघे हे वाचतील. तेव्हा थोडासा आगाऊ असणारा त्यांचा विनीत रानडे किंवा नकळत त्यांनी घडवलेला हर्ष रानडे त्यांना किती मानतो त्यांच्यावर किती प्रेम करतो हेही त्यांना परत कळेल नाही का? आणि आमचंही एक वर्तुळ त्या अवकाशात पूर्ण होईल.
तुम्हालाही मित्रांनो असे तुमचं कौतुक करणारे लोक भेटले असतील ना तर त्यांना जरूर जा भेटा आणि सांगा की आपण मानतो तुम्हाला! तुम्ही माझ्यासाठी ग्रेट होतात आणि असाल!
ह्यातला पहिला फोटो आहे तो मी आणि अरविंद काका यांचा आणि दुसरा फोटो जो आहे तो आहे श्रीरंग दादा आणि माझा त्यात श्रीरंग दादांनी टोपी घातली आहे. समीरचा आणि माझा आत्ता देणार नाही, तो अजून दहा-पंधरा वर्षांनी समीर मला टॅग करूनच पोस्ट करेल असंच काहीतरी मैत्र जीवांचे किंवा ऋणानुबंधाच्या असं म्हणून.....
हर्षवर्धन रानडे ©
www.biznovators.in

09/06/2024

त्रिवार अभिनंदन
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी!
त्रिवार अभिनंदन!!!

15/05/2024

Growth is constant.
My www.biznovators.in is immediately looking for three sr. managers for 1. finance , and 2. BD and client coordination. The package would involve Best incentives and suitable remuneration. Need a commitment for atleast 20-24 months and minimum 2 months notice before leaving the job. Signing Nondisclosure agreement is needed. Location @ Deccan,Pune. walking distance from JM Rd Metro station. Send CVs on WhatsApp on 8888861767 or mail on [email protected] 📞9822798940

22/01/2024

आज श्रीराम दीपावली साजरी करुया!

30/09/2023

आज घरी लवकर आलो. सहाला म्हणजे निदान 3 तास आधी ....
काहीही प्लॅन केलं नव्हतं . दिवस छान गेला होता. आराम चालला होता . रविवार सकाळ गप्पांच्या बैठकीचा असतो ते ही ठरवलं, आणि फेसबुक पोस्ट पाहता, आमच्या नाना साहेबांचा आजतक वर interview ऐकताना त्यांच्या नव्या व्हँकसीन या सिनेमाच्या बद्द्ल नव्या गोष्टी कळल्या. नाना पाटेकर म्हणजे मराठीचं एक सुवर्ण पान..... आणि मग मी मराठी भाषा तीच भाषालावण्य... यांचा विचार करताना आपोआपच नॉस्टॅल्जिक झालो.... आणि यावर कळस म्हणजे सलील आणि सुरेशजींच्या सारेगमप मध्ये पुढची तीन गाणी ऐकली
, आपल्या मराठी ची महती आणि प्रभुत्व सिद्ध करणारी!
आणि प्रत्येक गाण्यात अंतर ३०,४० वर्षांचं....
आधी नुकतेच हीट झालेलं पहिलं ....रांगड....आमच्या पप्पांनी गपंती आणला..... गाणारी मुलं...3 री तली आणि KG तले भाऊ बहीण! तुफान गाजतय...
दुसरं गाणं....वेगात मराठी वीर दौडले सात.... वीररसात ओथंबलेले.... 40 वर्षांपूर्वीचे साक्षात सरस्वतीमा लताबाईंनी गायलेलं
हे ही नसे थोडके ....तीसरे गाणं चक्क नव्वद वर्षांपूर्वी च
मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची ....
या तिन्ही गाण्यांना परत परत कितीतरी वेळा ऐकून ही मन भरत नाही.....
मला आपल्या मराठी चा एवढा आभिमान वाटला की तो आनंद शब्दात सांगण अशक्यच आहे.
अरे, एवढी भाषा समृद्धी असताना कोणत्याही न्यूनत्वाचा (विचार) लवलेशही कोणत्याही मराठी माणसाच्या मनात कसा काय येईल!
तुमच्या साठी त्या गाण्यांच्या you tube लिंक्स देतोय. जेव्हा मन नाराज असेल तेव्हा तेव्हा ऐका मैत्रांनो!
हर्षवर्धन रानडे

आमच्या पप्पांनी गपंती आणला.....
https://youtu.be/fCeqlE0IdqA?si=RvnIBxVRf83d8Um2

वेडात मराठे वीर
https://youtu.be/HpcZxKAffxE?si=RXzK9bvPAvha4mcN

मन सुद्ध तुझं गोष्ट हाये पृथ्वीमोलाची ....
https://youtu.be/dsrfbCOlanU?si=se_w0brpByvmf0_a

ऐका नक्की आवडेल !

श्रद्धांजली Kent!जेव्हा तुम्ही श्वान मंडळींचा विचार कराल तेव्हा हे ही आठवा. आपण घरात शांतपणे जगू शकतो कारण हे मुके जीवही...
14/09/2023

श्रद्धांजली Kent!
जेव्हा तुम्ही श्वान मंडळींचा विचार कराल तेव्हा हे ही आठवा. आपण घरात शांतपणे जगू शकतो कारण हे मुके जीवही आपल्यासाठी सैनिकांबरोबर त्यांच्याही प्राणाची आहुती देतात. कारण ते आपल्यावर खूप प्रेम करतात, अगदी प्राणापलीकडे
शतशः नमन......
हर्षवर्धन रानडे

India News: NEW DLHI: In a poignant display of unwavering dedication and in adherence to the illustrious traditions of the Indian Army, a valiant six-year-old fem.

23/08/2023

चांद्रयान 3 च यश हे उत्तुंग यश आहे , कितीही वाटलं तरी त्यावर कोणत्याही परिस्थितीत कसलेही विनोद करायचे किंवा share forward करायाचे नाहीतच मित्रांनो! स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे! हेच म्हणा! यश हे साजरे करतात त्यावर विनोद, मिम्स नाही करत!

Please visit our newly designed website. Thanks!www.biznovators.co.inHarsh. Ranadeआमच्या नव्या रुपात तयार केलेल्या संकेत...
21/11/2021

Please visit our newly designed website. Thanks!
www.biznovators.co.in

Harsh. Ranade
आमच्या नव्या रुपात तयार केलेल्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. मुद्दाम या नव्या रुपात , मराठीतूनही माहिती दिली आहे.
www.biznovators.co.in

धन्यवाद
हर्ष.रानडे

At Biznovators, we believe in sustainable entrepreneurship which can be facilitated with adequate guidance or mentoring. We, at Biznovators have supported almost 5000+ product based Market Research techno commercial Studies and Trained over 22000 budding entrepreneurs and Corporate leaders and stude...

15/08/2021

आपला देश आपणच घडवतो! आपण आपल्या देशासाठी काय केलं असा विचार करून पहा, कदाचीत कळेल की देश आपणच घडवतो. देशावर पराकोटीच प्रेम असावं तरच देश घडतो, आपला विचार हे आपलंच प्रतिबिंब असत!
एक विद्यार्थी शिकवून , एक झाड वाचवून, रस्त्यावर कचरा न करता, न थुंकता अश्या छोट्या छोट्या गोष्टीतून आणि सर्वात महत्त्वाचे की स्वतः ची जबाबदारी ओळखून आपण खरा freedom enjoy करू शकू! आपणच घडवतो आपला देश!
हर्षवर्धन रानडे

Engineer Wadewale: Our success story of Biznovators Udyogshala._________________________मे-जून २०२०:इंजिनीअर असलेला ऋषिक...
14/07/2021

Engineer Wadewale: Our success story of Biznovators Udyogshala.
_________________________
मे-जून २०२०:
इंजिनीअर असलेला ऋषिकेश, गेल्या वर्षी कडक लॉकडाऊन असताना तो पुण्यात माझ्यावर १००% विश्वास ठेवून उद्योगशाळाच्या प्रकल्पात
दाखल झाला होता , उद्योजक कस व्हायचं हे माझ्याकडे शिकायला. उद्योगशाळाच्या बरोबरीनेच मी त्यावेळी digin.in हे आणि इतर ६,७ स्टार्टअप सुरू करायला मदत करत होतो. हा २१वर्षांचा ऋषी सतत माझ्या बरोबर चर्चा करीत असे . पहाटे सहा वाजता च बोलण सुरु व्हायचं.
तो कठीण काळ होता, सगळ बंद होत . फक्त E-commerce आणि इतर जीवनावश्यक प्रॉडक्ट्स मार्केट करायला परवानगी होती. ते काम करताना हा ऋषी सतत माझ्या असायचा, त्याला एक मुलखावेगळा खाद्य प्रकल्प सुरू करायचा होता. काय करायचं ते आमचं ठरलं, पण त्याला मी, आधी एक छोटासा stepping stone project म्हणजे "पायरीचा दगड" ठरेल असा व्यवसाय कर असा सल्ला दिला. कोणता प्रोडक्ट हे ऋषीच ठरवणार होता. त्यातच मला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मग ऋषीचा एकलव्याचा प्रवास सुरू झाला, आम्ही सतत फोन आणि व्हॉट्सॲप वर संपर्कात होतो.
आता ऋषीचा stepping stone project ठरला . सगळ सुरू होतय तो परत दुसरा लॉक डाऊन सुरू झाला. आम्हाला भेटण पण अवघड होत.मी हळुहळू बरा होत होतो.
उद्योगशालाम् किंवा उद्योगशाळेचं आमचं ब्रीदवाक्य आहे "साहसे श्री: प्रतिवसति!"; ऋषीनी तेच केलं, आणि इंजिनिअर वडेवाले हे चक्क वडा पाव चे outlet सुरू केले. पारंपारिक वडा पाव एका अभियंत्यांनी वेगळ्या प्रकारे ग्राहकांना सादर करण्याची एक अनोखी संकल्पना. त्याने अवघ्या दोन महिन्यांत दोन अडीच लाखांच्या वर उलाढाल केली आहे.
असे असतात आमचे हर्षवर्धन रानडे सरांच्या उद्योगशाळा चे गुणी उद्यमशील तरुण उद्योगमैत्र ©️! त्याच्या यशाची कथा मुलाखत स्वरूपात आमच्या you tube चॅनेल वर छोट्या छोट्या चार भागात तयार करण्यात आली आहे . ती जरूर पहा!
Link खाली देतोय.
https://youtu.be/SSWxK027UY8

https://youtu.be/6FBhfIP4aXM

https://youtu.be/yaFiukpNd8I

https://youtu.be/8rs1XrpseeU

हर्षवर्धन विनित रानडे
Harshavardhan Vinit Ranade

Engineer Wadewale interview part 1

Address

8, Krishna Kunj, 1187/23, Ghole Road
Pune
411005

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

9822798940

Alerts

Be the first to know and let us send you an email when ऊद्योगशाळा: Harshavardhan Ranade's school of entrepreneurship posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share