09/05/2020
*-यूवतीसेने च्या अयोध्या पौळ यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून फडणवीस यांना काही प्रश्न विचारले आहेत....
” देवेंद्रजी, मी अयोध्या पौळ. तुमच्या भाजपच्या एकाही नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या पोस्टवर hahaha रिऍक्ट करणार नाही व महाराष्ट्र राज्यातील एकही व्यक्ती रिऍक्ट करणार नाही याची मी स्वतः हमी घेते फक्त त्यांनी खालील गोष्टी सांगाव्यात.
1) – 15 लाख कधी भेटतील?
2) – 100 स्मार्ट सिटी कधी दाखवणार?
3) – 33 कोटी झाडे कुठे लावली?
4) – 5 लाख विहीरी कुठे बांधल्या?
5) – फडणवीस साहेब यांनी चहा पाण्याचा खर्च 3 कोटी 34 लाख 64 हजार 905 रुपये सांगितला ते चहा पाणी कुणाला व किती वेळा पाजले
6) – जाहिरातीचा खर्च 15 कोटी 51 लाख रुपयांचा, त्या जाहिराती वैयक्तिक होत्या की सरकारी?
7) – धर्मा पाटील यांच्या कुटुंबाला डांबून का ठेवले होते?
8) – सर्व मिडिया समोर पद व जबाबदाऱ्या यांचे समसमान वाटप होईल हे बोलुन सुद्धा धडधडीत खोटे का बोलले?
9) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असुन सुद्धा CM फंड प्रमोट न करता PM फंड का प्रमोट केला?
10) – संपूर्ण जगासोबत #महाराष्ट्र सुद्धा कोरोना माहामारी ने परेशान असताना तुम्ही महाविकास आघाडी सरकारला माणुसकी विसरून घाणेरडे राजकारण का करता?
11) – तुम्ही बोलले होतात की 5 वर्षात तुम्ही तुमच्या मुलीला वेळ दिला नाही व कुठे बाहेर घेऊन गेला नाहीत, तर मग सहकुटुंब क्रुझवर फोटोसेशन कोण करत होते?
12) – महाराष्ट्र पोलीस यांचे बँक खाते SBI मधुन AXIS बँकेत का वळवले?
13) – नमस्ते ट्रम्प साठी जो अवाजवी खर्च करून गरीबांच्या तोंडासमोर भिंत उभारली त्यापेक्षा त्यांना घरे बांधून देऊ शकले असते असे तुम्हाला वाटत नाही का?
14) – कोरोना माहामारीचा पहिला रुग्ण जानेवारीत आढळून आला मग ट्रम्प यांचे विमानतळावर स्कॅनिंग का केले नाही?
15) – भाजपा पक्ष श्रेष्ठींनी अंतर्गत गटबाजीमुळे निष्ठावंतांना डावलून नवख्यांना उमेदवारी दिली तुम्ही मध्यस्थी का केली नाही?
16) – 2013 साली सुधीर मुनगंटीवार जी व तुम्ही यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी केली अन 2014 साली संयुक्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतली या दोगलेपणाबद्दल काय सांगाल?
17) – कोरोना माहामारीत महाराष्ट्र राज्यासाठी तुमचे योगदान काहीच दिसले नाही अाणि महाविकास आघाडी सरकारचे 6 महीने पुर्ण झाले की ते सरकार पडणार असा खरा न होणारा तर्क वितर्क लावुन परत तुम्हीच मुख्यमंत्री होणार हा सत्ता पिपासू पणा करणे योग्य वाटते का?
18) – तुम्ही नेहमीच “मी, मला, माझी” असा स्वार्थीपणा का ठेवता?
19) – तुम्ही फक्त आशिष शेलार जी, चंद्रकांत पाटील जी यांनाच सोबत घेऊन चालता मग भाजपा मध्ये नितीन गडकरी जी, पंकजा मुंडे जी, एकनाथ खडसे जी व विनोद तावडे जी यांचे स्थान काय?
20) – महाराष्ट्रात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे तरी तुम्ही शिवसेनेला लहान पक्ष की समजता?
साहेब अजून बरेच प्रश्न आहेत कधी भेटुन उर्वरित प्रश्न नक्कीच विचारेल अन माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नसेल.
©अयोध्या पौळ
विधानसभा समन्वयक युवासेना-युवतीसेना.”
या थेट आणि रोखठोक प्रश्नांमुळे सध्या अयोध्या पौळ यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे ..