Vastu Point

Vastu Point Vastupoint is one place for all your vastu related queries and questions. Vastupoint is know for growth, power, energy and success

06/03/2026

समुद्र मंथन : देव–असुर आणि आपल्या कुंडलिनीचे गूढ
समुद्र मंथनाची कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत.
देव आणि असुरांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले आणि त्यातून विष आणि रत्न प्रकट झाले.
पण अध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर ही कथा बाहेर घडलेली घटना नसून मानवी चेतनेतील एक अंतर्गत प्रक्रिया आहे.
देव आणि असुर म्हणजे काय?
पुराणांतील देव आणि असुर प्रत्यक्षात आपल्या मनातील गुण आणि अवगुण आहेत.
देव (गुण)
प्रेम
दया
संयम
सत्य
करुणा
विवेक
असुर (अवगुण)
राग
लोभ
मत्सर
अहंकार
वासना
भीती
हे दोन्ही आपल्या मनात एकत्र असतात.
जीवन म्हणजेच या दोन शक्तींचे सतत चालणारे मंथन.
समुद्र म्हणजे मन
समुद्र हा मानवी मन आणि चेतनेचा अथांग सागर आहे.
या समुद्रात:
विचार
भावना
इच्छा
संस्कार
हे सर्व लपलेले असतात.
जेव्हा जीवनातील अनुभव, संघर्ष आणि साधना सुरू होते तेव्हा मनाचा मंथन सुरू होते.
वासुकी नाग म्हणजे कुंडलिनी ऊर्जा
समुद्र मंथनात वासुकी नाग दोरी म्हणून वापरला गेला.
योगशास्त्रानुसार नाग म्हणजे कुंडलिनी शक्ती.
ही ऊर्जा मेरुदंडाच्या तळाशी (मूलाधार चक्रात) सुप्त अवस्थेत असते.
जेव्हा साधना, प्राणायाम किंवा जीवनातील तीव्र अनुभव होतात तेव्हा ही ऊर्जा जागृत होऊ लागते.
हीच ऊर्जा मनातील गुण आणि अवगुणांना सक्रिय करते.
विष आणि रत्न कसे प्रकट होतात?
समुद्र मंथनात सर्वप्रथम हलाहल विष बाहेर आले.
याचा अर्थ: जेव्हा कुंडलिनी ऊर्जा हलू लागते तेव्हा सर्वप्रथम मनातील नकारात्मक प्रवृत्ती वर येतात.
उदा:
राग
भीती
असुरक्षितता
अहंकार
हे विष बाहेर येणे हीच आत्मिक शुद्धीची पहिली पायरी आहे.
यानंतर हळूहळू रत्ने प्रकट होतात.
रत्न म्हणजे अंतर्गत शक्ती
समुद्र मंथनातून आलेली रत्न प्रत्यक्षात मानवी चेतनेतील जागृत शक्ती आहेत.
उदा:
लक्ष्मी – समृद्धी आणि संतुलन
ऐरावत – स्थैर्य आणि सामर्थ्य
उच्चैश्रवा – ध्येयाकडे धावणारी ऊर्जा
कल्पवृक्ष – सर्जनशील मन
कौस्तुभ मणी – आत्मज्ञान
कामधेनू – पोषण आणि करुणा
ही सर्व रत्ने मानवी चेतनेत आधीपासूनच असतात, पण ती जागृत होण्यासाठी मंथन आवश्यक असते.
समुद्र मंथनाचा खरा संदेश
समुद्र मंथन आपल्याला सांगते की:
मनात देव आणि असुर दोन्ही असतात
कुंडलिनी ऊर्जा दोघांनाही शक्ती देते
त्यामुळे मंथनातून विषही येते आणि रत्नही
जो माणूस जागरूकतेने जीवन जगतो
तो विषाला ओळखून त्याचे रूपांतर करतो
आणि मग त्याच्या जीवनात रत्ने प्रकट होतात.
आध्यात्मिक सत्य
समुद्र मंथन बाहेर घडलेली घटना नाही.
ते प्रत्येक माणसाच्या मन, शरीर आणि कुंडलिनी ऊर्जेत सतत घडत असते.
आपणच तो समुद्र आहोत,
आपणच देव आणि असुर आहोत,
आणि आपल्याच आत विष आणि अमृत दोन्ही लपलेले आहेत.
🙏ज्योती मयेकर

18/10/2025

🌟 “दिवाळी म्हणजे आत्मप्रकाशाचा उत्सव” 🌟
(हा लेख वास्तववादी आहे जर तुम्ही ठरवलं तर नक्कीच तुमच्या बदल होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल.)
आज आपण जी दिवाळी साजरी करतो, ती फक्त दिवे, फटाके, मिठाई आणि नवे कपडे यापुरती मर्यादित नाही. खरी दिवाळी म्हणजे आतल्या अंधाराला संपवून आत्म्याचा प्रकाश जागवण्याचा दिवस.
दिवे आपण बाहेर लावतो — पण प्रकाश आत पेटवला नाही, तर बाहेरचा दिवा काही अर्थ ठेवत नाही.
🌼 दिवाळी म्हणजे आपलं स्वरूप
दिवाळी म्हणजे आपली खरी ओळख पुन्हा आठवण्याचा क्षण.
आपण शरीर नाही — आपण आत्मा आहोत.
आपल्यात एक सूक्ष्म ऊर्जा आहे जी सर्वकाही जाणते, तीच आपली कृष्णचेतना आहे.
हीच ऊर्जा तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये असते — कधी शांत मार्ग दाखवते, कधी थांब म्हणते, कधी पुढे ढकलते.
ती तुमच्याशी दररोज संवाद साधायला तयार आहे, पण आपण तिला ऐकायला वेळ देत नाही.
🕉 “हे कृष्णा, तू माझ्यात आहेस” — हा संवाद सुरू करा
आपल्यात जो आत्मरूपी उजेड आहे, तोच आपला कृष्ण आहे.
त्याच्याशी बोलणं म्हणजे ध्यान, म्हणजे आत्मसंवाद.
कृष्णाला दूर मंदिरात शोधू नका — तो तुमच्या श्वासाच्या शांततेत, मनाच्या खोलवरच्या स्थैर्यात आहे.
रोज एकदा मनात म्हणा —
“हे कृष्णा, तू माझ्या शरीरात आत्मरूपाने वसलेला आहेस.
मला योग्य मार्गाने पुढे ने,
या भौतिक जगात मला तुझी साथ हवी आहे.”
ही प्रार्थना तुमचं मन शांत करते, आणि तुमचं विवेक जागं करते.
पाच पांडव म्हणजे पाच इंद्रिय
आपले डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा — हेच तुमचे पाच पांडव आहेत.
हे पाच योद्धे तुमच्या आत्म्यासाठी लढतात.
पण जर तुम्ही त्यांना चुकीच्या दिशेने वापरलं — वासनेत, अहंकारात, लोभात, देखाव्यात, मोहात, तिरस्कार्यात किंवा अशा अनेक चुकीच्या गैरसमज मध्ये
तर ते कौरव बनतात आणि तुमच्याच मनाशी युद्ध करतात.
कृष्ण तुमच्यात आहे — तो या युद्धाचा सारथी आहे. तुमच्या शरीराचा सारथी आहे.
तो म्हणतो, “मी तुझ्या बाजूने आहे, पण तू सत्याच्या बाजूने राहा.”
याचं नाव आहे आत्मिक धर्मयुद्ध.
🔥 दिवाळी म्हणजे आतल्या अंधारावर विजय
आपल्यातला अंधार म्हणजे राग, मत्सर, लोभ, भीती, आणि द्वेष.
हे सर्व रावणाच्या दहा डोक्यांसारखे आहेत.
दिवाळीचा दिवा लावताना आपण हा रावण जाळला पाहिजे.
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही क्षमा करता, तेव्हा एक रावण मरतो.
जेव्हा तुम्ही सत्य बोलता, तेव्हा एक दिवा पेटतो.
जेव्हा तुम्ही अहंकार सोडता, तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरी येते.
🌺 निष्कर्ष
दिवाळी हा केवळ उत्सव नाही — ती आत्मिक जागृतीचा सोहळा आहे.
त्या आत्मप्रकाशानेच तुम्हाला आयुष्याच्या सर्व अंधाऱ्या वाटांवर दिशा मिळेल.
कृष्णावर विश्वास ठेवा, कारण तुम्ही इथे त्यालाच दिलेलं वचन पूर्ण करायला आलात —
“मी माझं कर्म पूर्ण करीन, आणि माझ्या आत्म्याला प्रकाशाकडे नेईन.”
मग चला —
यंदाची दिवाळी फक्त घरात नाही, मनात साजरी करूया,
आणि त्या उजेडात स्वतःला पुन्हा ओळखूया. तुमच्या आयुष्यात आज जी काय संकट आहे त्याचं जर निरसन करायचं असेल तर तुमच्यातला कृष्ण आठवा त्याच्याशी संवाद करा बघा तोडगा लगेच मिळेल. मग तुम्ही दिखावी दिवाळी कधीच साजरी करणार नाही तुमच्या चेहऱ्यावर ते तेज असेल त्यालाच आनंद म्हटले जाते.
ज्योती मयेकर 🙏

18/10/2025

धनतेरस २०२५ – तेरा दिव्यांचा प्रकाश आणि आत्म्याचा जागर 🌟
आज धनतेरस आहे, आणि या दिवशी तेरा दिवे लावण्याची परंपरा आहे.
धनतेरस म्हणजे “तेरा दिव्यांची आरस” –
एक अंक सूर्याचा प्रतीक आहे – आपल्या आतल्या आत्म्याचा प्रकाश.
तीन अंक गुरुचे प्रतीक आहेत – ज्ञान, मार्गदर्शन आणि चेतनेचा प्रकाश.
हे तेरा दिवे तुमच्या घरात योग्य ठिकाणी लावल्यास, तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचे प्रकाशमान निर्माण होते.
💡 दिवे लावण्याचे ठिकाण
1. एक दिवा – तुळशीच्या कडे लावा.
2. दोन दिवे – मुख्य गेट किंवा इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावा.
3. एक दिवा – पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली लावा (जर आसपास असेल तर). किंवा तुमच्या नक्षत्राप्रमाणे जे झाड येतं त्या झाडाखाली नक्की दिवा लावा
4. एक दिवा – पाणी ठेवण्याच्या जागी लावा.
5. एक दिवा – गुरूंसाठी लावा वेस्ट पश्चिम दिशेला लावा.
6. दोन दिवे – मुख्य दरवाजावर लावा.
7. एक दिवा – देवघरात लावा. तुपाचा दिवा
8. एक दिवा – उत्तर दिशेला कुबेरासाठी
9. एक दिवा – अग्नेय दिशेला लावा.
10. एक दिवा – गॅस किंवा स्टोव्हच्या जागी लावा.
11. एक दिवा – साउथ-वेस्ट दिशेला, पित्रांसाठी. राईच्या तेलाचा
असे तेरा दिवे आज नक्की लावा आणि तुमच आत्मबळ वाढवा जगात जगण्यासाठी!या तेरा दिव्यांनी तुमच्या घरातील सगळ्या चेतन अवस्थेला जागृत करून आत्म्याला दिव्य ज्ञान देईल.
✨ संध्याकाळी –
एक दिवा पिठाचा करून राईचे तेल भरून दक्षिण दिशेला (यमासाठी) लावा. अपघाती मृत्यू येऊ नये आणि मी ज्या कर्मासाठी इथे आलो किंवा आली आहे ते कर्म माझ्याकडून पूर्ण होऊ दे! यासाठी यमाला प्रसन्न करा!
आजच धनतेरस साजरा करा आणि आयुष्यात प्रकाशमान उर्जा भरा!
ज्योती मयेकर 🙏

28/02/2024
31/07/2023

नक्की वाचा ....
देव हा प्रत्येकात आहे फक्त त्याला जाग ठेवा त्याला विष दिल तर तो तांडव करेल ना !
आज मी तुम्हांला एक असा अनुभव सांगते आहे की जर तुम्ही या सिचूऐशन मधून जात असाल तर तुम्ही स्वतः वर थोडं काम करा! नक्कीच मार्ग मिळेल! विश्वास ठेवा !
कारण तुमच्या आयुष्याचे तुम्ही स्वतः शिल्पकार आहात आणि तुमचे विचार आणि कृती या माध्यमातून च तुम्ही तुमचं शिल्प तयार कराल !
तर .... अनुभव असा आहे कि माझ्याकडे फेब २०२३ च्या सुमारास एक फिमेल क्लायंट आली होती तिच्या नवऱ्याची कुंडली घेऊन. मी तीला विचारलं काय जाणून घ्याचं आहे म्हणाली , माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर आहे काय? मी थोडा विचार केला आणि कुडंली मागितली. कुंडली चेक केली आणि मी म्हणाली कि असं का वाटत तुम्हाला कि तुमच्या नवरोबाचं बाहेर लफडं चालू आहे? मनातलं सगळं अगदी बिनधास्त सांगा त्याशिवाय आपल्याला बोलता येणार नाही. बर मी जर सांगितलं कि बाहेर लफडं आहे तर तुम्ही काय कराल तेही सांगा. ती म्हणाली घटस्फोट देईन. आणि काय कराल आणि काय जॉब करेन माझ्या मुलाला घेऊन मला मॅडम सहा वर्षाचा मुलगा आहे. मी थोडा विचार केला आणि बोलायला सुरुवात केली. हा एकच मार्ग आहे काय तुमच्याकडे ती म्हणाली हो मी म्हटलं दुसरा मार्ग आहे जर मी सांगितलं तर कराल काय ?ती म्हणाली तुम्हाला काय वाटत मॅडम अगदी सगळं मला खरं खरं सांगा ! त्याच वागणं पूर्वी सारखं नाही राहील तो शरीरानं असतो माझ्या कडे पण मनानं कुठं तरी दुसरी कंड असतो! माझ्याशी नीट बोलत नाही , काही सांगत नाही , जेव्हा त्याला माझी शारीरिक गरज असते तेव्हा तो बोलायला येतो मग जरा माग ढुंकूनहि बघत नाही तुम्ही च सांगा असं कि ती दिवस मी अड्जस्ट करू माझ्या मनात खूप काही गोंधळ चालू आहे. म्हणून मी म्हटलं कि आता घटस्फोट घेऊन वेगळं व्हायचं आपलं जीवन ह्या माणसं साठी वाया का घालवायचे ? मी
चांगली शिकलेली आहे आणि लग्ना आधी आणि नंतर जॉब करत होते सगळं सांमभाळून गरोदर पणात मी जॉब सोडला पण त्याने मला त्यासाठी कधी बोलून दाखवले नाही ह उलट तो तेंव्हा मला खूप कॉ ऑप रेट करत होता. माझ्याशी बोलत होता सगळं सांगत होता पण आता असं काही नाही आहे. तुमचा दुसरा पर्याय मला पटला तर तोही करून बघेल कि! मला कुठे त्याला सोडायचं आहे त्याच्या अशा वागण्यामुळे मला निर्णय घ्यावा लागतो आहे. मी तिला सांगितले त्याची पत्रिका तर ठीक आहे तसं कुठे माझ्या अभ्यासात मला आढळुन नाही आले आहे . त्याच लव्ह मॅरेज असावं तर ती म्हणाली हो आमचं लव्ह कम अरेंज आहे. तिला म्हटलं तुझी पत्रिका आणली आहेस का ? हो म्हणाली ती बघितली आणि तिला काही प्रश्न विचारले मी. त्याची उत्तरे तीन दिली. ग्रह स्थिती सद्या तिच्या पत्रिकेत बिघडलेली होती. तिची मानसिक परिस्थिती त्यामुळंच बिघडलेली होती. तिला म्हटलं तुझ्या मनातलं विष तुझ्या नवर्यात प्रवेश करत आहे हळू हळू. म्हणाली ते कस मी म्हणाली रोगी तू आहेस आणि तुझ्या संपर्कात तुझा नवरा मानसिक आणि शारीरिक रित्याआहे तुमच्यात ऊर्जा आदान प्रदान होते कि नाही. ती म्हणाली हो ! इन शॉर्ट तुला जो आजार झाला आहे ना त्यांची लक्षणं तुला तुझ्या नवरोबात दिसतात आहे. आपण उपचार केले तर बरे होतील ,तुझी चॉइस ठरव आणि कळव मला . तीन कॉल केला आणि मी तिच्या वर काम करायला सुरुवात केली. तिला मी ठराविक वेळ दिला होता त्यांत मला सगळ्या प्रकारे तिच्यावर काम करावं लागलं आणि ती पूर्ण बरी झाली. येत्या साडे चार महिन्यात तिची ग्रह दशा बदलली आणि तिचे निर्णय हि बदलले. एक दिवस फोन करून ती नवऱ्याला घेऊन आली आणि म्हणाली आज मी तुझ्या बरोबर आहे कारण का तर माझ्यावर मी उपचार योग्य वेळी केलें मि मुर्खा सारखं तुझ्याशी भांडायची आणि तुला सोडायचा निर्णय कितीतरी वेळा आतून घ्यायची, पण मॅडम ने मला सांगितलं होत काही झालं तरी सोडू नको तुझ्यातला देव विष पिऊन तांडव करत आहे त्याच विष आपण काढूया आणि खरंच विष हळू हळू संपलं आता कळलं कि समुद्र मंथन कुठे होत कधी होत आणि का होत आणि ते विष आपल्याला किती बाधत ते त्याचे परिणाम किती तरी आपल्या जवळच्या लोकांना होतात. पण मी त्यातूनचं खूप काही शिकली नाती कशी सांभाळायची. खरंच तुमची आभारी आहे मॅडम !
ते गेल्यानंतर मी विचार केला कीती बरं होईल जर प्रत्यकाने त्याच्या आत मंथंन होऊन झालेलं विष वेळीच बाहेर काढलं तर किती तरी घर मंदिर होतील शिव आणि शक्ती तिथेच आपल्याला बघायला मिळतील. आपल्यातला माणूस जागा ठेवण्यासाठी थोडा प्रयन्त प्रत्येकानं केला पाहिजे !नक्की करा .....
आपल्या नात्याचं भान ठेवा त्याचा आदर करा आणि जगा आनंदी !
ज्योती चंद्रकांत मयेकर

08/07/2023

श्री वास्तुपुरुषाची जन्मकथा मत्स्यपुराण नुसार:-

फार प्राचीन काळी अंधकासुर नावाचा महापराक्रमी राक्षस होता । पराक्रमी होता त्याचा त्याला फार गर्व होता मुळात देव-राक्षस वैर्य मग काय आपल्या परक्रमाच्या गर्वाने मदमस्त झालेल्या या अन्धकासुराने देवांना सळो की पळो केले होते त्याच्या त्रासाने हतबल झालेल्या देवांनी त्राही त्राही भगवन म्हणत श्री शंभु महदेवांकड़े धाव घेतली महादेवांनी लगेचच शस्त्र उचलले त्यांनी अंधकासुराला युद्धाचे आवहान केले त्याने आवहान स्वीकारले । श्री शिवशंकर आणि अंधकासुर यांच्यात घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्री शिवशंकरांचा विजय झाला । अंधकासुर मरण पावला । या युद्धामध्ये झालेल्या परिश्रमाने शंकरांच्या अंगाला ज्या घामाच्या धारा सुटल्या, त्यातील एका घामाच्या थेंबातुन एका करालपुरुषाचा जन्म झाला हाच तो वास्तुपुरुष आहेत

या करालपुरुषाने तेथेच मरूण पडलेल्या अन्धकासुराच्या प्रेताचा प्रथामतः फडशा पाडला पण त्याची भूख कही केल्या भागेना मग त्याने भगवन श्रीशिवशंकरांची आराधना केलि आणि त्यांच्याकडे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ यावरील काहीही खावुन टाकन्याची अनुमति मागितली वर मागताच वर देने आशी ख्याति भोलेनाथ श्री शिवशंकर यांची त्यानी त्याला तथास्तु म्हणुन वर दीला । वर मिळाल्यावर त्याने जे कही दीसेल ते खावुन टाकन्यास सुरुवात केली त्याने मंदिर, डोंगर, घर, वृक्ष, प्रसाद, प्रासाद काहीही मागे सोडले नाही त्याने अक्षरशः खाण्याचा सपाटाच लावला, त्यामुळे तीन्ही लोकांत हाहाःकार उडाला देव, दानव, मानव सर्वच घाबरले । या करालपुरुषाला कसे आवरयचे ? असा मोठा प्रश्न त्यांना पडला कारण तो शिवपुत्र होता (त्याचा जन्म शिवशंकर यांच्या घामाच्या थेंबातुन झालेला।) त्याला युद्धात पराजीत करनहि कठिन होते । आता काय करावे सर्वच मोठया प्रश्न पडले.

देव-दानव यांना त्यांच्यातील वैर विसरून एकत्र यावे लागले । दोघांनी मिळुन एक युक्ति शोधली त्याप्रमाणे ते दोघेही एकाचवेळी वास्तुपुरुषावर चाल करुन गेले त्यांनी ठरवलेल्या युक्तीप्रमाणे त्याला पकडले व जमिनीवर पालथे पाडून दाबुन धरले त्यावेळी त्याचे डोके ईशान्य दिशेकडे राहिल याची दक्षता घेतली ।

वस्तुपुरुषाला खाली पालथे पाडल्यावर प्रतेक देव-दानव यांनी तो उठू नये म्हणुन त्याला सगळीकडून प्रतेकी एकाने धरून ठेवले । ईशान्य ही दिशा शिवशंकर यांची आपल्या पित्याच्या पायावर डोके आल्यामुळे आपल्या पित्याला हात जोडून नमस्कार करणे तसेच आर्शीवाद घेण्यासाठी तेथे थांबने या गोष्टी ओघाने आल्याच । देव-दानव यांनी श्री शिवशंकर यांची करुना भाकाली आणि त्यांनी त्यांच्या पुत्राला समज द्यावी अशी विनंती केलि । पण त्याल्या शिवशंकर यांनी काहीही काहीही खावुन टाकण्याचा वर दिला होता । मग सर्वांची परत बराच वेळ चर्चा झाली । सरतेशेवटी एक तोडगा निघाला । या तोडग्यानुसार पृथ्विवरिल सर्व मानवांनी दररोज भोजन आधी एक घास वास्तुपुरुषासाठी बाजूला काढावा व हेच अन्न त्याने त्याचा नित्य आहार म्हणुन खावे तसेच नविन घर बांदल्यावर वास्तुपुरुषाची पूजा करावी व त्यावेळी त्याला दिलेले अन्न त्याचा नेहमीचा आहार असावे । आशा घराचे रक्षण वास्तुपुरुषाने करावे असे ठरले ।या सोबतच श्रीमहादेवाने वास्तुपुरुषला नेहमीच तु तथ्थातु असे म्हणत रहाशील असे वरदान दिले.

तसेच यज्ञ उत्सवाच्या वेळी प्रारंभी दिलेला बलि (नैवेज्ञ) हाही तुझाच आहार राहिल तसेच जे नविन घर निर्माण करेल त्त्या घराची वास्तुशांति पुजा करनार नाहीत तेहि तुझाच आहार बनतील तसेच अज्ञानाने केलेला यज्ञ हाही तुझाच आहार राहिल । आशा प्रकारे त्याला वचन दिले गेले आणि पुढे तो वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला । तेव्हापासून वास्तुशांति करण्याची प्रथा प्रचलित झाली । कोणतीही नविन वास्तु बंधल्यावर किंवा वस्तुत कोताही बदल (जीर्णोद्धार) केल्यानंतर वास्तुशांति करणे अनिवार्य आहे । नाहीतर ती वास्तु वस्तुपुरुशाचा आहार बनेल व तेथे स्मशान होइल असा उल्लेख मत्स्यपुराण अध्याय-२५३ मध्ये ओवी नम्बर १७, १८, १९ मध्ये उल्लेखले आहे।

वास्तुपुरुष पालथा पडल्यानंतर तो उठू नये म्हणुन त्याला देव-दानव ( असुर किंवा राक्षस ) यांनी सगळीकडून चारही बाजूने तसेच त्याच्या अंगावर चढूण धरून ठेवले होते त्याच्या त्या शरीराचा तो तो प्रतेक भाग त्यावर स्थान्पत्र झालेल्या देवतेच्या व असुरांचा नावाने ओळखला जावू लागला । सर्व देवतांचा व असुरांचा यावर निवास असल्यामुळे तो पुढे वास्तुपुरुष या नावाने प्रचलित झाला। त्याला पकडून धरलेल्या एकूण ४५ देवता व असुर आहेत व त्या त्याच्या अंगावर स्थानापत्र आहेत त्याची आकृति पुढे आहे । वास्तुपुरुष आणि त्याच्या अंगावर रेखांकित केलेल्या ४५ देवतांच्या व असुरांच्या या रेखाचित्रास वास्तुपदमंडल असे म्हणतात । याचा उपयोग मनुष्यास राहण्ययोग्य निवास बांधताना होतो । कारण यातील प्रतेक देवतेचे व असुरांचे वेगळे एक तत्त्व आहे । त्या तत्वानुसार प्रतेक स्थानाची फलश्रुति मनुष्यास प्राप्त होते । बांधकाम करतांन जर यात काही दोष राहिले तर त्या त्या देवतेच्या व असुरांचा तत्वाची हानि किंवा भर होते व त्याचा आनंद किंवा त्रास वास्तु मालकास तसेच त्या वास्तूत निवास करणारी व्यक्तिनां होतो । म्हणुन वास्तु-निवासचे बांधकाम करताना मुख्य दरवाजा , किचन , कर्त्या माणसाचं बेडरूम , देवघर , टॉयलेट बाथ ,अंगणातील तुळस , वैगरे वैगरे तसेच घराच्या आतील इंटिरियर , फोटोज , पुतळे ईत्यादी याची काळजी घ्यावी लागते ।

नोट:- यामुळेच कोणीही नविन घर, फ्लैट, रोहाऊस, दुकान किवा आपल्या मालकी नविन अथवा जुनी वास्तु, ओपन जागा घेतल्यास त्या जागेचे योग्य रित्या नकाशे काढून ऊर्जा पातळी चेक करून त्यात योग्य ते शास्त्रोक्त बदल केले कि मग वास्तू शांती किंवा पूजा करावी .

मग श्रीवास्तु देव आपले सात पिढ्या काय पिढ्यान पिढ्या पर्यंत रक्षण करतो.

🙏
ज्योती चं मयेकर
वास्तू एक्स्पर्ट -९०२२१९२६६९

17/08/2022

Address

Miraroad
Thane
401107

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vastu Point posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vastu Point:

Share