श्री स्वामी समर्थ भाकरी सेंटर

  • Home
  • India
  • Virar
  • श्री स्वामी समर्थ भाकरी सेंटर

श्री स्वामी समर्थ भाकरी सेंटर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री स्वामी समर्थ भाकरी सेंटर, Business service, vatar school, Virar.

अगाध महिमा तुझा, वर्णू मी किती....  द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात दे...
11/07/2019

अगाध महिमा तुझा, वर्णू मी किती....

द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.


श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.



पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.


पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात
|| पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा ||

 #होळीफाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. होळी हा रंगांचा सण म्हण...
20/03/2019

#होळी

फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. होळी हा रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी दिवाळी आणि शिवरात्रीच्या दिवसाइतकचं या दिवसाला महत्त्व आहे. घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी होळी उभी करून सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. अन् संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. वाईट वृत्ती , अमंगल किंवा नकारात्मक गोष्टी होळीच्या अग्नीत नष्ट व्हाव्या असा होळी पेटवण्यामागचा उद्देश असतो.
अनेक ठिकाणी होळीचं दहन करताना त्यात सात प्रकारची धान्ये आणि गव्हाच्या लोंब्या टाकल्या जातात. आपल्या शेतातील नवीन पीक अग्नीदेवतेला अर्पण करणं हा त्यामागचा हेतू आहे. तसेच घरात सुख-शांती, समाधान नांदावं यासाठी देखील होळीत गव्हाच्या लोंब्या टाकल्या जातात. गव्हाच्या लोंब्या देवाला अर्पण केल्यास आपल्या पूर्वजांचे आर्शीवाद आपल्याला मिळतात अशीही मान्यता आहे. होळी लावल्यावर पालथ्या हाताने बोंब मारतात. यामुळे मनातील वाईट प्रवृती शांत होतात.

पौराणिक कथा -
१) हिरण्यकश्यपूची बहिण होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता. भगवंताच्या नावाचा जप करणाऱ्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलीका हिला प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद अग्नीत भस्म होईल आणि होलीका तिला मीळालेल्या वरदानामुळे जिवंत राहील हा त्याचा हेतू होता. पण झाले उलटे, होलीका जळून मरण पावली व भगवंताच्या क्रुपेने प्रल्हाद जिवंत राहिला. ही घटना फाल्गुन पौर्णिमेला घडली. म्हणून या दिवशी सर्वत्र होळ्या पेटवून आनंद व्यक्त केला जातो.
२) शिवांनी मदनाला जाळले तोही दिवस हाच होता. मदन दहनाच्या आठवणीसाठी म्हणून होळी पेटवतात.
३) ढुंढा नावाची राक्षसीन होती. ती लहान मुलांना त्रास देत असे. तिला हाकलून देण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. मग लोकांनी तिला बीभत्स शिव्या दिल्या. तेव्हा ती निघून गेली. आजही समाजात ‍बिभत्स बोलणारी, शिक्षा द्याव्यात असे वाटणारी मंडळी आहेत. त्यांना वर्षातून एकदा या गोष्टी करण्याची मुभा या दिवसापुरती दिली आहे अशी धारणा आहे.. जशी घाण पाण्याला वाट करुन द्यावी लागते तसाच हा प्रकार आहे.

विषवृत्तावर सूर्य येतो तो 21 मार्च रोजी. याच्या जवळपास होळीचा सण येतो. उष्णता वाढीस लागते. होळी लावल्याने जमीन तापते, जमिनीलगतचा थर तापतो. यावेळी होळी लावल्याने उष्णता वाढते. म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पाऊस चांगला पडतो. मोकळ्या मैदानात होळी लावावी.

होली पुजनाची सामग्री आणि विधीः

आवश्यक सामग्री-रांगोळी, तांदूळ, फूल, हळकुंड, मुग, बत्ताशे, नारळ, इत्यादी

पुजेचा विधी
एका ताटामध्ये पुजेसाठी आवश्यक असणारी सर्व सामग्री घ्यावी. सोबत एक पाण्याचा भरलेला तांब्या घेऊन होळीचे दहन ज्या ठिकाणी केले जाणार आहे तेथे खाली दिलेल्या मंत्राचा जप करत स्वत:वर व पुजेच्या सामग्रीवर थोडे-थोडे पाणी शिंपडत जावे -

ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु,
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु,
ऊं पुण्डरीकाक्ष: पुनातु।

वरील मंत्राचा जप झाल्यानंतर हातामध्ये थोडेसे पाणी, तांदूळ, फूल आणि दक्षिणा घेऊन खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करावा -

ऊं विष्णु: विष्णु: विष्णु: श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया अद्य दिवसे कीलक नाम संवत्सरे संवत् 2072 फाल्गुन मासे शुभे शुक्लपक्षे पूर्णिमायां शुभ तिथि --गोत्र (स्व गोत्राचा उच्चार करावा) उत्पन्ना--(जन्मनावाचा उच्चार) मम इह जन्मनि जन्मान्तरे वा सर्वपापक्षयपूर्वक दीर्घायुविपुलधनधान्यं शत्रुपराजय मम् दैहिक दैविक भौतिक त्रिविध ताप निवृत्यर्थं सदभीष्टसिद्धयर्थे प्रह्लादनृसिंह होली इत्यादीनां पूजनमहं करिष्यामी।

गणेश-अंबिका पूजन
हातामध्ये फुल व तांदूळ घेऊन श्री गणेशाचे ध्यान करावे -
ऊं गं गणपतये नम: आह्वानार्र्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
गणपतीला फुल, कुंक आणि अक्षता समर्पित कराव्यात
ऊं अम्बिकायै नम: आह्वानार्र्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि सर्मपयामि।।
देवी अंबिकेचे ध्यान करत पंचोपचार पूजेसाठी गंध, तांदूळ फूल अर्पण करावे.
ऊं नृसिंहाय नम: आह्वानार्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
भगवान नृसिंहाचे ध्यान करत पंचोपचार पूजेसाठी गंध, तांदूळ फूल अर्पण करावे.
ऊं प्रह्लादाय नम: आह्वानार्थे पंचोपचार गंधाक्षतपुष्पाणि समर्पयामि।।
प्रह्लादाचे स्मरण करत मनोभावे नमस्कार करून गंध, तांदूळ फूल अर्पित करावे.

आता खाली दिलेल्या मंत्राचा उच्चार करत दोन्ही हात जोडून उभे राहून मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी -
असृक्पाभयसंत्रस्तै: कृता त्वं होलि बालिशै: अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भव:।।

मंत्राचा उच्चार झाल्यानंतर गंध, अक्षदा, फुल, पूर्ण मुग, संपूर्ण हळकुंड, नारळाला कच्चे सुत बांधून होळीसमोर ठेवावे आणि हात जोडून होळीला तीन, पाच अथवा सात प्रदक्षिणा घालाव्या.

आजच्या होळीत मनातील नकारात्मक, अमंगल आणि वाईट विचार जळून भस्म होवोत आणि चांगले, सकारात्मक सद्विचार वाढीस लागोत. यासाठी सर्व हिंदू बांधवांना होळीच्या रंगीत शुभेच्छा!🙏🚩🚩🚩

Happy women's day .....eat healthy ...stay healthy🍪💐😊......NOT ONLY TODAY EVERY DAY IS HER DAY .  😘😍❤️🙏
08/03/2019

Happy women's day .....eat healthy ...stay healthy🍪💐😊......NOT ONLY TODAY EVERY DAY IS HER DAY . 😘😍❤️🙏

03/03/2019

#आपली संस्कृती व शास्त्र.
Cp post
#महाशिवरात्री..
🌹 *महाशिवरात्र* 🌹

शिवरात्री वर्षभरातील प्रत्येक महिन्यात येत असते, परंतु, माघ महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी शैव पंथीय उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस बहुधा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो. या वर्षी म्हणजे २०१९ साली, *सोमवार दिनांक ४ मार्च २०१९ रोजी महाशिवरात्र आहे.*

महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे.
हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीीचा.

महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीचे शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात.

महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते. शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा करावी असा संकेत आहे त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात.

या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याची दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्‍ती होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात.

महाशिवरात्रीचे व्रत कुमारिका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात असे मानले जाते. शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्‍त होतो अशी श्रद्धा आहे.

भारतात अनेल शिवमंदिरे असून शिवरात्रीला ठिकठिकाणी अशा मंदिरात यात्रा भारतात.

अन्य कोणतेही उपास न पाळाणारे हिंदू पुरुष आश्विनी आणि कार्तिकी या दोन एकादशांना आणि महाशिवरात्रीला उपवास करतात.

*महाशिवरात्री’ म्हणजे काय ?*

पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

*महाशिवरात्रीचे व्रत का करावे ?*

शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

*व्रत आचरण्याची पद्धत व विधी*

उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन व्रत समाप्ती करावी.

*शिवपूजेची वैशिष्ट्ये*

१) शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.
२) शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात.
३) शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.
४ ) शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात.
५ ) शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

*महाशिवरात्रीला शिवाचा नामजपचे महत्त्व*

महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा || नम: शिवाय || या शिवाचा पंचाक्षरी मंत्राचा जास्तीतजास्त करावा.

माघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नमः शिवाय’ ह्या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात, तर कुणी हौशी मंडळी ह्या महाशिवरात्रीची पर्वणी साधून बारा ज्योतीर्लिंगे किंवा पुरातन शिव मंदिरांना आवर्जून दर्शन भेट देतात.

ह्या पवित्र दिवशी शिवशंकराला रुद्राभिषेक करणे, जप करणे, बेल पत्र वाहणे, उपास करणे इ. गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे ज्ञान, महाशिवरात्रीच्या उपासनेमुळे उपासकाचे निश्चितच कल्याण होते. त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याला उत्कर्षाचा, मुक्तीचा विकासाचा मार्ग सापडतो.

*महाशिवरात्रीची कथा.*

शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार, विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, ह्या बद्दल ‘शिवलिलामृत’ मध्ये एक कथा आहे ती अशी की :

असाच एक महाशिवरात्रीचा दिवस. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा हेतू. दुपारपासून धनुष्य बाण सज्ज करून तो बसला खरा !… पण… दिवस गेला-संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या तरी एक ही प्राणी त्या जलाशयाकडे आला ही नाही अन्‌ शिकार मिळालीही नाही.

तेवढ्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरिणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या ! तू तर शिकारी आहेस. शिकार करणे हा तुझा धर्म आहे. तू आम्हाला मारणार हे ही खरं आहे. पण त्या आधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो. आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची. पण त्या हरिणाच्या प्रमुखानी परत येण्याच वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला “ठीक आहे उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे.”

हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता रात्र कशी काढायची. तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ॐ नमः शिवाय म्हटले. नकळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता, त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती.

तोच ते हरिण आले आणि म्हणाले, “पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय. मला आता मार…” इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली. “त्याला नको मला मार, तो माझा पती आहे. त्याच्या आधी मला मार. मला माझा पत्नी धर्म पाळू दे.” तेवढ्यात ती पाडसं पुढे आली आणि म्हणाली त्या दोघांआधी आम्हाला मार. ते आमचे आई वडील आहेत. आम्हाला आमचा पुत्र धर्म पाळू दे. त्यांच रक्षण करू दे.

एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाचीच दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली अन पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य पाळतात तर मी का दयेचा धर्म पाळू नये. त्याची शिकार करून पापाचा धनी का होऊ. पारध्यानं सर्वानाच जीवनदान दिले.

भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून अन्‌ पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले. हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.
सौ.समृद्धी शरद जोशी. कोल्हापूर.
श्रीराम जयराम जयजय राम

Eat helthy...... stay healty ......
22/01/2019

Eat helthy...... stay healty ......

हल्ली ज्वारीची आहारातील फारच कमी झाला आहे. त्यातल्या-त्यात पण ग्रामीण भागात त्यामानाने जास्त प्रमाण ज्वारीचा आह....

14/01/2019

*सर्वोत्तम आरोग्यदायी भारतीय संस्कृतीची मकरसंक्रांत*

वैदिक काळापासून तीळ आणि तिळाचे तेल यांचे महत्त्व सर्वानी मान्य केलेले आहे. तांबे आणि मँगनीजने समृद्ध असलेले तीळ संधिवातातील दुखण्यासाठी उपयुक्त ठरतात. तिळातील झिंक हाडे बळकट करतात, तसेच मॅग्नेशियम श्वसनसंस्थेच्या व्याधीसाठी परिणामकारक ठरते. काळे तीळ तर जास्त गुणकारी. तिळाच्या तेलात कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत. तसंच तोंडातील रोग बरे करण्यासाठी आणि मसाज करण्यासाठी तिळाचे तेल वापरले जाते.

स्वयंपाकात तसेच औषधातही तीळ नित्य वापरले जातात. पांढरे तीळ आणि काळे तीळ असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ गुणाने श्रेष्ठ समजले जातात. तिळाचे औषधी गुणधर्म पुढीलप्रमाणे दिलेले आहेत,
तीळ चवीला कडवट, स्पर्शाने थंड असले तरी विपाकाने तिखट असतात, बुद्धी वाढवितात, दातांसाठी हितकर असतात, वर्ण उजळवतात, व्रण भरून येण्यासाठी हितकर असतात, वाताला कमी करतात व कफ वाढवितात.

तिळाचा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापर करता येतो. दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्‍त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. मुका मार लागला, एखादा शरीर भाग मुरगळला तर तीळ कुटून, गरम करून सुती कापडात बांधावेत. या पुरचुंडीने दुखावलेला शरीरभाग शेकण्याचा उपयोग होताना दिसतो.

तीळ खाण्याने शौचाला साफ होण्यास मदत मिळते. तिळाचे नियमित सेवन केल्याने जुन्यातील जुना मुळव्याधीचा आजार बरा होऊ शकतो. मुळव्याधची समस्या असल्यास दोन चमचे काळे तीळ चावून-चावून खावेत आणि त्यानंतर थंड पाणी प्यावे. या उपायाने मुळव्याध लवकर ठीक होण्यास मदत होईल.ज्या मूळव्याधीमध्ये रक्‍त पडते, त्यावर अर्धा चमचा तीळ बारीक वाटून चमचाभर घरच्या लोण्याबरोबर घेण्याचा उपयोग होतो. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.
- वारंवार लघवी होण्याचा त्रास असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चमचाभर तीळ आणि ओवा यांचे समभाग मिश्रण घेण्याचा उपयोग होतो.
- शरीरामध्ये कुठेही वायूमुळे चमक उठत असेल किंवा एखादा शरीरभाग उडत असेल तर त्यावर तीळ बारीक करून गरम करून शेकण्याचा उपयोग होतो.
लघवी साफ होत नसेल, अडून राहिल्यामुळे ओटीपोट फुगल्यासारखे झाले असेल अशा वेळी तीळ वाटून, गरम करून ओटीपोटावर लेपाप्रमाणे लावण्याने लघवीला साफ होण्यास मदत मिळते.
- शरीर पोषणासाठीसुद्धा तीळ उत्तम असतात. चमचाभर तीळ पाण्यात भिजवून वाटले व कपभर दुधात कोळून घेऊन त्यात चवीप्रमाणे अर्धा ते एक चमचा गूळ मिसळून घेतले तर शरीर पोषणास मदत मिळते.
- डोक्‍यामध्ये खवडे होतात, त्यावर तीळ कढईमध्ये जाळून तयार केलेली राख तिळाच्या तेलात मिसळून लावण्याचा उपयोग होतो.
- शौचाला त्रास होणे, त्यामुळे वेदना होणे, क्वचित रक्‍तस्राव होणे अशा त्रासांवर काही दिवस रात्रीच्या जेवणात तीळ टाकून तयार केलेली मुगाची पातळ खिचडी व तूप असे खाणे पथ्यकर असते. यामुळे आतड्यांना आवश्‍यक ते वंगण मिळाले की वरील सर्व त्रास कमी होतात.
बद्धकोष्ठता दूर करण्यात फायदेशीर ठरतात तीळ. बद्धकोष्ठता झाल्यास 50 ग्रॅम तीळ भाजून कुटून घ्या, त्यानंतर यामध्ये साखर मिसळून या मिश्रणाचे सेवन करा. या उपायाने बद्धकोष्ठता दूर होईल.

पोट दुखत असेल तर एक चमचा काळे तीळ चावून-चावून खावेत आणि त्यानंतर कोमट पाणी प्यावे. या उपायाने पोटदुखी दूर होण्यास मदत होईल.

- कान दुखत असेल तर तिळाच्या तेलात लसणाच्या तीन-चार पाकळ्या भाजून घ्या. त्या तेलाचे दोन-तीन थेंब कानात टाका. या उपायाने कानाची समस्या दूर होईल.

*हिंग आणि सुंठ टाकून गरम केलेल्या तिळाच्या तेलाने मालिश केल्यास कंबरदुखी, सांधेदुखी आणि अर्धांगवायू इ. आजार ठीक होऊ शकतात.*

- तोंडात व्रण पडले असल्यास तिळाच्या तेलात थोडेसे काळेमीठ टाकून तोंडातील व्रणावर लावा. या उपायाने तोंड आलेले बरे होईल.

- खोकला झाल्यानंतर तिळाचे सेवन करा, खोकला ठीक होईल. तीळ आणि बारीक खडीसाखर पाण्यात उकळून घेतल्यास कोरडा खोकलाही ठीक होतो.

- पाळीच्या वेळी अंगावरून कमी जात असल्यास पाळीच्या तारखेच्या आठवडाभर आधीपासून एक चमचा तीळ व एक चमचा जिरे यांचा चार कप पाण्यात एक कप शिल्लक राहीपर्यंत काढा करून, त्यात चवीनुसार गूळ मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मासिक पाळीचा त्रास असणा-या स्त्रियांनी तीळ खावेत. तिळामुळे मासिक पाळीचा त्रास कमी होतो. बरोबरीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने इतर आवश्‍यक उपचार करणेही चांगले.

तीळ : नैसर्गिक तेलकटपणा आणि उष्मांकाचा सर्वाधिक साठा तिळाच्या तेलबियांमध्ये आहे. बाजारात पांढरे, काळे आणि लाल रंगाचे तीळ मिळतात. त्यापैकी पांढ-या तिळांचा वापर जेवणात अधिक केला जातो. तीळ हे मधूर चवीचे असले तरी त्यात किंचित कडवटपणा असतो. शरीरातील कफ आणि पित्त गुणधर्म तिळामुळे वाढत असला तरी ते वातशामक आहेत. वातशामक म्हणजे वात कमी करणारे. तीळ खाण्याने भूक वाढते. केसांचं आरोग्य उत्तम होऊन त्यांची वाढही चांगली होते. त्वचेचा रंग सुधारतो.
सर्व तेलांत तिळाचं तेल उत्तम असतं. इतर तेलांसारखं हे खराब होत नाही. या तेलात संतृप्त(सॅच्युरेटेड फॅट) आणि असंतृप्त(अनसॅच्युरेटेड फॅट)चरबी असणा-या घटकांचा योग्य प्रमाणात समतोल साधलेला असतो. त्यामुळे अनावश्यक कोलेस्टेरॉल वाढत नाही.
तिळाचे इतरही काही उपयोग पुढीलप्रमाणे
वातज आम्लपित्ताचा(अल्सर) त्रास असणा-यांना तिळाच्या तेलाने आराम पडतो. जेवणापूर्वी एक चमचा तिळाचं तेल पिऊन मग जेवावं. तीन ते चार
आठवडयांत हे रोग बरे होतात. पित्तज आम्लपित्तात मात्र तिळाच्या तेलाचा उपयोग करू नये.
पित्ताशयात पित्ताचे खडे असल्यास जेवणापूर्वी एक चमचा तीळ तेल प्यावं. या उपायाने पित्ताचे खडे आतडय़ात उतरतात.
वारंवार थोडी थोडी लघवी होत असल्यास तिळाच्या तेलाचा उपयोग होतो. यासाठी एक चमचा घेऊन तो आगीवर न तापवता उन्हात तापवावा. त्यात तिळाचं तेल घेऊन ते थंड करावं. असं उन्हात तापवून थंड केलेलं तिळाचं तेल दिवसातून दोन ते तीन वेळा प्यावं. या उपायाने वारंवार लघवी होत नाही. उलट ती साफ होते.
तिळाचे तेल सामान्य तेलाच्या तुलनेत थोडेसे घट्ट असते, यामुळे या तेलाने मालिश केल्यास ते त्वचेमध्ये सहजपणे मिसळते. ज्यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. तिळाच्या तेलाने नियमित मालिश केल्यास ब्लड सर्क्युलेशन प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि क्षतिग्रस्त कोशिकांची दुरुस्ती होते.

*सांधेदुखीसाठी तिळाचे तेल गरम करावे आणि या गरम तेलाने कंबर, सांधे सर्वांना अभ्यंग (मालिश) करून शेकावे. त्यामुळे दुखणे कमी होण्यास मदत होते.*
म्हणूनच तर बाळंतिणीला तिळाचे तेल अंगाला लावण्याची पद्धत आहे.
तिळ मातेचे दूध वाढवतात म्हणून बाळंतिणीला तिळाचा लाडू, भाजलेले तीळ देण्याची प्रथा आहे.
बाळंतशेपा, ओवा, भाजलेले तीळ, सैंधव, बडीशेप एकत्र करून बाळंतिणीला दिल्यास वाताच्या तक्रारी, गॅसेस होणे, पचन न होणे या सर्वांस आराम मिळतो. मूळव्याधीच्या त्रासात रक्त पडत असल्यास लोणी-खडीसाखर, नागकेशर यांच्यासमवेत तीळ सेवन केल्यास चांगला परिणाम होतो. लहान मुलांना काहीवेळा अपचन होऊन पोट दुखते. अशा वेळी बेंबीच्या भोवती गोलाकार तिळतेल चोळावे आणि गरम तव्यावर कापड गरम करून शेकावे. दुखणे लवकर कमी होते.
लहान मुलांना पांढरे तीळ भाजून वाटून खाण्यासाठी दिल्यास त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. तीळ, रसायनविरहित (ऑरगॅनिक) गूळ, शेंगदाणे, भाजलेल्या चण्याची डाळ आणि सुक्या खोबऱ्याच्या चकत्या एकत्र करून बनवलेलं पंचखाद्य मुलांना द्यावं.
दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी तीळ कधीही चांगले. तिळात मोठय़ा प्रमाणात कॅल्शियम आहे. ऑस्टिओपोरोसिस सारख्या विकारात तीळ तेलाने मसाज करून कोवळ्या उन्हात बसण्याने हा विकार कमी होण्यास मदत होते. एक चमचा काळे तीळ रोज चावून खाल्ल्याने दातांना बळकटी येते. रोज रात्री झोपताना तीळ तेलाने दात आणि हिरडयांना मसाज केल्याने दात स्वच्छ राहतात.

तिळाचे तेल बुद्धीवर्धक मानले जाते. तिळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात आढळून येते. दररोज जवळपास 50 ग्रॅम तीळ खाल्ल्यास कॅल्शियमची आवश्यकता पूर्ण होते. तिळाच्या सेवनाने मानसिक दुर्बलता कमी होते.
तीळामधील अँटी-बॅक्टीरिअल गुणामुळे हे कोणत्याही प्रकराची जखम लवकर भरून काढतात. या व्यतिरिक्त सूज आलेल्या अवयवांना आराम देतात तसेच सोरायसिस आणि एक्जीमा सारख्या त्वचा समस्यांना दूर करण्यास मदत करतात. शरीराचा एखादा अवयव भाजला असल्यास त्या ठिकाणी तीळ, शुद्ध तूप आणि कापूर यांच्या मिश्रणाचा लेप लावावा, आराम मिळेल.

तुमच्या घरातील लहान मुले रात्री अंथरून ओले करत असतील तर त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. कारण या समस्येवर तीळ रामबाण उपाय आहेत. यासाठी भालेले काळे तीळ गुळात मिसळून लाडू तयार करून घ्या. रात्री झोपताना मुलांना हा लाडू खाण्यासाठी द्या. या उपायाने मुले रात्री अंथरून ओले करणार नाही.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने बाजारात तिळाचे लाडू, तीळगूळ, चिक्की, गजक, रेवडी या पदार्थाची रेलचेल असते. आजकाल बनब्रेड किंवा तत्सम बेकरी उत्पादनांवरही तीळ भूरभूरवलेले असतात. तर अशाप्रकारे या ना त्या निमित्ताने तीळ आपल्या पोटात जात असतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गुळाचे पदार्थ थंडीचा प्रतिकार करण्यास उपयुक्त असतात. तिळाचे लाडू किंवा चिक्की यासाठी उत्तम. तिळाबरोबर साखर वापरून केलेले गजक, रेवडी, तीळगूळ यांसारखे पदार्थ खाऊन शरीराचं थंडीपासून संरक्षण करण्याचा उद्देश साध्य होत नाही.
कारण गुळापेक्षा साखर थंड आहे. शिवाय गुळात लोह या खनिजाबरोबरीने ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वाचं प्रमाण भरपूर असतं. भाजलेले तीळ, खोबरे, शेंगदाणा, हरभ-याची भाजलेली डाळ, गूळ या पदार्थापासून बनवलेले लाडू खावेत. लाडू बनवण्यासाठी जर रसायनविरहित गूळ आणि पॉलिश न केलेले तीळ वापरल्यास लाडू अधिकच पौष्टिक होतील. तिळाचे लाडू खाल्ल्याने पोट साफ होतं. हृदयविकाराचा त्रास असणा-यांसाठीही हे लाडू चांगले. मात्र मधुमेह झालेल्यांनी मात्र गूळ-तिळाचे पदार्थ सांभाळून खावेत.

आतडय़ाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठीही तिळाच्या तेलाचा वापर केला जातो. संक्रांतीला केलेला तिळगूळ, तीळ लावून केलेली भाकरी प्रसिद्ध आहे. भाजलेले तीळ तिखट-गोड पदार्थात पेरण्याची सवय ठेवल्यास ते सहज पोटात जातील.
तिळात ई-जीवनसत्त्व असते यात जास्त फॅट्स असल्याने वजन वाढवण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तींनी हे लाडू या दिवसांत आवर्जून खावेत तिळातील ऑलेथिक ऍसिड वाईट कॉलेस्टेरॉल कमी करून चांगले कॉलेस्टेरॉल वाढवते शरीराला बाधणारे घटक तीळ कमी करतो त्यामुळे या हिवाळ्यात बिनधास्त तिळाच्या लाडवांवर ताव माऱा.

*आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते*. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. या पार्श्‍वभूमीवर तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण पाहिले.

*आजारासाठी विशिष्ट तपासण्या, नियमित औषधे, तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला हे तर महत्त्वाचे आहेच.*
पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्‍यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल, असा आम्हाला विश्‍वास आहे.

शुभ संक्रांत !

14/01/2019

🤔 _*जाणून घ्या भोगी म्हणजे काय?*_

आज 'भोगी'. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. 'भोगी' शब्द भुंज या धातूपासून बनला आहे. याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे. 'भोगी' हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. तसेच सासरच्या मुली 'भोगी'चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात.

'भोगी' हा सण हेमंत ऋतूमध्ये येणारा सण आहे. या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहारलेलं असतं त्यामुळे आहारातही त्याचा तितक्याच चविष्ट पद्धतीने वापर केला जातो. म्हणून या दिवशी 'भोगी'ची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला 'खिंगाट' म्हणतात. या दिवसात उपलब्ध असणारे आणि शरीरात उष्णता वाढवणार्‍या अनेक पदार्थांचा यामध्ये समावेश केला जातो. तीळ लावलेली बाजरीची भाकरी, खर्डा, सर्व शेंगभाज्या, पावटय़ाचे दाणे, वांगी, बटाटा अशा सर्व भाज्यांची मिश्र भाजी असा बेत उपभोगायचा असतो.

'भोगी'ची भाजी ही प्रामुख्याने बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते. बाजरी ही उष्ण प्रकृतीची असल्याने हिवाळ्याच्या थंडगार वातावरणात बाजरीच्या भाकरीसोबत भाजीची चव चाखणं हे केवळ चविष्टच नव्हे तर आरोग्याला पोषक आहे. यामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता टिकवून ठेवण्यास मदत होते.

तसेच या दिवशी देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवितात. सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच 'भोगी' देणे म्हणतात.

05/01/2019

आज काय आहे माहित आहे?

आज आहे वेळाअमावस्या!!! आपल्या महाराष्ट्राला अनेकविध सणांची भलीमोठी परंपरा आहे. त्यातलाच हा एक सण. ही वेळाअमावस्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातल्या काही भागात साजरी होते. तसं पाहायला गेलं तर हा आहे मूळचा कर्नाटकातला सण. तिथून तो महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात आला आहे.

काय करतात या अमावस्येला?

तर, आजचा दिवस आहे शेताच्या काळ्या आईच्या पूजेचा. ही आई आपल्याला धान्य देते, पालनपोषण करते, तिचे उपकार स्मरण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी तुम्हांला गावात कुणी सापडणार नाही. जणू सगळीकडे अघोषित संचारबंदीच असते. मात्र शेतं आणि शिवारं गर्दीने फुलून गेले असतात.

भागात जे मुख्य पीक असतं त्या भागात त्याला लक्ष्मी म्हटलं जातं. या दिवसांत पिकं ज्वारी पोटऱ्यात येण्याच्या म्हणजेच म्हणजेच कणीस भरण्याची स्थितीत असतात. म्हणजेच यावेळी लक्ष्मी गर्भवती आहे असे समजून तिच्या डोहाळेजेवणासाठी काही खास पदार्थ केले जातात. डोहाळजेवण आणि त्यात थंडी!! म्हणून वेळाअमावास्येचा मेनू हा थंडीला सामोरे ठेऊन तयार केला जातो. हे पदार्थ थंडीच्या दिवसात खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं.

हा असतो वेळाअमावस्येचा मेन्यू..

या काळात रान विविध भाज्यांनी फुललेलं असतं. त्यामुळे सोळा भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. बाजरी ऊर्जा देते म्हणून बाजरीचे पीठ उकडून त्याचे उंडे बनवले जातात. गुळसुद्धा उष्ण असतो म्हणून गूळ घालून गव्हाची खीर आणि हे सगळे पचवण्यासाठी ज्वारीचं पीठ रात्रभर ताकात मुरवून केलेली आंबील!! या सर्व पदार्थांनी आधी धरणीमातेची ओटी भरतात.

या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्यांच्या वाळलेल्या धाटांची खोप बांधतात. पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करुन नैवेद्य दाखवतात. पूजेनंतरसगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात. हा स्वयंपाकही तिथं शेतातच केलेला असतो. हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचं स्वतःचं शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलावतात.

या दिवशी सगळ्यांचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो. उन्हं उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात. एक दिवस काळ्या आईच्या सान्निध्यात राहायच्या या सणाची पुढच्या वर्षी पर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते.

Cp👉👉ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्वळ भविष्यासाठी हा संवाद न चूकता ...
21/11/2018

Cp
👉👉ज्यांच्या घरात ९ महिने ते १५ वर्ष वयाची मुले मुली आहेत त्यांनी आपल्या बालकांच्या उज्वळ भविष्यासाठी हा संवाद न चूकता वाचावा ही नम्र विनंती.

🌹 *MR लसीकरण मोहिम* 🌹
"""""""""""""""""""""""""""""""""""""""
👉*MR लसीकरणा विषयीचा* 👉*संवाद राम आणि शामचा*

*रामः* अरे शाम मित्रा तुझ्या मुलांना MR ची लस जरुर दे बरं !

*शामः* अरे पण MR लस म्हणजे काय ?

*रामः* अरे MR लस म्हणजे मिझल आणि रुबेलाची या आजारावरची लस.

*शामः* म्हणजे गोवर आणि रुबेला ?

*रामः* हो. गोवर आणि रुबेला.

*शामः* पण माझ्या मुलांना कुठे गोवर आणि रुबेला झालाय ?

*रामः* अरे मित्रा गोवर आणि रुबेला हे दोन आजार होऊ नयेत म्हणून ही लस द्यायची आहे.

*शामः राम ही लस दिल्यावर मुलांना काही झाले तर ?

*रामः* काहीही होणार नाही. ही लस अतिशय खात्रीलायक आहे. पूर्णपणे बिनधोक आहे. कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होणार नाही. जे होईल ते चांगलेच होईल.

*शामः* ते कसे ?

*रामः* अरे मित्रा शाम, चांगले होईल म्हणजे ज्या मुलांना ही लस दिली जाईल त्या मुलांना गोवर आणि रुबेला होणारच नाही. समजले ?

*शामः* अरे राम मला गोवर हा आजार माहीत आहे. पण रुबेला म्हणजे काय ?

*रामः* शाम रुबेला हा विषाणूपासून होणारा आजार आहे. जर गर्भावस्थेत मातेला झाला तर गर्भातील मुलांनाही होतो. अशी मुले मुक-बधीर, अंध, मतीमंद असे व्यंग घेवूनच जन्माला येतात. ही लस घेणाऱ्या मुलींच्यापोटी अशी अपंग मुले जन्मालाच येणार नाहीत.

*शामः* मित्रा आता समजले या MR लसीकरणाचे महत्व. पण ही लस मिळणार कुठे ?

*रामः* अरे तुझी मुले ज्या शाळेत शिकतात तिथे तसेच गावातील अंगणवाडी, बालवाडी अशा सर्व ठिकाणी ही MR ची लस देण्याची व्यवस्था केलीआहे.

*शामः* एका डोसचे किती पैसे द्यावे लागतील ?

*रामः* शून्य. कारण आपल्या भारत सरकारने एक संकल्प केला आहे की आपल्या देशातून जसे देवी, नारु, पोलिओ या आजारांना हद्दपार केले त्याप्रमाणे गोवर या आजारालाही कायमचा हद्दपार करायचा आहे. तसेच रुबेला या आजाराला रोखायचा आहे. त्यासाठी आपल्या सरकारच्या वतीने देशातील ०९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना ही MR ची लस मोफत देण्यात येणार आहे. अरे शाम, आपल्या देशातील ब-याच राज्यात ही मोहिम यापुर्वीच राबवण्यात आली आहे. आता २७ नोव्हेंबर २०१८ पासून आपल्या महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे ९ महिने ते १५ वर्ष वयातील सर्व मुलांना या लससीचा डोस आवश्य द्यावे. *शामः* राम खरोखरच तुला मनःपूर्वक धन्यवाद ! खुप छान समजावून सांगितलेस. मित्रा, मी माझ्या मुलांना तर या MR लसीचा डोस आवश्य देईलच. पण माझ्या शेजारील, मित्र परिवारातील, नात्यातील सर्व मुलांना देण्यासाठी सर्वांना फोन करुन आठवण देईल..... धन्यवाद मित्रा धन्यवाद ! *प्रयत्न आरोग्य खात्याचे,*
*सहकार्य आपले सर्वांचे.*
सर्वजण मिळून करुया,
*निर्मुलन गोवर आजाराचे.*
*नियंत्रण भयंकर रुबेलाचे l* """""""""""""""""""""""""""""""""""
श्री वसंत जैतू निमसे.
*आरोग्य सहाय्यक*
ना.प्रा.आ.केंद्र कातकरीपाडा. नवीमुंबई महानगरपालिका ✏✏✏✏✏

Address

Vatar School
Virar
401301

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

7977434258

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ भाकरी सेंटर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share